शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
3
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
4
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
7
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
8
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
9
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
10
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
11
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
12
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
13
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
14
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
15
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
16
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
17
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
18
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
19
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
20
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू

वृक्ष तोडीमुळे वन्यजीवांची वस्तीस्थाने सापडली धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:02 IST

वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलमान्वये वन्यजीवांची वस्तीस्थाने अथवा वावर असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करता येणार नाही, अशी स्पष्ट तरतूद आहे. मात्र या कायद्याचे उल्लंघन करून सर्रास वृक्षतोड सुरू असल्याने वैरागड परिसरासह अनेक भागात वन्यजीवांची वस्तीस्थाने धोक्यात आली आहे.

ठळक मुद्देवाईल्ड लाईट ट्रस्टने व्यक्ती केली चिंता । जंगलातील पाण्याचे स्रोतही नष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलमान्वये वन्यजीवांची वस्तीस्थाने अथवा वावर असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करता येणार नाही, अशी स्पष्ट तरतूद आहे. मात्र या कायद्याचे उल्लंघन करून सर्रास वृक्षतोड सुरू असल्याने वैरागड परिसरासह अनेक भागात वन्यजीवांची वस्तीस्थाने धोक्यात आली आहे.वनांचा विकास करणे हे वन विकास महामंडळाचे काम आहे. मात्र मागील पाच-सहा वर्षांपासून वडसा तालुक्यातील विहीरगाव, चिखली रिठ तसेच कुरखेडा तालुक्यातील शिरपूर, भगवानपूर, सावलखेडा आणि आरमोरी तालुक्यातील सालमारा, वैरागड येथील घनदाट जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली. १० वर्षांपूर्वी घनदाट दिसणारे जंगले आता उजाड माळरान झाली आहेत. या घनदाट जंगलात वाघ, हरिण, नीलगाय, अस्वल तसेच अन्य वन्यजीवांची निवासस्थान होते. हे निवासस्थान आता नष्ट झाले आहे. याला एफडीसीएमचे धोरण जबाबदार आहे, असा आरोप संबंधित गावाच्या वनसंरक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.वन्यप्राणी, वन व जैविक विविधता यावर प्रतिकूल परिणाम करणारी कोणतीही कृती थांबविण्यासाठी ग्रामसभेने घेतलेल्या निर्णयाचे अनुपालन करणे बंधनकारक आहे. असे असताना सुद्धा एफडीसीएमच्या वृक्षतोडीला ग्रामसभेने विरोध केला असता, संबंधित लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन बळाचा वापर करून वृक्षतोडीचे काम सुरूच ठेवण्यात आले. एफडीसीएमतर्फे जिल्ह्याच्या विविध भागात वृक्षतोडीचे काम सुरूच आहे. ही वृक्षतोड थांबवून वन व वन्यजीवांचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी शिरपूर, भगवानपूर, वैरागड येथील नागरिकांनी केली आहे. जंगले विरळ झाले व जंगलात मानवी हस्तक्षेप वाढल्याने वन्यजीव रस्त्यावर येत आहे. उन्हाळ्यात जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने प्राणी गावाकडे धाव घेत आहे.वन्यजीवांच्या अस्तित्वासाठी जनजागृती हवीपाण्याच्या शोधात अनेक वन्यप्राणी गावालगतच्या पाणवठ्याच्या ठिकाणी आपली तहान भागविण्याकरिता येतात. अशा ठिकाणी शिकारी दबा धरून बसतात. परिणामी वन्यजीव मानवी फाशात अडकतात. हे सर्व प्रकार बंद होण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे, असे मत वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया महाराष्टÑाचे प्रभारी प्रफुल भाबुरकर व विदर्भ समन्वयक अनिल कुमार यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी १६ ते रोजी कुरखेडा, आरमोरी, वडसा तालुक्यातील वनक्षेत्राचा दौरा करून पाहणी केली होती.

टॅग्स :forestजंगलwildlifeवन्यजीव