शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

तलावातील अतिक्रमण हटवा

By admin | Updated: September 20, 2016 00:56 IST

शहराच्या मध्यभागी असलेल्या तलावातील अतिक्रमण तत्काळ हटवावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सिंचाई ...

वेळप्रसंगी फौजदारी कारवाई करा : जिल्हाधिकाऱ्यांचे सिंचन विभागाला निर्देशगडचिरोली : शहराच्या मध्यभागी असलेल्या तलावातील अतिक्रमण तत्काळ हटवावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सिंचाई विभागाचे शाखा अभियंता यांना १६ सप्टेंबर रोजी दिले आहेत. स्वत:हून अतिक्रमण न हटविल्यास फौजदारी कारवाई करण्याचेही निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे अतिक्रमणधारकांवर कारवाई होणे निश्चित मानले जात आहे. गडचिरोली शहराच्या मध्यभागी असलेल्या तलावाच्या हद्दित सिंचाई विभागाच्या जागेवर शासकीय कर्मचारी व इतरांनी अतिक्रमण करून कच्ची व पक्के घरे बांधली आहेत. त्यामुळे तलावाचे अस्तित्त्व व सौंदर्य धोक्यात आले आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांवर फौजदारी कारवाई करून जागा मोकळी करून द्यावी, या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते बसंतसिंग बैस व आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक अशोक लांजेवार यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल विभागीय आयुक्तांनी घेत सदर अतिक्रमणधारकांवर का कारवाई केली जात नाही, कारवाई केली असेल तर त्याचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाला सादर करावा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आजपर्यंत केलेल्या कारवाईचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला आहे. यामध्ये २७ मे २०१६ रोजी तहसीलदार सिंचाई विभागाचे कार्यकारी अभियंता, मुख्याधिकारी यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार त्यांनी चौकशी करून ३१ मे रोजी अहवाल सादर केला आहे. तलावाच्या ज्या क्षेत्रात पाणी राहत नाही. अशा क्षेत्रात नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. सोबतच अतिक्रमणधारकांची यादीसुद्धा सादर केली आहे. अतिक्रमणधारकांनी पक्की, कच्ची घरे बांधली आहेत. त्याचबरोबर अतिक्रमण सुरू आहे. (प्रतिनिधी)अतिक्रमणधारक धास्तावलेअनेकवेळा नोटीस देऊनही अतिक्रमणधारक अतिक्रमण काढण्यास तयार नाहीत. त्यामुळे जे अतिक्रमणधारक यानंतर नोटीस देऊनही अतिक्रमण स्वत:हून काढणार नाही. त्या अतिक्रमणधारकांवर फौजदारी कारवाई करावी, असे निर्देश सिंचाई विभागाचे शाखा अभियंता यांना दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कडक धोरणामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत.