संजय गज्जलवार।लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : अहेरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात कोणतेही उद्योगधंदे नसल्याने कापूस व मिरची तोडणीच्या कामासाठी हजारो मजूर तेलंगणा राज्यात गेले. कोरोनाच्या संचारबंदीने मजूर अडकून पडले. मात्र आता घराच्या ओढीने मजुरांना स्वस्थ बसू दिले नाही. त्यामुळे देचलीपेठा परिसरातील ४०० पेक्षा अधिक मजूर काही दिवसांपूर्वी छुप्या मार्गाने स्व:गावी परतले आहेत. या मजुरांमुळे कोरोना संसर्गाचा धोका होण्याची शक्यता वाढली आहे.महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचा संसर्ग व प्रभाव वाढत असल्याने शासनाने संचारबंदीची मुदतही वाढविली आहे. दरम्यान तेलंगणा राज्यात मिरची व कापूस तोडणीच्या कामासाठी गेलेले हजारो मजूर अडकून पडले. कोरोनाचे संकट अद्यापही न टळल्याने लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्वत:च्या गावापासून दूर राहणाऱ्या मजुरांना हालअपेष्ठा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे मिळेल त्या छुप्या मार्गाने वाट काढत मजूर स्वत:च्या गावाकडे परतत आहेत. तेलंगणातून देचलीपेठा परिसरात ४०० पेक्षा अधिक मजूर छुप्या मार्गाने स्व:गावी परतले. या सर्व मजुरांना जिमलगट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने हातावर होम क्वॉरंटाईनचे शिक्के मारून त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे.महाराष्ट्र व तेलंगणाच्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त असला तरी जिमलगट्टा परिसरातील मजूर रेगुंठा-मोयाबिनपेठा-नेमडा अशा नदीमार्गाने पायी येत आहेत. दिवसरात्र एक करून १५ ते २० मजूर दररोज जिमलगट्टा परिसरात स्व:गावी परत येत असल्याची माहिती आहे. तेलंगणात कोरोनाचा प्रभाव असल्याने परराज्यातून जिमलगट्टा भागात स्वत:च्या गावाकडे येणाऱ्या मजुरांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्वगावी परतणाऱ्या मजुरांमुळे धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:00 IST
लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्वत:च्या गावापासून दूर राहणाऱ्या मजुरांना हालअपेष्ठा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे मिळेल त्या छुप्या मार्गाने वाट काढत मजूर स्वत:च्या गावाकडे परतत आहेत. तेलंगणातून देचलीपेठा परिसरात ४०० पेक्षा अधिक मजूर छुप्या मार्गाने स्व:गावी परतले. या सर्व मजुरांना जिमलगट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने हातावर होम क्वॉरंटाईनचे शिक्के मारून त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे.
स्वगावी परतणाऱ्या मजुरांमुळे धोका
ठळक मुद्देहोम क्वॉरंटाईनचे शिक्के : दुसऱ्या राज्यात अडकलेले अनेक मजूर परत येत आहेत जिमलगट्टा भागात