शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

दिना नदीच्या पाण्यातून धोकादायक प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:27 IST

दिना नदीवर पूल नसल्याने अनेक नागरिक जीव धोक्यात घालून दिना नदीच्या पाण्यातूनच मार्ग काढतात. पूल बांधण्याची मागणी होत असली तरी याकडे दुर्लक्ष झाले आहे. एटापल्ली तालुक्यातील बहुतांश नागरिक जिल्हा मुख्यालयाकडे जाण्यासाठी रेगडी-देवदा या मार्गाचा वापर करतात.

ठळक मुद्देपूल निर्मितीची मागणी : एटापल्लीतील नागरिक याच मार्गाने गाठतात जिल्हा मुख्यालय

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : दिना नदीवर पूल नसल्याने अनेक नागरिक जीव धोक्यात घालून दिना नदीच्या पाण्यातूनच मार्ग काढतात. पूल बांधण्याची मागणी होत असली तरी याकडे दुर्लक्ष झाले आहे.एटापल्ली तालुक्यातील बहुतांश नागरिक जिल्हा मुख्यालयाकडे जाण्यासाठी रेगडी-देवदा या मार्गाचा वापर करतात. सदर मार्ग अतिशय सरळ आहे. त्यामुळे वेळ व पैसा दोन्हीचीही बचत होते. आलापल्ली मार्गाने गेल्यास १०० रूपये अधिक खर्च येतो व दोन तास उशीर सुध्दा होतो. वेळ व पैशाची बचत करण्यासाठी नागरिक रेगडी-देवदा मार्गे येतात. या मार्गावर दिना नदी आहे. या नदीवर पूल नाही. परिणामी नागरिकांना दिना नदीच्या पाण्यातूनच पुढे मार्गक्रमण करावे लागते. दिना नदीवर बांधलेल्या कन्नमवार जलाशय ओव्हरफ्लो होऊन वाहण्यास सुरूवात झाल्यानंतर या नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढते. मात्र पर्याय नसल्याने नागरिक नदीच्या पाण्यातून प्रवास करतात. कधीकाळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पावसाळ्यानंतर कामाला सुरुवातदिना नदीवरील हा पूल अत्यंत महत्त्वाचा असल्याने एटापल्ली व घोट परिसरातील नागरिकांकडून सदर पूल बांधण्याची मागणी वेळोवेळी केली जात होती. याची दखल घेऊन पुलाचे अंदाजपत्रक पोलीस अधीक्षक कार्यालयाला पाठविण्यात आले आहे. पावसाळा झाल्यानंतर पुलाचे सर्वेक्षण करण्याच्या कामाला सुरूवात होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग चामोर्शीचे सहायक अभियंता नितीन हेडाऊ यांनी दिली आहे.२००९-१० मध्ये पूल निर्मितीसाठी शासनाने अडीच कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता. हे काम चामोर्शी येथील एका कंपनीला देण्यात आले होते. मात्र नक्षल्यांनी पुलाच्या कामाला विरोध केला. त्यामुळे कंत्राटदाराने काम बंद केले.

टॅग्स :floodपूरriverनदी