शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

संस्कृती जतनासाठी एकजूट दाखवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 23:09 IST

आदिवासी संस्कृती ही प्राचीन व वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र बदलत्या काळानुसार आदिवासी आपल्या संस्कृतीपासून दूर जात आहेत.

ठळक मुद्देमान्यवरांचा सूर : रानखेडात सल्लागांगरा शक्तीचे अनावरण

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : आदिवासी संस्कृती ही प्राचीन व वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र बदलत्या काळानुसार आदिवासी आपल्या संस्कृतीपासून दूर जात आहेत. भविष्यात संस्कृतीचे जतन करून भावी पिढीला प्रेरणादायी संस्कृती ठरेल, याकरिता समाजाने एकत्र यावे, असे आवाहन गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप वरखडे यांनी केले.अखिल भारतीय गोंडवाना गोंड महासभा जिल्हा शाखा गडचिरोली व राणी हिराई बहुउद्देशीय गोटूल समिती रानखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी गोंडीधर्म संमेलनाच्या समारोप प्रसंगी वरखडे बोलत होते.रानखेडा येथे २० व २१ जानेवारीला सल्लागांगरा शक्तीचे अनावरण व गोंडीधर्म संमेलन आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष भारती इष्टाम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी गोंडीधर्म महासंघाचे मनीरावण दुगा होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अ‍ॅड. उमेश मडावी, पत्रकार हरीश सिडाम, गणेश हलामी, रामचंद्र काटेंगे, प्रमुख अतिथी म्हणून घनश्याम मडावी, डंबाजी पेंदाम, पाललाल सिडाम, नाजूकराव जुमनाके, राजीराम कोवे, सुखदेव दुगा, मौशिखांबच्या माजी सरपंच लता सिडाम, रंजीता पेंदाम, तलाठी जांगी, पी. टी. तुलावी, चांदाळाच्या ग्रा. पं. सदस्य उषा गावडे, रूपा कुमरे, किरंगे, कुमरे, शांताराम किरंगे, मरेगावचे उपसरपंच रवींद्र मसराम उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डंबाजी पेंदाम, संचालन मोरेश्वर गेडाम तर आभार उमाकांत गेडाम यांनी मानले. यशस्वीतेसाठी विशाल मडावी, कैलास गेडाम, अरविंद गेडाम, वनिता गेडाम, आशा मडावी, ललीता मडावी, पार्वता गेडाम, वच्छला तुमराम, पौर्णिमा गेडाम, संदीप मडावी, सचिन गेडाम व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.धार्मिक कार्यक्रमासह मनोरंजनगोंडीधर्म संमेलनात संदीप वरखडे व रामचंद्र काटेंगे यांच्या हस्ते गोंडीध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर गावातून रॅली काढून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले. या कार्यक्रमाला रानखेडासह मुरमाडी, मौशिचक, कातखेडा, अमिर्झा, बेलगाव, मरेगाव, मासरगाटा, निमगाव, निमनवाडा, चांभार्डा येथील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.