शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडून दलित कुटुंबाला त्रास

By admin | Updated: July 14, 2016 01:11 IST

आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबोली गावालगतच्या अतिक्रमीत जमिनीवर गेल्या ४० वर्षांपासून मेश्राम कुटुंबीय शेती कसत आहे.

पोलीस अधीक्षकांकडे तक्रार : दोषींवर कारवाई करण्याची मागणी गडचिरोली : आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबोली गावालगतच्या अतिक्रमीत जमिनीवर गेल्या ४० वर्षांपासून मेश्राम कुटुंबीय शेती कसत आहे. मात्र गावातील पोलीस पाटील व काही नागरिकांनी सदर जमिन स्मशानभूमीच्या कामासाठी मागितली. त्यानंतर मेश्राम कुटुंबीयांनी नकार दिल्याने गावातील काही नागरिकांनी या जमिनीत शेती कसण्यास विरोध करून शेतीपयोगी साहित्य हिसकावून नेले. त्यानंतर चौकशीच्या नावाखाली आलेल्या आष्टी पोलिसांनी मेश्राम कुटुंबाला शिविगाळ करून त्रास दिला. सदर प्रकार गंभीर असल्याने दोषी पोलीस व व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी आॅल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनचे पदाधिकारी व अन्यायग्रस्त मेश्राम कुटुंबातील सदस्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी माहिती देताना फेडरेशनचे अध्यक्ष विनय बांबोळे व अन्यायग्रस्त महिला कविता मेश्राम यांनी सांगितले की, ५ जुलै रोजी आंबोेली येथील पोलीस पाटील वंदना रामटेके, रवींद्र कातकर, राजू मांडवगडे, राजू उंदीरवाडे, बंडू चंदनखेडे, भास्कर दयाळ यांनी अतिक्रमीत जमिनीवर शेती कसण्यास विरोध करून शेतीपयोगी साहित्य हिसकावून नेले, याबाबत आपण आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो असता, तक्रार घेतली नाही. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देणार, असे सांगितल्यावर पोलिसांनी तक्रार घेतली. मात्र कुणावरही गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गावात येऊन आष्टीचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंगटे, पोलीस हवालदार पोटवार यांनी आम्हाला शिविगाळ केली. तसेच शेतीच्या जागेवर सर्व नागरिकांसमोर अवार्च शब्दात बोलून मला शिविगाळ केली, असे कविता मेश्राम यांनी यावेळी सांगितले. पोलीस कर्मचाऱ्यांसह सर्व दोषी व्यक्तींवर गुन्हे दाखल करून न्याय द्यावा, अशी मागणी मेश्राम कुटुंबाने यावेळी केली. पत्रपरिषदेला दिलीप गोवर्धन, चांगदास मसराम, कबीर निकुरे, पुरूषोत्तम मेश्राम, अनूप मेश्राम, सुरेश मेश्राम, पंकज साखरे हजर होते. आंबोली येथील कविता पुरूषोत्तम मेश्राम कुटुंबासोबत ग्रामपंचायतीचा जागेच्या विषयावरून वाद आहे. सदर जागा स्मशानभूमीची असून तिच्यावर ग्रा. पं. चा ताबा आहे. आपण चौकशी करण्यासाठी आंबोली गावात सहकारी कर्मचाऱ्यांसह गेलो होतो. प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी दरम्यान नांगर चालविल्यावर जमिनीतून माणसाच्या शरीराचे हाडही निघाले. आपण कविता मेश्राम व त्यांच्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारची शिविगाळ व मारहाण केली नाही. ग्रामपंचायत प्रशासन आपल्या मालकीची जागा स्मशानभूमीसाठी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र मेश्राम कुटुंबाकडून सहकार्य मिळत नसल्याचे चौकशीत दिसून आले. - संदीप शिंगटे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस ठाणे, आष्टी