शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पहाटेपासूनच सुरू होतात शेतीची कामे

By admin | Updated: May 22, 2016 01:06 IST

गेल्या चार दिवसांपासून विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यातही तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढला असून

वाढत्या उष्णतेचा परिणाम : दुपारी रस्ते होत आहेत ओस; शीतपेयांची विक्री वाढलीगडचिरोली : गेल्या चार दिवसांपासून विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यातही तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढला असून शहरी व ग्रामीण भागात रस्ते निर्मनुष्य झाले आहे. शहरी भागात वाढत्या उष्णतामानापासून बचाव करण्यासाठी नागरिक शीतपेय मोठ्या प्रमाणावर खरेदी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मे महिन्यात यावर्षी दुसऱ्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह अकाली पाऊस झाला. त्यानंतर वातावरणातील उकाडा एकदम वाढला. दमट स्वरूपाचे हवामान निर्माण झाले व गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यात प्रचंड उष्णतामान वाढले आहे. विदर्भाचा उष्णतामानाचा पारा ४६ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचला आहे. गडचिरोली जिल्ह्यात तापमान मोजण्याची कुठेही व्यवस्था नाही. मात्र काही हौशी नागरिकांनी वेबसाईटवर गडचिरोलीच्या तापमानाची नोंद ४६ डिग्री सेल्सिसीअस दाखविण्यात आल्याची माहिती लोकमतशी बोलताना दिली. एकूणच गेल्या दोन-चार दिवसात तापमान प्रचंड वाढले असल्याने खरीप हंगामासाठी शेती मशागतीची कामे करणाऱ्या शेतकऱ्यांच्याही कामावर परिणाम झाला आहे. सकाळी १० वाजतापासूनच उन्हाच्या झळा जाणवत असल्याने अनेक शेतकरी आता पहाटेच शेतात जाऊन सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत काम आटोपतात. रात्रीही १० वाजेपर्यंत उष्णतामान वाढूनच राहत असल्याचे दिसून येत आहे. शहरातही दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत असून कुलर व वातानुकुलीत यंत्रणेचा वापर अचानक वाढल्यामुळे महावितरण कंपनीचा वीज पुरवठाही अनेक वेळा काही वेळासाठी खंडित होण्याचा प्रकार गेल्या चार-पाच दिवसांत वाढला आहे. वाढत्या उष्णतामानापासून बचाव करण्यासाठी नागरिक शीतपेय व थंड पाण्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पाणी पाऊचची विक्रीही वाढली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)