शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

जुन्या पेन्शनसाठी निघणार दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 01:24 IST

१ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त झालेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या पर्वावर शिवनेरीपासून मुंबईपर्यंत पेन्शन दिंडी काढली जाणार आहे.

ठळक मुद्देतालुकाभरातील तहसीलदारांना निवेदन : २ आॅक्टोबर रोजी शिवनेरी ते मुंबईपर्यंत मार्च

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त झालेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या पर्वावर शिवनेरीपासून मुंबईपर्यंत पेन्शन दिंडी काढली जाणार आहे. यामध्ये राज्यातील हजारो कर्मचारी सहभागी होणार आहेत. याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या मार्फत शासनाला पाठविले आहे.राज्य शासनाने ३१ आॅक्टोबर २००५ रोजी अधिसूचना काढली. या अधिसूचनेत १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना १९८२ व ८४ ची निवृत्त वेतन योजना बंद करून परिभाषीत अंशदायी पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेचे स्वरूप आता या योजनेत सुनिश्चित निवृत्ती वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये या योजनेविषयी असंतोष आहे. आजपर्यंत अनेकवेळा निवेदने देण्यात आली. आंदोलने करण्यात आली. मात्र शासनाने जुनी पेन्शन योजना लागू केली नाही. नवीन अंशदायी पेन्शन योजनेमुळे लाखो कर्मचाऱ्यांचे भविष्य अधांतरी आहे. त्यामुळे या योजनेचा विरोध केला जात आहे.२ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या पर्वावर महाराष्टष्ट्रातील लाखो कर्मचारी शिवनेरीपासून मुंबई येथे पेन्शन दिंडी काढणार आहेत. मागणीची पूर्तता न झाल्यास तेथेच मंत्रालयासमोर बेमुदत सामुहिक उपोषण करणार आहेत, असे निवेदन म्हटले आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, वित्तमंत्री यांना तहसीलदारांच्या मार्फत पाठविले आहे.धानोरा तहसीलदारांना निवेदन देतेवेळी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बापू मुनघाटे, महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान, तालुकाध्यक्ष दीपक सुरपाम, उपाध्यक्ष वर्षा गंगाखेडकर, शरद जगताप, माजीद शेख, देहारकर, दुधबावरे, शारदा गावंडे, सोनाली कंकलवार हजर होते.कोरची येथे संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरूदेव नवघडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. मुलचेरा येथे गजानन गेडाम, अशोक बोरकुटे, कुरखेडात तुळशीदास नरोटे, शिल्पा नवघडे, अशोक इंदूरकर, तांदळे, सुजीत दास, रोशन कापसे, नारायण मलिक, अमित मिस्त्री, सत्यजीत मंडल, निहार मिस्त्री, प्रविण पोटवार, अंकूश मैलारे, प्रणय कयाल, प्रणव देवनाथ, चामोर्शी येथे संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अंकूश मैलारे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

टॅग्स :TahasildarतहसीलदारGovernmentसरकार