शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

दिना नदीच्या पाण्यातून धोकादायक प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:27 IST

दिना नदीवर पूल नसल्याने अनेक नागरिक जीव धोक्यात घालून दिना नदीच्या पाण्यातूनच मार्ग काढतात. पूल बांधण्याची मागणी होत असली तरी याकडे दुर्लक्ष झाले आहे. एटापल्ली तालुक्यातील बहुतांश नागरिक जिल्हा मुख्यालयाकडे जाण्यासाठी रेगडी-देवदा या मार्गाचा वापर करतात.

ठळक मुद्देपूल निर्मितीची मागणी : एटापल्लीतील नागरिक याच मार्गाने गाठतात जिल्हा मुख्यालय

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : दिना नदीवर पूल नसल्याने अनेक नागरिक जीव धोक्यात घालून दिना नदीच्या पाण्यातूनच मार्ग काढतात. पूल बांधण्याची मागणी होत असली तरी याकडे दुर्लक्ष झाले आहे.एटापल्ली तालुक्यातील बहुतांश नागरिक जिल्हा मुख्यालयाकडे जाण्यासाठी रेगडी-देवदा या मार्गाचा वापर करतात. सदर मार्ग अतिशय सरळ आहे. त्यामुळे वेळ व पैसा दोन्हीचीही बचत होते. आलापल्ली मार्गाने गेल्यास १०० रूपये अधिक खर्च येतो व दोन तास उशीर सुध्दा होतो. वेळ व पैशाची बचत करण्यासाठी नागरिक रेगडी-देवदा मार्गे येतात. या मार्गावर दिना नदी आहे. या नदीवर पूल नाही. परिणामी नागरिकांना दिना नदीच्या पाण्यातूनच पुढे मार्गक्रमण करावे लागते. दिना नदीवर बांधलेल्या कन्नमवार जलाशय ओव्हरफ्लो होऊन वाहण्यास सुरूवात झाल्यानंतर या नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढते. मात्र पर्याय नसल्याने नागरिक नदीच्या पाण्यातून प्रवास करतात. कधीकाळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पावसाळ्यानंतर कामाला सुरुवातदिना नदीवरील हा पूल अत्यंत महत्त्वाचा असल्याने एटापल्ली व घोट परिसरातील नागरिकांकडून सदर पूल बांधण्याची मागणी वेळोवेळी केली जात होती. याची दखल घेऊन पुलाचे अंदाजपत्रक पोलीस अधीक्षक कार्यालयाला पाठविण्यात आले आहे. पावसाळा झाल्यानंतर पुलाचे सर्वेक्षण करण्याच्या कामाला सुरूवात होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग चामोर्शीचे सहायक अभियंता नितीन हेडाऊ यांनी दिली आहे.२००९-१० मध्ये पूल निर्मितीसाठी शासनाने अडीच कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता. हे काम चामोर्शी येथील एका कंपनीला देण्यात आले होते. मात्र नक्षल्यांनी पुलाच्या कामाला विरोध केला. त्यामुळे कंत्राटदाराने काम बंद केले.

टॅग्स :floodपूरriverनदी