शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पाऊस व गारपिटीने रबी पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:33 IST

१५ फेब्रुवारी रोजी शुक्रवारला रात्री झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे तसेच गारपीटीमुळे कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा भागात तसेच वैरागड परिसरात रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहे.

ठळक मुद्देझाडे पडून वीज तारा तुटल्या : वैरागड व मालेवाडा भागाला वादळाचा तडाखा

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा/वैरागड : १५ फेब्रुवारी रोजी शुक्रवारला रात्री झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे तसेच गारपीटीमुळे कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा भागात तसेच वैरागड परिसरात रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहे. वादळी पावसामुळे वैरागड भागातील १० गावातील वीज पुरवठा गेल्या २४ तासापासून खंडीत झाला आहे.कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा परिसरातील शेतकरी अनेक वर्षांपासून मिरची, मक्का तसेच इतर कडधान्याच्या पिकांची रब्बी हंगामात लागवड करतात. विदभार्तील व्यापारी या परिसरातील मिरची तसेच मक्क्याची मोठ्या प्रमाणात मागणी करतात. यामुळे रविवारी राहत असलेल्या आठवडी बाजारात शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला भाव मिळतो. मात्र शेतकºयांना नगदी उत्पन्न देणारे मक्का आणि मिरचीचे पिक पाऊस व गारपीटीमुळे उद्ध्वस्त झाले आहेत. सोबतच तूर, हरभरा, जवस, मसूर, उडीद, मूग, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानीचे सर्व्हेक्षण करावे, तहसीलदारांनी प्रत्यक्ष शेतावर येवून पाहणी करावी. तहसीलदार आल्याशिवाय तलाठी कार्यालयात जावून माहिती देणार नाही, असा पवित्रा शेतकºयांनी घेतला. यामुळे तहसीलदार चव्हाण यांनी मालेवाडा येथे भेट देवून शेतकºयांशी चर्चा केली.यावेळी तहसीलदारांना निवेदन देवून एकरी ४० हजार रुपए नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. तहसीलदारांनी शेतीची पाहणी करून सबंधितांना पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.१५ फेब्रुवारी रोजी शुक्रवारला झालेल्या अवकाळी वादळी पाऊस तसेच गारपिटीमुळे वैरागड भागातील रबी पिकांची हानी झाली. वादळामुळे रस्त्यावर झाडे तुटून वीज तारा तुटल्या. यामुळे गेल्या २४ तासापासून वैरागड भागाच्या १० गावातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. वादळाच्या तडाख्यामुळे वैरागड-रामाळा मार्गावर ठिकठिकाणी झाडे कोसळली असून या मार्गावरील १० वीज खांब तुटून पडले. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजतापासून वीज पुरवठा खंडीत झाला आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वैरागड येथील महावितरणचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. वादळी पावसाचा देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा या तिन्ही तालुक्याला तडाखा बसला. 

टॅग्स :Rainपाऊस