शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

दहावीच्या कल चाचणीची डेडलाईन १८ जानेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST

महाराष्ट्रराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कल व अभिक्षमता चाचणी आयोजित करण्यात आली आहे. या चाचणीची सुरूवात २७ डिसेंबर २०१९ पासून शाळास्तरावर करण्यात आली आहे. १८ जानेवारी २०२० पर्यंत ही कल व अभिक्षमता चाचणी सर्व शाळांना आटोपून घ्यावयाची आहे. तसे शिक्षण मंडळाचे निर्देश आहेत. मार्च २०२० मध्ये राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने शालांत प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा देणाऱ्या इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना कल व अभिक्षमता चाचणी देणे आवश्यक आहे. सदर चाचणी ही मोबाईल व कम्पुटरद्वारे घेतली जात आहे.

ठळक मुद्देशिक्षण मंडळाचे निर्देश : जिल्ह्यातील १५ हजार ५४९ विद्यार्थी देताहेत परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्रराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कल व अभिक्षमता चाचणी आयोजित करण्यात आली आहे. या चाचणीची सुरूवात २७ डिसेंबर २०१९ पासून शाळास्तरावर करण्यात आली आहे. १८ जानेवारी २०२० पर्यंत ही कल व अभिक्षमता चाचणी सर्व शाळांना आटोपून घ्यावयाची आहे. तसे शिक्षण मंडळाचे निर्देश आहेत.मार्च २०२० मध्ये राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने शालांत प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा देणाऱ्या इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना कल व अभिक्षमता चाचणी देणे आवश्यक आहे. सदर चाचणी ही मोबाईल व कम्पुटरद्वारे घेतली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात यंदाच्या शैक्षणिक सत्रात इयत्ता दहावीचे एकूण १५ हजार ५४९ विद्यार्थी आहेत. हे सर्व विद्यार्थी कल व अभिक्षमता चाचणीत सहभागी होत आहेत. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या पुढाकाराने आणि श्यामची आई फाऊंडेशनच्या सहकार्याने ही कलचाचणी घेण्यात येत आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या शेवटच्या पेपरच्या दिवशी विद्यार्थ्यांनी दिलेल्या कल चाचणीचा अहवाल देण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या आवडीचे क्षेत्र, त्या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी, त्या क्षेत्रातील उच्च शिक्षण व शिक्षण संस्थांची माहिती याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. संस्थेचे विभाग प्रमुख संभाजी भोजने, पुनित मातकर, सुनील उंदीरवाडे, प्रभाकर साखरे हे जबाबदारी सांभाळत आहेत.सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्या- पाटीलशिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना कल व अभिक्षमता चाचणीत सहभागी करून घेण्याची जबाबदारी संबंधित शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांचा या चाचणीत सहभागी करून भविष्यातील त्यांचा उच्च शिक्षणाचा मार्ग प्रशस्त करावा, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शरदचंद्र पाटील यांनी केले आहे.आतापर्यंत सात हजार विद्यार्थ्यांनी दिली कलचाचणीगडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळांच्या इयत्ता दहावीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कल व अभिक्षमता चाचणी घेतली जात आहे. जिल्ह्यात २७ डिसेंबर २०१९ पासून ही चाचणी शाळांमध्ये सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत इयत्ता दहावीच्या सात हजार विद्यार्थ्यांनी ही कलचाचणी दिली आहे. या परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ४५ आहे. उर्वरित ५५ टक्के विद्यार्थ्यांची कलचाचणी शाळास्तरावर सुरू आहे. शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक या चाचणीच्या कामात गेल्या चार-पाच दिवसांपासून व्यस्त आहेत. विद्यार्थ्यांमधील अभिक्षमता तपासणीसाठी व त्याचा कला जाणून घेण्यासाठी शिक्षण मंडळाच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांची चाचणी घेतली जात आहे.

 

 

टॅग्स :Studentविद्यार्थी