शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पावसाचे संकेत देणारे कावळ्याचे घरटे दुर्मिळ; पानकोंबडी, पावश्या, मोराचे आवाज लुप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 12:17 IST

Gadchiroli News मानवी हस्तक्षेपामुळे पशुपक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून पावसाचे संकेत देणारे कावळ्याचे घरटे दुर्मिळ झाले आहेत.

ठळक मुद्दे भविष्यात आपल्याला पावसाचे प्रतिकूल-अनुकूल बदलाचे संकेत देणारे पक्ष्यांचे आवाज आणि कावळ्याची घरटी केवळ पुस्तकात पाहायला मिळतील.

 प्रदीप बोडणे

 लोकमत न्यूज नेटवर्क   गडचिरोली: ज्या काळात हवामानाचा अंदाज देणारी यंत्रणा नव्हती त्याकाळात पक्ष्यांचे आवाज आणि पावसाळ्यापूर्वी झाडावर बांधत जाणारी कावळ्यांची घरटी कोणत्या स्वरूपात बांधली यावरून शेतकरी पावसाचे अंदाज व्यक्त केले जात आणि ते खरे ठरत. पण आता मानवी हस्तक्षेपामुळे पशुपक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून पावसाचे संकेत देणारे कावळ्याचे घरटे दुर्मिळ झाले आहेत.

पावसाळा सुरू होण्याच्या एक महिन्यांपूर्वी कावळ्यांचा विणीचा हंगाम असतो. या काळात नर, मादी झाडावर गोलाकार घरटी बांधायला सुरुवात करतात. जर कावळ्याने झाडाच्या मधोमध मोठ्या फांद्याला धरून घरटी बांधली तर त्या वर्षात वादळ वाऱ्यासह जोरदार पावसाचे संकेत मिळत. कावळ्याने झाडाच्या टोकाला घरटी बाधली तर त्या वर्षात पर्जन्यवृष्टी कमी होणार, असा अंदाज व्यक्त केला जात असे आणि कावळ्याच्या घरट्यात वरून बांधले जाणारे पावसाचे अंदाज खरी ठरायचे. ग्रामीण भागात तर कावळे घरटी बांधतेवेळी काडी तोंडात कशी धरतात यावरूनही पावसाचे अंदाज व्यक्त केल्या जात असे. जर कावळ्याने काडी चोचीत मधोमध धरली तर मधले नक्षत्र भरपूर बरसणार असे संकेत बांधले जात. जर कावळ्याने चोचीत काळी टोकावर धरली तर या वर्षात सुरुवातीला पाऊस नाही, शेवटचे नक्षत्र बरसणार असा अंदाज व्यक्त केला जात असे.

पक्ष्यांना हवामानाचे ज्ञान उपजत असते. पानकोंबडी, पावश्या, मोर या पक्ष्यांच्या पावसापूर्वीच्या ओरडणे वरून पाऊस येणार असल्याचे संकेत मिळत. रोहिणी नक्षत्र सुरू झाला की जून महिन्याच्या प्रारंभापासून पक्षी जोरात जोरात ओरडून एकमेकांचा पाठलाग करताना दिसतात. या विणीच्या हंगामात नर, मादीची घरटी बांधण्याची लगबग हे पावसाचे संकेत देते. पण पक्ष्यांची होणारी अवैध शिकार आणि वृक्षतोडीमुळे पक्ष्यांची संख्या घटली. कावळ्याची काव..काव.. चिमणीची चिव. चिव. मोराचा..केका पहाटेच्या समयी परसबागेत ऐकायला येणारे पक्षांचे मंजुळ स्वर मुक्त झाले.

दिवसेंदिवस बेसुमार होणारी वृक्षतोड यामुळे हवामानातील उष्माचे प्रमाण वाढल्याने जंगली पक्ष्यांचे प्रमाण कमी होत आहे. पक्ष्यांची संख्या कायम ठेवण्यासाठी पर्यावरणपूरक विकास व्हायला हवा नाहीतर पक्षी नामशेष व्हायला वेळ लागणार नाही.

टॅग्स :wildlifeवन्यजीव