शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या कल चाचणीची डेडलाईन १८ जानेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST

महाराष्ट्रराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कल व अभिक्षमता चाचणी आयोजित करण्यात आली आहे. या चाचणीची सुरूवात २७ डिसेंबर २०१९ पासून शाळास्तरावर करण्यात आली आहे. १८ जानेवारी २०२० पर्यंत ही कल व अभिक्षमता चाचणी सर्व शाळांना आटोपून घ्यावयाची आहे. तसे शिक्षण मंडळाचे निर्देश आहेत. मार्च २०२० मध्ये राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने शालांत प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा देणाऱ्या इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना कल व अभिक्षमता चाचणी देणे आवश्यक आहे. सदर चाचणी ही मोबाईल व कम्पुटरद्वारे घेतली जात आहे.

ठळक मुद्देशिक्षण मंडळाचे निर्देश : जिल्ह्यातील १५ हजार ५४९ विद्यार्थी देताहेत परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्रराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कल व अभिक्षमता चाचणी आयोजित करण्यात आली आहे. या चाचणीची सुरूवात २७ डिसेंबर २०१९ पासून शाळास्तरावर करण्यात आली आहे. १८ जानेवारी २०२० पर्यंत ही कल व अभिक्षमता चाचणी सर्व शाळांना आटोपून घ्यावयाची आहे. तसे शिक्षण मंडळाचे निर्देश आहेत.मार्च २०२० मध्ये राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने शालांत प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा देणाऱ्या इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना कल व अभिक्षमता चाचणी देणे आवश्यक आहे. सदर चाचणी ही मोबाईल व कम्पुटरद्वारे घेतली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात यंदाच्या शैक्षणिक सत्रात इयत्ता दहावीचे एकूण १५ हजार ५४९ विद्यार्थी आहेत. हे सर्व विद्यार्थी कल व अभिक्षमता चाचणीत सहभागी होत आहेत. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या पुढाकाराने आणि श्यामची आई फाऊंडेशनच्या सहकार्याने ही कलचाचणी घेण्यात येत आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या शेवटच्या पेपरच्या दिवशी विद्यार्थ्यांनी दिलेल्या कल चाचणीचा अहवाल देण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या आवडीचे क्षेत्र, त्या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी, त्या क्षेत्रातील उच्च शिक्षण व शिक्षण संस्थांची माहिती याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. संस्थेचे विभाग प्रमुख संभाजी भोजने, पुनित मातकर, सुनील उंदीरवाडे, प्रभाकर साखरे हे जबाबदारी सांभाळत आहेत.सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्या- पाटीलशिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना कल व अभिक्षमता चाचणीत सहभागी करून घेण्याची जबाबदारी संबंधित शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांचा या चाचणीत सहभागी करून भविष्यातील त्यांचा उच्च शिक्षणाचा मार्ग प्रशस्त करावा, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शरदचंद्र पाटील यांनी केले आहे.आतापर्यंत सात हजार विद्यार्थ्यांनी दिली कलचाचणीगडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळांच्या इयत्ता दहावीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कल व अभिक्षमता चाचणी घेतली जात आहे. जिल्ह्यात २७ डिसेंबर २०१९ पासून ही चाचणी शाळांमध्ये सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत इयत्ता दहावीच्या सात हजार विद्यार्थ्यांनी ही कलचाचणी दिली आहे. या परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ४५ आहे. उर्वरित ५५ टक्के विद्यार्थ्यांची कलचाचणी शाळास्तरावर सुरू आहे. शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक या चाचणीच्या कामात गेल्या चार-पाच दिवसांपासून व्यस्त आहेत. विद्यार्थ्यांमधील अभिक्षमता तपासणीसाठी व त्याचा कला जाणून घेण्यासाठी शिक्षण मंडळाच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांची चाचणी घेतली जात आहे.

 

 

टॅग्स :Studentविद्यार्थी