शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

पहाटेपासूनच सुरू होतात शेतीची कामे

By admin | Updated: May 22, 2016 01:06 IST

गेल्या चार दिवसांपासून विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यातही तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढला असून

वाढत्या उष्णतेचा परिणाम : दुपारी रस्ते होत आहेत ओस; शीतपेयांची विक्री वाढलीगडचिरोली : गेल्या चार दिवसांपासून विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यातही तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढला असून शहरी व ग्रामीण भागात रस्ते निर्मनुष्य झाले आहे. शहरी भागात वाढत्या उष्णतामानापासून बचाव करण्यासाठी नागरिक शीतपेय मोठ्या प्रमाणावर खरेदी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मे महिन्यात यावर्षी दुसऱ्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह अकाली पाऊस झाला. त्यानंतर वातावरणातील उकाडा एकदम वाढला. दमट स्वरूपाचे हवामान निर्माण झाले व गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यात प्रचंड उष्णतामान वाढले आहे. विदर्भाचा उष्णतामानाचा पारा ४६ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचला आहे. गडचिरोली जिल्ह्यात तापमान मोजण्याची कुठेही व्यवस्था नाही. मात्र काही हौशी नागरिकांनी वेबसाईटवर गडचिरोलीच्या तापमानाची नोंद ४६ डिग्री सेल्सिसीअस दाखविण्यात आल्याची माहिती लोकमतशी बोलताना दिली. एकूणच गेल्या दोन-चार दिवसात तापमान प्रचंड वाढले असल्याने खरीप हंगामासाठी शेती मशागतीची कामे करणाऱ्या शेतकऱ्यांच्याही कामावर परिणाम झाला आहे. सकाळी १० वाजतापासूनच उन्हाच्या झळा जाणवत असल्याने अनेक शेतकरी आता पहाटेच शेतात जाऊन सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत काम आटोपतात. रात्रीही १० वाजेपर्यंत उष्णतामान वाढूनच राहत असल्याचे दिसून येत आहे. शहरातही दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत असून कुलर व वातानुकुलीत यंत्रणेचा वापर अचानक वाढल्यामुळे महावितरण कंपनीचा वीज पुरवठाही अनेक वेळा काही वेळासाठी खंडित होण्याचा प्रकार गेल्या चार-पाच दिवसांत वाढला आहे. वाढत्या उष्णतामानापासून बचाव करण्यासाठी नागरिक शीतपेय व थंड पाण्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पाणी पाऊचची विक्रीही वाढली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)