शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
3
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
4
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
5
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
6
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
7
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
8
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
9
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
10
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
11
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
12
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
13
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
14
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
15
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
16
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
17
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
19
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
20
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

वादळी पाऊस व गारपिटीने रबी पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:33 IST

१५ फेब्रुवारी रोजी शुक्रवारला रात्री झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे तसेच गारपीटीमुळे कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा भागात तसेच वैरागड परिसरात रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहे.

ठळक मुद्देझाडे पडून वीज तारा तुटल्या : वैरागड व मालेवाडा भागाला वादळाचा तडाखा

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा/वैरागड : १५ फेब्रुवारी रोजी शुक्रवारला रात्री झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे तसेच गारपीटीमुळे कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा भागात तसेच वैरागड परिसरात रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहे. वादळी पावसामुळे वैरागड भागातील १० गावातील वीज पुरवठा गेल्या २४ तासापासून खंडीत झाला आहे.कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा परिसरातील शेतकरी अनेक वर्षांपासून मिरची, मक्का तसेच इतर कडधान्याच्या पिकांची रब्बी हंगामात लागवड करतात. विदभार्तील व्यापारी या परिसरातील मिरची तसेच मक्क्याची मोठ्या प्रमाणात मागणी करतात. यामुळे रविवारी राहत असलेल्या आठवडी बाजारात शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला भाव मिळतो. मात्र शेतकºयांना नगदी उत्पन्न देणारे मक्का आणि मिरचीचे पिक पाऊस व गारपीटीमुळे उद्ध्वस्त झाले आहेत. सोबतच तूर, हरभरा, जवस, मसूर, उडीद, मूग, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानीचे सर्व्हेक्षण करावे, तहसीलदारांनी प्रत्यक्ष शेतावर येवून पाहणी करावी. तहसीलदार आल्याशिवाय तलाठी कार्यालयात जावून माहिती देणार नाही, असा पवित्रा शेतकºयांनी घेतला. यामुळे तहसीलदार चव्हाण यांनी मालेवाडा येथे भेट देवून शेतकºयांशी चर्चा केली.यावेळी तहसीलदारांना निवेदन देवून एकरी ४० हजार रुपए नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. तहसीलदारांनी शेतीची पाहणी करून सबंधितांना पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.१५ फेब्रुवारी रोजी शुक्रवारला झालेल्या अवकाळी वादळी पाऊस तसेच गारपिटीमुळे वैरागड भागातील रबी पिकांची हानी झाली. वादळामुळे रस्त्यावर झाडे तुटून वीज तारा तुटल्या. यामुळे गेल्या २४ तासापासून वैरागड भागाच्या १० गावातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. वादळाच्या तडाख्यामुळे वैरागड-रामाळा मार्गावर ठिकठिकाणी झाडे कोसळली असून या मार्गावरील १० वीज खांब तुटून पडले. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजतापासून वीज पुरवठा खंडीत झाला आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वैरागड येथील महावितरणचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. वादळी पावसाचा देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा या तिन्ही तालुक्याला तडाखा बसला. 

टॅग्स :Rainपाऊस