शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

फलकाला लटकविले जातात ग्राहकांचे वीज बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:51 IST

प्रत्येक ग्राहकाच्या घरी वेळेवर वीज बिल नेऊन देणे हे वीज बिल वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे. मात्र एटापल्ली तालुक्यातील दुर्गम गावांमध्ये एखाद्या दुकानात, गावातील फलकाला संपूर्ण गावाचे वीज बिल लटकविले जातात.

ठळक मुद्देनेंडेर येथील प्रकार : महावितरणचे दुर्लक्ष, बिल वितरकावर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : प्रत्येक ग्राहकाच्या घरी वेळेवर वीज बिल नेऊन देणे हे वीज बिल वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे. मात्र एटापल्ली तालुक्यातील दुर्गम गावांमध्ये एखाद्या दुकानात, गावातील फलकाला संपूर्ण गावाचे वीज बिल लटकविले जातात. असाच प्रकार एटापल्ली-गट्टा मार्गावरील नेंडेर गावात उघडकीस आला आहे. संबंधित वीज बिल वितरण करणाºयावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.वीज बिल वसुलीबाबत महावितरणने अतिशय कडक धोरण अवलंबिले आहे. एक महिन्याचे जरी वीज बिल थकले तरी संबंधित वीज ग्राहकाचा वीज पुरवठा खंडीत केला जातो. महावितरणने वीज बिल भरण्यात सुलभता आणण्यासाठी एसएमएस सुविधा, अ‍ॅपचा वापर सुरू केला आहे. मात्र या सर्व सुविधांसाठी मोबाईल कव्हरेज व इंटरनेटची सुविधा असणे आवश्यक आहे. एटापल्ली तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये मात्र मोबाईल व इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. अशा गावांमध्ये महावितरणची आधुनिक साधने बेकामी आहेत. या ग्राहकांना अजुनही जेव्हा वीज बिल प्राप्त होते, तेव्हाच आपले बिल किती आले, हे कळते व हेच बिल धरून ते संबंधित बँकेत जातात.दुर्गम भागातील नागरिकांना वीज बिल मिळणे अतिशय आवश्यक आहे. वीज बिल वितरणाचे काम महावितरण एखाद्या खासगी स्थानिक व्यक्तीला देते. वीज बिल वितरणासाठी प्रती बिल एक रुपया संबंधित व्यक्तीला दिला जातो. त्यामुळे वीज बिल घरोघरी नेऊन देणे ही संबंधित व्यक्तीचे कर्तव्य आहे. मात्र दुर्गम भागातील आदिवासी नागरिक सहजासहजी कुणाची तक्रार करीत नाही.याचा गैरफायदा वीज बिल वितरण करणाऱ्यांकडून घेतला जात आहे. नेंडेर गावातील नागरिकांचे वीज बिल रस्त्याच्या बाजुला असलेल्या खांबाला लटकवून संबंधित व्यक्ती पसार झाला. गावातील नागरिक स्वत:चे बिल शोधत होते.बिल हरविल्यास जबाबदार कोण?वीज बिल प्राप्त झाल्याशिवाय दुर्गम भागातील नागरिक वीज भरू शकत नाही. अशातच वादळ, वारा, पाऊस यामुळे वीज बिल उडून गेल्यास किंवा एखाद्या व्यक्तीने वीज बिल जाणून बुजून फेकून दिल्यास ग्राहकाला वीज बिल उपलब्ध होणार नाही. अशावेळी वीज बिल भरयाचा कसा, असा प्रश्न निर्माण होतो. वीज बिल भरले नाही म्हणून महावितरणचे कर्मचारी वीज पुरवठा खंडीत करतात. ग्राहकाची चुकी नसतानाही त्याचा वीज पुरवठा खंडीत होतो. कामचुकारपणा करणाºया वीज बिल वितरकावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :electricityवीज