शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

इटियाडोहच्या पाण्यापासून कोरेगाव परिसर वंचित

By admin | Updated: April 30, 2016 01:24 IST

देसाईगंज तालुक्यातील नदी, नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे नद्यावरील नळ योजना बंद पडण्याच्या स्थितीत आहेत.

कोरेगाव/चोप : देसाईगंज तालुक्यातील नदी, नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे नद्यावरील नळ योजना बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. पाण्याची भिषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन इटियाडोह प्रशासनाने नहराद्वारे पाणी सोडले. मात्र सदर पाणी शेतकऱ्यांनी जमीन ओलितासाठी वापरल्याने नदी, नाल्यापर्यंत पाणी पोहोचलेच नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पावसाचे प्रमाण यावर्षी कमी झाल्याने भूजल पातळीत घट झाली आहे. त्याचबरोबर लहान, मोठे जलस्त्रोत एप्रिल महिन्यातच आटले. दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन उन्हाळी धान पिकाची लागवड न करण्याचे निर्देश देण्यात आले होते. देसाईगंज, आरमोरी या तालुक्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होऊ नये यासाठी इटिया डोहाचे पाणी सोडण्यात आले. मात्र सदर पाणी बोडधा, कोरेगाव, चोप, शंकरपूर या गावांपर्यंत पोहोचलेच नाही. नहराद्वारे सदर पाणी सरळ आरमोरीपर्यंत पोहोचले आहे. या पाण्याचा उपयोग शेतकरी शेतीच्या मशागतीसाठी करीत आहेत. या उद्देशाने पाणी सोडण्यात आले. तो उद्देश साध्य झालेला नाही. ज्या शेतकऱ्यांनी या पाण्याचा दुरूपयोग केला आहे, त्यांच्यावर दंड आकारावा, अशी मागणी चोपचे सरपंच लिला मुंडले, उपसरपंच कमलेश बारस्कर, गरीबदास बाटबर्वे यांनी केली आहे. नळ योजना पडणार बंदकोरेगाव चोप परिसरातील अनेक गावांच्या नळ योजना नदी, नाल्यांवर बसविण्यात आल्या आहेत. मात्र नदी, नाले पूर्णपणे कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या नदी, नाल्यांवरील योजना बंद पडण्याची स्थिती आहे. त्यामुळे या नदी, नाल्यांना इटिया डोह नहराचे पाणी अडविणे आवश्यक आहे.