शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात घट

By admin | Updated: July 8, 2014 23:26 IST

पती किंवा सासरच्या मंडळीकडून केल्या जाणाऱ्या कौटुंबिक अत्याचाराच्या घटनेत गेल्या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात कमालीची गट आल्याचा दावा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने केला आहे.

पोलिसांची आकडेवारी वेगळी : महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचा दावाअभिनय खोपडे / दिगांबर जवादे - गडचिरोलीपती किंवा सासरच्या मंडळीकडून केल्या जाणाऱ्या कौटुंबिक अत्याचाराच्या घटनेत गेल्या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात कमालीची गट आल्याचा दावा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने केला आहे. मात्र दुसरीकडे मागीलदोन वर्षात पोलीस दप्तरी महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या दीड वर्षात गडचिरोली जिल्ह्यात २७ प्रकरणे भादंविच्या ४९८ अ कलमान्वये दाखल झाले आहे. यातील एका प्रकरणाचा न्यायालयात निपटारा झाला.पती व सासरच्या मंडळीकडून विवाहित महिलांचा हुंडा व आदी मागण्यांसाठी मोठ्या प्रमाणावर छळ केला जात होता. या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व न्यायालयाच्या बाहेर अशा प्रकरणांत तोडगा काढण्यासाठी शासनाने महिला व बालविकास विभागामार्फत प्रयत्न सुरू केले. त्यामुळे पोलीस ठाण्याकडे कलम भादंवि ४९८ अ कलमान्वये दाखल होणाऱ्या प्रकरणांमध्ये कमालीची घट झाली आहे, असे आकडेवारी गडचिरोली जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने दिली आहे. सन २०१४ या वर्षात गेल्या सहा महिन्यात १५५ प्रकरणे अशा अत्याचाराच्या संदर्भात दाखल झाले आहेत, अशी माहिती मिळाली आहे. या प्रकरणांमध्ये पती-पत्नी यांचे समुपदेशन करून त्यांच्यामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो.गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी, गडचिरोली, देसाईगंज व अहेरी येथे हे कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. कौटुंबिक हिंसाचाराविषयीची एखादे प्रकरण पोलीस स्टेशनकडे आल्यानंतर सर्वप्रथम ते महिला व मुलांसाठी सहाय्यक कक्षाकडे दाखल केल्या जाते. समुपदेशक पीडित महिलेला योग्य मार्गदर्शन करून कुटुंबिय व तिच्यामध्ये तडजोड करून देण्याचा प्रयत्न करतो. महिलेला आवश्यक असलेले तिचे अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. जिल्हास्तरावर स्वतंत्र संरक्षण अधिकारी व विधी सल्लागार नेमण्यात आला आहे. हे अधिकारी पीडित महिलेला तिचे हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करतात, असेही महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे प्रमुख जाधव यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. दुसरीकडे मात्र जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढले आहे. २०१२ व २०१३ या दोन वर्षाच्या घटनांचा आढावा घेतल्यास महिला अत्याचारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २०१२ मध्ये विनयभंगाचे ३० प्रकरणे, २०१३ मध्ये ५६ प्रकरणे असे एकूण ८६ प्रकरणे गडचिरोली जिल्ह्यात घडले. २०१२ मध्ये बलात्काराचे १६ तर २०१३ मध्ये बलात्काराचे ३१ प्रकरणे नोंद करण्यात आले. दोनही वर्षाचे मिळून बलात्काराचे ४७ प्रकरणे पोलीस दप्तरी दाखल झाले आहे. महिलांच्या खुनाच्या ९ घटना २०१२ मध्ये घडल्या असून २०१३ मध्ये १० महिलांचे खून झालेत. एकूण १९ घटना जिल्ह्यात झाल्यात. याची पोलीस दप्तरी नोंद आहे. २०१२ या वर्षात महिला अत्याचाराच्या ५५ तर २०१३ मध्ये ९७ घटना गडचिरोली जिल्ह्यात घडल्या आहे. मागील वर्षात महिला अत्याचाराचे ११६ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. २०१२ मध्ये १६४ गुन्ह्यांची नोंद जिल्ह्यात करण्यात आली होती. ४९८ अ कलमांतर्गत दाखल होणारे प्रकरण पोलिसांकडे जाण्याचे प्रमाण घटल्याचा दावा करण्यात येत असला तरी गडचिरोली जिल्ह्यात २०१३ मध्ये १९ व २०१४ मध्ये ८ प्रकरण ४९८ कलमान्वये दाखल आहेत. यात पती, सासू, सासरे, ननंद, भासरा यांच्यावर गुन्हे दाखल केल्याचेही प्रकरणे आहेत. एका प्रकरणाचा न्यायालयात निकालही लागून निपटारा झाला आहे.