शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

सीआरपीएफने खोदला तलाव

By admin | Updated: July 1, 2014 01:29 IST

शेतकऱ्यांना जाणवणारी पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन १९१ बटालियनच्या सीआरपीएफ जवानांनी आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील कोटगुल येथे तलावाचे खोलीकरण करण्यास नागरिकांना सहकार्य केले आहे

शेतकऱ्यांसाठी सिंचन : कोटगुल येथील तलावाचे खोेलीकरणदेसाईगंज : शेतकऱ्यांना जाणवणारी पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन १९१ बटालियनच्या सीआरपीएफ जवानांनी आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील कोटगुल येथे तलावाचे खोलीकरण करण्यास नागरिकांना सहकार्य केले आहे. नक्षलग्रस्त भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांचा आर्थिक विकास केल्याशिवाय नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करणे अशक्य आहे. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर केंद्रशासन, राज्यशासन नक्षलग्रस्त भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी विशेष योजना राबवित आहे. विशेषकरून आर्थिक व शैक्षणिकस्तर उंचाविण्यासाठी विशेष प्रयत्नशील आहे. नक्षल्यांचा सामना करण्यासाठी जिल्ह्यात स्थानिक पोलिसांच्या मदतीला सीआरपीएफच्या बटालियन तैनात आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाची १९१ क्रमांकाची बटालियन नक्षल्यांसोबत सामना करत असतांनाच लोकोपयोगी विविध उपक्रम राबवित आहे. कोरची तालुक्यातील नागरिकांची व जनावरांच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन गाव तलावाचे खोलीकरण करण्याचे काम सीआरपीएफने हाती घेतले. यासाठी कोटगुलच्या सरपंच पुष्पा कोडाप, उपसरपंच जुल्फीकार, खेतानी, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष राजेश नैताम, रामदास हारामी, डॉ. हरीष टेकाम, डॉ. बिश्वास, संजय गोवर्धन आदींनी सहकार्य केले. तलावाच्या खोलीकरणाचे काम १९१ तुकडीचे उपकमांडर करतार सिंह, सहाय्यक कमांडर नरेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना करतार सिंह म्हणाले की, पाण्याची बचत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतला पाहिजे. पाण्याचा अपव्यय झाल्यास भविष्यात फार मोठी पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पावसाचे प्रमाण वाढण्यासाठी जंगलतोड थांबवून वृक्षांचे संगोपन करावे, असे प्रतिपादन केले. यशस्वीतेसाठी प्रभारी अधिकारी एच. के. घाडगे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)