शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

२० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 23:35 IST

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ हजार ६६९ कर्जदार शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ देण्यात आला आहे. ४२ कोटी १७ लाख रूपयांची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यामध्ये वर्ग करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांना थकीत कर्ज निरंक झाल्याचे प्रमाणपत्र दिले जात आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संलग्न असलेल्या ...

ठळक मुद्देजिल्हा बँकेतर्फे प्रमाणपत्रांचे वितरण : ४२ कोटी १७ लाख रूपये कर्ज खात्यात वर्ग

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ हजार ६६९ कर्जदार शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ देण्यात आला आहे. ४२ कोटी १७ लाख रूपयांची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यामध्ये वर्ग करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांना थकीत कर्ज निरंक झाल्याचे प्रमाणपत्र दिले जात आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संलग्न असलेल्या सेवा सहकारी संस्था व आदिवासी विविध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज वितरित करते. शासनाने कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. दीड लाख रूपयांपर्यंतचे कर्ज घेतलेले १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत थकीत असलेले ८ हजार ९२२ शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरले. ११ डिसेंबर २०१७ पर्यंत राज्य शासनाकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शेतकऱ्यांच्या थकीत कर्जापोटीची २६ कोटी ७५ लाख रूपये एवढी रक्कम प्राप्त झाली. बँकेने शासनाकडून प्राप्त झालेली रक्कम संबंधित लाभार्थी शेतकºयांच्या बँक खात्यात वळती केली आहे. त्यामुळे संबंधित शेतकºयाचे कर्ज असलेले बँक खाते आता निरंक झाले आहे.जे शेतकरी नियमितपणे कर्ज भरतात, अशा शेतकऱ्यांसाठी शासनाने प्रोत्साहनपर लाभ देण्याची योजना सुरू केली आहे. ११ डिसेंबरपर्यंत १० हजार ७७५ शेतकरी यासाठी पात्र ठरले. शासनाकडून बँकेला १५ कोटी ४२ लाख रूपयांची रक्कम प्राप्त झाली. सदर रक्कम लाभार्थी शेतकरी सभासदाच्या बँक खात्यात वळती करण्यात आली आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात मंगळवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान चांदाळा येथील लिलाबाई पामू कोवे, ऋषी किरंगे व माडेमूल येथील रेखाबाई एकनाथ धुर्वा या तीन शेतकऱ्यांना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांच्या हस्ते थकीत कर्ज निरंक झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी बँकेचे निरिक्षक एम. डी. रहाटे, चांदाळा आविका संस्थेचे व्यवस्थापक पी. व्ही. दोनाडकर उपस्थित होते. ज्या शेतकºयांचे कर्जमाफ झाले आहे. अशा शेतकºयांना पुढील खरीप हंगामासाठी नवीन कर्ज घेता येणार आहे, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी दिली.३५ हजार शेतकरी ग्रीन यादीतसर्वच बँकांचे कर्जदार असलेल्या कर्जमाफी योजनेची निकष पूर्ण करणाऱ्या ३५ हजार ४०३ शेतकºयांची नावे ग्रीन यादीत आहेत. यामध्ये १५ हजार ४५६ शेतकरी नियमित कर्जफेड करणारे आहेत. ९९४ शेतकरी एकरकमी कर्जाची परतफेड करणारे आहेत. तर १९ हजार ९४७ शेतकरी थकीत कर्जदार आहेत. या सर्वांना त्यांच्या निकषाप्रमाणे कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. जिल्ह्यातील ७७ लाख शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. नावांची पुनर्रावृत्ती वगळून ६९ लाख शेतकºयांचे अर्ज पात्र ठरले.