शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

२० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 23:35 IST

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ हजार ६६९ कर्जदार शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ देण्यात आला आहे. ४२ कोटी १७ लाख रूपयांची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यामध्ये वर्ग करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांना थकीत कर्ज निरंक झाल्याचे प्रमाणपत्र दिले जात आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संलग्न असलेल्या ...

ठळक मुद्देजिल्हा बँकेतर्फे प्रमाणपत्रांचे वितरण : ४२ कोटी १७ लाख रूपये कर्ज खात्यात वर्ग

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ हजार ६६९ कर्जदार शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ देण्यात आला आहे. ४२ कोटी १७ लाख रूपयांची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यामध्ये वर्ग करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांना थकीत कर्ज निरंक झाल्याचे प्रमाणपत्र दिले जात आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संलग्न असलेल्या सेवा सहकारी संस्था व आदिवासी विविध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज वितरित करते. शासनाने कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. दीड लाख रूपयांपर्यंतचे कर्ज घेतलेले १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत थकीत असलेले ८ हजार ९२२ शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरले. ११ डिसेंबर २०१७ पर्यंत राज्य शासनाकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शेतकऱ्यांच्या थकीत कर्जापोटीची २६ कोटी ७५ लाख रूपये एवढी रक्कम प्राप्त झाली. बँकेने शासनाकडून प्राप्त झालेली रक्कम संबंधित लाभार्थी शेतकºयांच्या बँक खात्यात वळती केली आहे. त्यामुळे संबंधित शेतकºयाचे कर्ज असलेले बँक खाते आता निरंक झाले आहे.जे शेतकरी नियमितपणे कर्ज भरतात, अशा शेतकऱ्यांसाठी शासनाने प्रोत्साहनपर लाभ देण्याची योजना सुरू केली आहे. ११ डिसेंबरपर्यंत १० हजार ७७५ शेतकरी यासाठी पात्र ठरले. शासनाकडून बँकेला १५ कोटी ४२ लाख रूपयांची रक्कम प्राप्त झाली. सदर रक्कम लाभार्थी शेतकरी सभासदाच्या बँक खात्यात वळती करण्यात आली आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात मंगळवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान चांदाळा येथील लिलाबाई पामू कोवे, ऋषी किरंगे व माडेमूल येथील रेखाबाई एकनाथ धुर्वा या तीन शेतकऱ्यांना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांच्या हस्ते थकीत कर्ज निरंक झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी बँकेचे निरिक्षक एम. डी. रहाटे, चांदाळा आविका संस्थेचे व्यवस्थापक पी. व्ही. दोनाडकर उपस्थित होते. ज्या शेतकºयांचे कर्जमाफ झाले आहे. अशा शेतकºयांना पुढील खरीप हंगामासाठी नवीन कर्ज घेता येणार आहे, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी दिली.३५ हजार शेतकरी ग्रीन यादीतसर्वच बँकांचे कर्जदार असलेल्या कर्जमाफी योजनेची निकष पूर्ण करणाऱ्या ३५ हजार ४०३ शेतकºयांची नावे ग्रीन यादीत आहेत. यामध्ये १५ हजार ४५६ शेतकरी नियमित कर्जफेड करणारे आहेत. ९९४ शेतकरी एकरकमी कर्जाची परतफेड करणारे आहेत. तर १९ हजार ९४७ शेतकरी थकीत कर्जदार आहेत. या सर्वांना त्यांच्या निकषाप्रमाणे कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. जिल्ह्यातील ७७ लाख शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. नावांची पुनर्रावृत्ती वगळून ६९ लाख शेतकºयांचे अर्ज पात्र ठरले.