शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
5
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
6
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
7
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
8
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
9
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
10
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
11
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
12
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
13
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
14
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
15
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
16
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
17
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
18
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
19
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
20
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!

कृउबासचे विभाजन रखडले

By admin | Updated: November 4, 2014 22:39 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या १२ तालुक्यासाठी केवळ चार कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. आणखी दोन नव्या बाजार समित्या निर्माण कराव्यात, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी करीत आहेत.

शेतकरी अडचणीत : १२ तालुक्यांसाठी केवळ चार बाजार समित्यागडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या १२ तालुक्यासाठी केवळ चार कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. आणखी दोन नव्या बाजार समित्या निर्माण कराव्यात, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी करीत आहेत. परंतु नव्या बाजार समित्यांच्या प्रस्तावावर तत्कालीन आघाडी सरकारने कोणताही निर्णय न घेतल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.२६ आॅगस्ट १९८२ ला निर्माण झालेल्या गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी व अहेरी या चार ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. आरमोरी बाजार समितींतर्गत कोरची, कुरखेडा, देसाईगंज व आरमोरी या चार तालुक्यांचा कारभार आहे. गडचिरोली बाजार समिती अंतर्गत गडचिरोली, धानोरा या दोन तालुक्यांचा कारभार आहे. तर चामोर्शी व मुलचेरा या दोन तालुक्याचा कारभार चालतो. अहेरी उपविभागातील सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, अहेरी या चार तालुक्यासाठी अहेरी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. ज्या ठिकाणी बाजार समिती आहे. त्या ठिकाणापासून संलग्न तालुक्याचा अंतर हे दीडशे किमीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे आरमोरी बाजार समितीचे विभाजन करून देसाईगंज व अहेरी बाजार समितीचे विभाजन करून सिरोंचा येथे नवी बाजार समिती निर्र्माण करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. आरमोरी येथील बाजार समितीच्या विभाजनाला आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन काँग्रेस आमदारांनी प्रचंड विरोध केला होता. त्यामुळे न्यायालयातही या संदर्भातील प्रकरण गेले होते. न्यायालयाने या प्रकरणी शासनाला काही दिशानिर्देशही दिले होते. आरमोरी बाजार समितीचा सर्व व्यापार हा देसाईगंजच्या भरवशावर चालतो. देसाईगंज येथे उपबाजारपेठ निर्माण करण्यात आली आहे. मात्र येथे आवश्यक सोयीसुविधांचा प्रचंड अभाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी लूट या ठिकाणी केली जात आहे. आरमोरी बाजार समितीच्या अंतर्गत येणाऱ्या कुरखेडा व कोरची तालुक्याला देसाईगंज हे जवळचे ठिकाण पडते. त्यामुळे देसाईगंज येथे नवी कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मात्र शेतकऱ्यांच्या या मागणीकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीने सिरोंचा येथे नवी बाजार समिती सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. याबाबत शासनाकडेही प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. तसेच गडचिरोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार यार्डातून चालतच नाही. गडचिरोली शहरातील काही ठरावीक व्यापाऱ्यांच्या घरीच शेतकऱ्यांच्या शेतमालाचे काटे केले जातात व मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा आर्थिक शोषण ही व्यापारी मंडळी करीत आहेत. सदर बाजार समितीला चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीसोबत संलग्न करावे, अशीही एक मागणी शेतकऱ्यांची आहे. शासनाने नव्या बाजार समितीच्या निर्मितीबाबत तत्काळ पाऊल उचलावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)