शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कृउबासचे विभाजन रखडले

By admin | Updated: November 4, 2014 22:39 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या १२ तालुक्यासाठी केवळ चार कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. आणखी दोन नव्या बाजार समित्या निर्माण कराव्यात, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी करीत आहेत.

शेतकरी अडचणीत : १२ तालुक्यांसाठी केवळ चार बाजार समित्यागडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या १२ तालुक्यासाठी केवळ चार कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. आणखी दोन नव्या बाजार समित्या निर्माण कराव्यात, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी करीत आहेत. परंतु नव्या बाजार समित्यांच्या प्रस्तावावर तत्कालीन आघाडी सरकारने कोणताही निर्णय न घेतल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.२६ आॅगस्ट १९८२ ला निर्माण झालेल्या गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी व अहेरी या चार ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. आरमोरी बाजार समितींतर्गत कोरची, कुरखेडा, देसाईगंज व आरमोरी या चार तालुक्यांचा कारभार आहे. गडचिरोली बाजार समिती अंतर्गत गडचिरोली, धानोरा या दोन तालुक्यांचा कारभार आहे. तर चामोर्शी व मुलचेरा या दोन तालुक्याचा कारभार चालतो. अहेरी उपविभागातील सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, अहेरी या चार तालुक्यासाठी अहेरी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. ज्या ठिकाणी बाजार समिती आहे. त्या ठिकाणापासून संलग्न तालुक्याचा अंतर हे दीडशे किमीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे आरमोरी बाजार समितीचे विभाजन करून देसाईगंज व अहेरी बाजार समितीचे विभाजन करून सिरोंचा येथे नवी बाजार समिती निर्र्माण करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. आरमोरी येथील बाजार समितीच्या विभाजनाला आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन काँग्रेस आमदारांनी प्रचंड विरोध केला होता. त्यामुळे न्यायालयातही या संदर्भातील प्रकरण गेले होते. न्यायालयाने या प्रकरणी शासनाला काही दिशानिर्देशही दिले होते. आरमोरी बाजार समितीचा सर्व व्यापार हा देसाईगंजच्या भरवशावर चालतो. देसाईगंज येथे उपबाजारपेठ निर्माण करण्यात आली आहे. मात्र येथे आवश्यक सोयीसुविधांचा प्रचंड अभाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी लूट या ठिकाणी केली जात आहे. आरमोरी बाजार समितीच्या अंतर्गत येणाऱ्या कुरखेडा व कोरची तालुक्याला देसाईगंज हे जवळचे ठिकाण पडते. त्यामुळे देसाईगंज येथे नवी कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मात्र शेतकऱ्यांच्या या मागणीकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीने सिरोंचा येथे नवी बाजार समिती सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. याबाबत शासनाकडेही प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. तसेच गडचिरोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार यार्डातून चालतच नाही. गडचिरोली शहरातील काही ठरावीक व्यापाऱ्यांच्या घरीच शेतकऱ्यांच्या शेतमालाचे काटे केले जातात व मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा आर्थिक शोषण ही व्यापारी मंडळी करीत आहेत. सदर बाजार समितीला चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीसोबत संलग्न करावे, अशीही एक मागणी शेतकऱ्यांची आहे. शासनाने नव्या बाजार समितीच्या निर्मितीबाबत तत्काळ पाऊल उचलावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)