शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

वादळी पाऊस व गारपिटीने रबी पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:33 IST

१५ फेब्रुवारी रोजी शुक्रवारला रात्री झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे तसेच गारपीटीमुळे कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा भागात तसेच वैरागड परिसरात रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहे.

ठळक मुद्देझाडे पडून वीज तारा तुटल्या : वैरागड व मालेवाडा भागाला वादळाचा तडाखा

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा/वैरागड : १५ फेब्रुवारी रोजी शुक्रवारला रात्री झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे तसेच गारपीटीमुळे कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा भागात तसेच वैरागड परिसरात रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहे. वादळी पावसामुळे वैरागड भागातील १० गावातील वीज पुरवठा गेल्या २४ तासापासून खंडीत झाला आहे.कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा परिसरातील शेतकरी अनेक वर्षांपासून मिरची, मक्का तसेच इतर कडधान्याच्या पिकांची रब्बी हंगामात लागवड करतात. विदभार्तील व्यापारी या परिसरातील मिरची तसेच मक्क्याची मोठ्या प्रमाणात मागणी करतात. यामुळे रविवारी राहत असलेल्या आठवडी बाजारात शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला भाव मिळतो. मात्र शेतकºयांना नगदी उत्पन्न देणारे मक्का आणि मिरचीचे पिक पाऊस व गारपीटीमुळे उद्ध्वस्त झाले आहेत. सोबतच तूर, हरभरा, जवस, मसूर, उडीद, मूग, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानीचे सर्व्हेक्षण करावे, तहसीलदारांनी प्रत्यक्ष शेतावर येवून पाहणी करावी. तहसीलदार आल्याशिवाय तलाठी कार्यालयात जावून माहिती देणार नाही, असा पवित्रा शेतकºयांनी घेतला. यामुळे तहसीलदार चव्हाण यांनी मालेवाडा येथे भेट देवून शेतकºयांशी चर्चा केली.यावेळी तहसीलदारांना निवेदन देवून एकरी ४० हजार रुपए नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. तहसीलदारांनी शेतीची पाहणी करून सबंधितांना पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.१५ फेब्रुवारी रोजी शुक्रवारला झालेल्या अवकाळी वादळी पाऊस तसेच गारपिटीमुळे वैरागड भागातील रबी पिकांची हानी झाली. वादळामुळे रस्त्यावर झाडे तुटून वीज तारा तुटल्या. यामुळे गेल्या २४ तासापासून वैरागड भागाच्या १० गावातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. वादळाच्या तडाख्यामुळे वैरागड-रामाळा मार्गावर ठिकठिकाणी झाडे कोसळली असून या मार्गावरील १० वीज खांब तुटून पडले. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजतापासून वीज पुरवठा खंडीत झाला आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वैरागड येथील महावितरणचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. वादळी पावसाचा देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा या तिन्ही तालुक्याला तडाखा बसला. 

टॅग्स :Rainपाऊस