शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
3
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
4
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
5
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
6
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
7
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
8
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
9
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
10
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
11
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
12
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
13
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
14
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
15
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
16
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
17
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
18
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
19
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
20
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय

तलावातील अतिक्रमण हटवा

By admin | Updated: September 20, 2016 00:56 IST

शहराच्या मध्यभागी असलेल्या तलावातील अतिक्रमण तत्काळ हटवावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सिंचाई ...

वेळप्रसंगी फौजदारी कारवाई करा : जिल्हाधिकाऱ्यांचे सिंचन विभागाला निर्देशगडचिरोली : शहराच्या मध्यभागी असलेल्या तलावातील अतिक्रमण तत्काळ हटवावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सिंचाई विभागाचे शाखा अभियंता यांना १६ सप्टेंबर रोजी दिले आहेत. स्वत:हून अतिक्रमण न हटविल्यास फौजदारी कारवाई करण्याचेही निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे अतिक्रमणधारकांवर कारवाई होणे निश्चित मानले जात आहे. गडचिरोली शहराच्या मध्यभागी असलेल्या तलावाच्या हद्दित सिंचाई विभागाच्या जागेवर शासकीय कर्मचारी व इतरांनी अतिक्रमण करून कच्ची व पक्के घरे बांधली आहेत. त्यामुळे तलावाचे अस्तित्त्व व सौंदर्य धोक्यात आले आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांवर फौजदारी कारवाई करून जागा मोकळी करून द्यावी, या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते बसंतसिंग बैस व आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक अशोक लांजेवार यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल विभागीय आयुक्तांनी घेत सदर अतिक्रमणधारकांवर का कारवाई केली जात नाही, कारवाई केली असेल तर त्याचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाला सादर करावा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आजपर्यंत केलेल्या कारवाईचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला आहे. यामध्ये २७ मे २०१६ रोजी तहसीलदार सिंचाई विभागाचे कार्यकारी अभियंता, मुख्याधिकारी यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार त्यांनी चौकशी करून ३१ मे रोजी अहवाल सादर केला आहे. तलावाच्या ज्या क्षेत्रात पाणी राहत नाही. अशा क्षेत्रात नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. सोबतच अतिक्रमणधारकांची यादीसुद्धा सादर केली आहे. अतिक्रमणधारकांनी पक्की, कच्ची घरे बांधली आहेत. त्याचबरोबर अतिक्रमण सुरू आहे. (प्रतिनिधी)अतिक्रमणधारक धास्तावलेअनेकवेळा नोटीस देऊनही अतिक्रमणधारक अतिक्रमण काढण्यास तयार नाहीत. त्यामुळे जे अतिक्रमणधारक यानंतर नोटीस देऊनही अतिक्रमण स्वत:हून काढणार नाही. त्या अतिक्रमणधारकांवर फौजदारी कारवाई करावी, असे निर्देश सिंचाई विभागाचे शाखा अभियंता यांना दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कडक धोरणामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत.