शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

लोकप्रतिनिधींच्या घरासमोर धरणे

By admin | Updated: June 23, 2014 00:04 IST

शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी करू नये यासाठी आयटकच्यावतीने शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी खासदार अशोक नेते यांच्या कार्यालयासमोर व आमदार डॉ. नामदेव उसेंडी

आरमोरी : शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी करू नये यासाठी आयटकच्यावतीने शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी खासदार अशोक नेते यांच्या कार्यालयासमोर व आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या घरासमोर २२ जून रोजी धरणे आंदोलन केले. शालेय पोषण आहार शिजविण्याची योजना सुरू केल्यापासून अत्यंत कमी मोबदला मिळत असतानाही गावातील काही महिला विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शिजवून देत होत्या. पोषण आहारातून विद्यार्थ्यांना विषबाधेच्या घटना घडल्यानंतर या घटनांसाठी मुख्याध्यापकांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे मुख्याध्यापकांच्या संघटनांनी शालेय पोषण आहाराची जबाबदारी घेण्यास नकार दिला. २६ फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार मुख्याध्यापक व शिक्षकांना शालेय पोषण आहाराच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. आहार शिजविण्याची व पुरवठा करण्याची जबाबदारी बचत गटांना देण्यात येणार आहे.अत्यंत कमी मोबदला असतांना ज्यावेळी आहार शिजविण्यासाठी कोणीही समोर येत नव्हते. अशा परिस्थितही या महिलांनी आहार शिजविला आहे. ९० टक्के महिला निराधार, विधवा, परितक्त्या व बीपीएल कुटुंबातील आहेत. त्यांच्यावर फार मोठे आर्थिक संकट कोसळणार आहे. त्यामुळे त्यांना पुर्ववत कामावर घ्यावे, या मागणीसाठी आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, तालुका सचिव कुंदा चल्लीलवार, सारिका वांढरे, जि. प. सदस्य अमोल मारकवार, विलास बन्सोड, संगीता सोनटक्के, रेमाजी उरकुडे, पौर्णिमा मालाकार, भिमन्ना तालावार, जुबेदा शेख, पुष्पा मडावी यांनी केले. आंदोलनात जिल्ह्यातील पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)