शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

पोलिसांकडून दलित कुटुंबाला त्रास

By admin | Updated: July 14, 2016 01:11 IST

आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबोली गावालगतच्या अतिक्रमीत जमिनीवर गेल्या ४० वर्षांपासून मेश्राम कुटुंबीय शेती कसत आहे.

पोलीस अधीक्षकांकडे तक्रार : दोषींवर कारवाई करण्याची मागणी गडचिरोली : आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबोली गावालगतच्या अतिक्रमीत जमिनीवर गेल्या ४० वर्षांपासून मेश्राम कुटुंबीय शेती कसत आहे. मात्र गावातील पोलीस पाटील व काही नागरिकांनी सदर जमिन स्मशानभूमीच्या कामासाठी मागितली. त्यानंतर मेश्राम कुटुंबीयांनी नकार दिल्याने गावातील काही नागरिकांनी या जमिनीत शेती कसण्यास विरोध करून शेतीपयोगी साहित्य हिसकावून नेले. त्यानंतर चौकशीच्या नावाखाली आलेल्या आष्टी पोलिसांनी मेश्राम कुटुंबाला शिविगाळ करून त्रास दिला. सदर प्रकार गंभीर असल्याने दोषी पोलीस व व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी आॅल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनचे पदाधिकारी व अन्यायग्रस्त मेश्राम कुटुंबातील सदस्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी माहिती देताना फेडरेशनचे अध्यक्ष विनय बांबोळे व अन्यायग्रस्त महिला कविता मेश्राम यांनी सांगितले की, ५ जुलै रोजी आंबोेली येथील पोलीस पाटील वंदना रामटेके, रवींद्र कातकर, राजू मांडवगडे, राजू उंदीरवाडे, बंडू चंदनखेडे, भास्कर दयाळ यांनी अतिक्रमीत जमिनीवर शेती कसण्यास विरोध करून शेतीपयोगी साहित्य हिसकावून नेले, याबाबत आपण आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो असता, तक्रार घेतली नाही. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देणार, असे सांगितल्यावर पोलिसांनी तक्रार घेतली. मात्र कुणावरही गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गावात येऊन आष्टीचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंगटे, पोलीस हवालदार पोटवार यांनी आम्हाला शिविगाळ केली. तसेच शेतीच्या जागेवर सर्व नागरिकांसमोर अवार्च शब्दात बोलून मला शिविगाळ केली, असे कविता मेश्राम यांनी यावेळी सांगितले. पोलीस कर्मचाऱ्यांसह सर्व दोषी व्यक्तींवर गुन्हे दाखल करून न्याय द्यावा, अशी मागणी मेश्राम कुटुंबाने यावेळी केली. पत्रपरिषदेला दिलीप गोवर्धन, चांगदास मसराम, कबीर निकुरे, पुरूषोत्तम मेश्राम, अनूप मेश्राम, सुरेश मेश्राम, पंकज साखरे हजर होते. आंबोली येथील कविता पुरूषोत्तम मेश्राम कुटुंबासोबत ग्रामपंचायतीचा जागेच्या विषयावरून वाद आहे. सदर जागा स्मशानभूमीची असून तिच्यावर ग्रा. पं. चा ताबा आहे. आपण चौकशी करण्यासाठी आंबोली गावात सहकारी कर्मचाऱ्यांसह गेलो होतो. प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी दरम्यान नांगर चालविल्यावर जमिनीतून माणसाच्या शरीराचे हाडही निघाले. आपण कविता मेश्राम व त्यांच्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारची शिविगाळ व मारहाण केली नाही. ग्रामपंचायत प्रशासन आपल्या मालकीची जागा स्मशानभूमीसाठी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र मेश्राम कुटुंबाकडून सहकार्य मिळत नसल्याचे चौकशीत दिसून आले. - संदीप शिंगटे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस ठाणे, आष्टी