शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष तोडीमुळे वन्यजीवांची वस्तीस्थाने सापडली धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:02 IST

वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलमान्वये वन्यजीवांची वस्तीस्थाने अथवा वावर असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करता येणार नाही, अशी स्पष्ट तरतूद आहे. मात्र या कायद्याचे उल्लंघन करून सर्रास वृक्षतोड सुरू असल्याने वैरागड परिसरासह अनेक भागात वन्यजीवांची वस्तीस्थाने धोक्यात आली आहे.

ठळक मुद्देवाईल्ड लाईट ट्रस्टने व्यक्ती केली चिंता । जंगलातील पाण्याचे स्रोतही नष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलमान्वये वन्यजीवांची वस्तीस्थाने अथवा वावर असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करता येणार नाही, अशी स्पष्ट तरतूद आहे. मात्र या कायद्याचे उल्लंघन करून सर्रास वृक्षतोड सुरू असल्याने वैरागड परिसरासह अनेक भागात वन्यजीवांची वस्तीस्थाने धोक्यात आली आहे.वनांचा विकास करणे हे वन विकास महामंडळाचे काम आहे. मात्र मागील पाच-सहा वर्षांपासून वडसा तालुक्यातील विहीरगाव, चिखली रिठ तसेच कुरखेडा तालुक्यातील शिरपूर, भगवानपूर, सावलखेडा आणि आरमोरी तालुक्यातील सालमारा, वैरागड येथील घनदाट जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली. १० वर्षांपूर्वी घनदाट दिसणारे जंगले आता उजाड माळरान झाली आहेत. या घनदाट जंगलात वाघ, हरिण, नीलगाय, अस्वल तसेच अन्य वन्यजीवांची निवासस्थान होते. हे निवासस्थान आता नष्ट झाले आहे. याला एफडीसीएमचे धोरण जबाबदार आहे, असा आरोप संबंधित गावाच्या वनसंरक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.वन्यप्राणी, वन व जैविक विविधता यावर प्रतिकूल परिणाम करणारी कोणतीही कृती थांबविण्यासाठी ग्रामसभेने घेतलेल्या निर्णयाचे अनुपालन करणे बंधनकारक आहे. असे असताना सुद्धा एफडीसीएमच्या वृक्षतोडीला ग्रामसभेने विरोध केला असता, संबंधित लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन बळाचा वापर करून वृक्षतोडीचे काम सुरूच ठेवण्यात आले. एफडीसीएमतर्फे जिल्ह्याच्या विविध भागात वृक्षतोडीचे काम सुरूच आहे. ही वृक्षतोड थांबवून वन व वन्यजीवांचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी शिरपूर, भगवानपूर, वैरागड येथील नागरिकांनी केली आहे. जंगले विरळ झाले व जंगलात मानवी हस्तक्षेप वाढल्याने वन्यजीव रस्त्यावर येत आहे. उन्हाळ्यात जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने प्राणी गावाकडे धाव घेत आहे.वन्यजीवांच्या अस्तित्वासाठी जनजागृती हवीपाण्याच्या शोधात अनेक वन्यप्राणी गावालगतच्या पाणवठ्याच्या ठिकाणी आपली तहान भागविण्याकरिता येतात. अशा ठिकाणी शिकारी दबा धरून बसतात. परिणामी वन्यजीव मानवी फाशात अडकतात. हे सर्व प्रकार बंद होण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे, असे मत वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया महाराष्टÑाचे प्रभारी प्रफुल भाबुरकर व विदर्भ समन्वयक अनिल कुमार यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी १६ ते रोजी कुरखेडा, आरमोरी, वडसा तालुक्यातील वनक्षेत्राचा दौरा करून पाहणी केली होती.

टॅग्स :forestजंगलwildlifeवन्यजीव