शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अहेरी उपविभागात १८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 17:20 IST

१३२ घरे कोसळली : अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दहा दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने जिल्हाभर दाणादाण उडवली आहे. यामुळे सर्वाधिक हानी दक्षिण गडचिरोलीत झाली आहे. तब्बल १३२ घरे कोसळली, १६ जनावरे दगावली असून सुमारे १८ हजार हेक्टरवरील पिके मातीमोल झाल्याची माहिती उजेडात आली आहे. जिल्ह्यात १८ जुलैपासून पाऊस सुरू आहे. २८ जुलै अखेरपर्यंत अहेरी उपविभागातील चार तालुक्यांत झालेल्या नुकसानीचा अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी आढावा घेतला.

गोसेखुर्द धरणातून वाढलेला विसर्ग व प्रमुख नद्यांना आलेला पूर यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. नदी- नाल्यांकाठच्या जमिनी पाण्याखाली गेल्या. त्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला. भामरागडमधील पर्लकोटा नदीला महापूर आला असून पुलावरुन पाणी वाहत असल्याने शहराचा संपर्क तुटलेला आहे. परिसरातील शेकडो आदिवासी पाडे व गावांना जोडणारे नाले पाण्याखाली गेले आहेत. रस्ते, रपटे वाहून गेल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

कोठे किती नुकसानतालुका                  क्षतीग्रस्त घरे                    मृत जनावरेअहेरी                           ४०                                    ०७सिरोंचा                         ८६                                    ०६एटापल्ली                     ०४                                     ०७भामरागड                      ०२                                     ०१

पिकांचे नुकसान असे...तालुका             कापूस (हे.)            धान (हे.)अहेरी                   ३८६०                      २४७०सिरोंचा                 ५७९९                      १३१८ एटापल्ली              ००                          २७७०भामरागड              ००                          १७१९

पीक विमा दावे नाकारु नका, अन्यथा कारवाईयावेळी पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडूनही आढावा घेण्यात आला. धान पिकाची भरपाई कंपनीकडून दिली जात नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी कुठल्याही स्थितीत शेतकऱ्यांना भरपाई नाकारु नका, त्यांचे दावे मंजूर करून योग्य ती भरपाई विनाविलंब अदा करा, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.

पंचनामे करून अहवाल द्यादरम्यान, अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी सर्व तालुक्यांच्या तहसीलदारांशी दूरभाष्यप्रणालीद्वारे संवाद साधून आढावा घेतला, यावेळी नैसर्गिक आपत्ती नियमावलीनुसार पंचनामे करुन झालेल्या नुकसानीचा सविस्तर अहवाल सादर करा, असे निर्देश त्यांनी दिले.

"अहेरी उपविभागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहेत. याशिवाय पीक विमा कंपनीलाही दावे नाकारू नयेत, अशी ताकीद दिली आहे. राज्य आपत्ती निवारण पथके तैनात आहेत. कोठेही अप्रिय घटना घडू नये, यासाठी प्रशासन सज्ज आहे. ३१ जुलैपर्यंत पीक विमा भरण्याची मुदत आहे. शेतकऱ्यांनी अधिकाधिक पीक विमा काढावा."- विजय भाकरे, अपर जिल्हाधिकारी अहेरी 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीfloodपूरfarmingशेती