शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

गोंडवानात उत्तरपत्रिका मूल्यमापन पध्दतीत दोष

By admin | Updated: July 2, 2016 01:36 IST

स्थानिक गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने नुकत्याच जाहीर झालेल्या बी.ए. अंतीम वर्षातील पाचवे सेमिस्टरच्या १०९ विद्यार्थ्यांना इतिहास व इंग्रजी या दोन विषयात शून्य ते पाच गुण दिले आहे.

इतिहास व इंग्रजीत पाच पेक्षा कमी गुण : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचा आरोपगडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने नुकत्याच जाहीर झालेल्या बी.ए. अंतीम वर्षातील पाचवे सेमिस्टरच्या १०९ विद्यार्थ्यांना इतिहास व इंग्रजी या दोन विषयात शून्य ते पाच गुण दिले आहे. अशा गुणपत्रिकाही तयार करण्यात आल्या आहेत. महाविद्यालयात प्रवेश घेऊन नियमित तास करणाऱ्या हुशार व गरीब विद्यार्थ्यांना नापास करून विद्यापीठाने या विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका मूल्यमापन पद्धतीत दोष आहे, असा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी बल्लारपूरचे नगरसेवक राजू झोडे, सोशालिस्ट पार्टीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विलास कोडाप, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मोनल भडके, नरेश वाकडे, राजू बन्सोड, मिलिंद बांबोळे, सुरेश खोब्रागडे, विवेकराजे बारसिंगे उपस्थित होते. यावेळी झोडे यांनी सांगितले की, चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून ११८ विद्यार्थ्यांनी इतिहास, इंग्रजी विषय घेऊन बीए अंतिम वर्षाच्या पाचव्या सेमिस्टरची परीक्षा दिली. यापैकी १०९ विद्यार्थ्यांना पाच पेक्षा कमी गुण घेऊन सरसकट नापास करण्यात आले. नापास करण्यात आलेली सदर १०९ विद्यार्थी हे यापूर्वीच्या चारही सेमिस्टरमध्ये चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांनी नियमित तास करून संपूर्ण पेपर व्यवस्थित सोडविला होता. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शुन्य ते पाच गुण कसे मिळू शकतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या संदर्भात पक्षाच्या विद्यार्थी आघाडीचे शिष्टमंडळ आठवडाभरापूर्वी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांना भेटले. त्यानंतर पक्षाच्या वतीने शुक्रवारी शेकडो विद्यार्थी व कार्यकर्त्यांना घेऊन विद्यापीठावर धडक दिली. मात्र यावेळी कुलगुरू डॉ. कल्याणकर उपस्थित नव्हते, असेही त्यांनी सांगितले. चुकीचे मुल्यमापण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच कमी गुण देऊन नापास करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे नि:शुल्क फेर मुल्यांकन करण्यात यावे, अन्यथा पक्षाच्या वतीने कुलगुरूंना घेराव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी अन्यायग्रस्त विद्यार्थी सचिन सातपुते, रूपेश सातपुते, अपेक्षा रायुपरे, अमोल गेडाम हजर होते. (प्रतिनिधी)