शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

अहेरी उपविभागात १८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 17:20 IST

१३२ घरे कोसळली : अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दहा दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने जिल्हाभर दाणादाण उडवली आहे. यामुळे सर्वाधिक हानी दक्षिण गडचिरोलीत झाली आहे. तब्बल १३२ घरे कोसळली, १६ जनावरे दगावली असून सुमारे १८ हजार हेक्टरवरील पिके मातीमोल झाल्याची माहिती उजेडात आली आहे. जिल्ह्यात १८ जुलैपासून पाऊस सुरू आहे. २८ जुलै अखेरपर्यंत अहेरी उपविभागातील चार तालुक्यांत झालेल्या नुकसानीचा अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी आढावा घेतला.

गोसेखुर्द धरणातून वाढलेला विसर्ग व प्रमुख नद्यांना आलेला पूर यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. नदी- नाल्यांकाठच्या जमिनी पाण्याखाली गेल्या. त्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला. भामरागडमधील पर्लकोटा नदीला महापूर आला असून पुलावरुन पाणी वाहत असल्याने शहराचा संपर्क तुटलेला आहे. परिसरातील शेकडो आदिवासी पाडे व गावांना जोडणारे नाले पाण्याखाली गेले आहेत. रस्ते, रपटे वाहून गेल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

कोठे किती नुकसानतालुका                  क्षतीग्रस्त घरे                    मृत जनावरेअहेरी                           ४०                                    ०७सिरोंचा                         ८६                                    ०६एटापल्ली                     ०४                                     ०७भामरागड                      ०२                                     ०१

पिकांचे नुकसान असे...तालुका             कापूस (हे.)            धान (हे.)अहेरी                   ३८६०                      २४७०सिरोंचा                 ५७९९                      १३१८ एटापल्ली              ००                          २७७०भामरागड              ००                          १७१९

पीक विमा दावे नाकारु नका, अन्यथा कारवाईयावेळी पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडूनही आढावा घेण्यात आला. धान पिकाची भरपाई कंपनीकडून दिली जात नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी कुठल्याही स्थितीत शेतकऱ्यांना भरपाई नाकारु नका, त्यांचे दावे मंजूर करून योग्य ती भरपाई विनाविलंब अदा करा, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.

पंचनामे करून अहवाल द्यादरम्यान, अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी सर्व तालुक्यांच्या तहसीलदारांशी दूरभाष्यप्रणालीद्वारे संवाद साधून आढावा घेतला, यावेळी नैसर्गिक आपत्ती नियमावलीनुसार पंचनामे करुन झालेल्या नुकसानीचा सविस्तर अहवाल सादर करा, असे निर्देश त्यांनी दिले.

"अहेरी उपविभागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहेत. याशिवाय पीक विमा कंपनीलाही दावे नाकारू नयेत, अशी ताकीद दिली आहे. राज्य आपत्ती निवारण पथके तैनात आहेत. कोठेही अप्रिय घटना घडू नये, यासाठी प्रशासन सज्ज आहे. ३१ जुलैपर्यंत पीक विमा भरण्याची मुदत आहे. शेतकऱ्यांनी अधिकाधिक पीक विमा काढावा."- विजय भाकरे, अपर जिल्हाधिकारी अहेरी 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीfloodपूरfarmingशेती