शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

विद्यार्थ्यांसाठी असलेल्या बसमध्ये प्रवाशांचीच गर्दी

By admin | Updated: July 11, 2015 02:21 IST

विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये ये-जा करणे सुकर व्हावे, यासाठी मानव विकास मिशनने बस उपलब्ध करून दिल्या आहेत.

विसोरा : विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये ये-जा करणे सुकर व्हावे, यासाठी मानव विकास मिशनने बस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर काही बसेस विद्यार्थ्यांच्या शाळा सुटण्याच्या वेळेवर सोडल्या जातात. मात्र या बसमध्ये सामान्य प्रवाशांचीच अधिक गर्दी राहत असल्याने विद्यार्थिनींना उभ्याने प्रवास करावा लागत आहे. तर काही विद्यार्थिनींना जागाच होत नसल्याने त्यांना बसस्थानकावरच ताटकळत बसावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विद्यार्थिनींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने शासनाने विद्यार्थिनींचा प्रवास मोफत केला आहे. त्याचबरोबर ज्या मार्गावरून विद्यार्थी जातात, त्या मार्गावर मानव विकास मिशनच्या बस सोडाव्या व इतरही बस चालविण्यात याव्या, असे सक्त निर्देश शासनाच्या मार्फतीने आगाराला देण्यात आले आहेत. त्यानुसार शाळा सुटण्याच्या वेळेवर बहुतांश बसेस सोडल्या जातात. या बसेसचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची वाहतूक करणे हा आहे. मात्र या बसमध्ये सामान्य प्रवशांनाहीबसविले जाते. सायंकाळच्या सुमारास घराकडे जाणारे अनेक प्रवाशी सुध्दा एसटीला मिळतात. हेच प्रवाशी एसटीमधील बहुतांश सीट व्यापतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यास जागा शिल्लक राहत नाही. कधीकधी एसटी पूर्णपणे भरून राहत असल्याने विद्यार्थिनींना एसटीमध्ये प्रवेशही मिळत नाही. त्यामुळे बसस्थानकावर ताटकळत राहावे लागत आहे. ही परिस्थिती विसोरा बसस्थानकावर नेहमीच बघायला मिळते. देसाईगंज-कुरखेडा मार्गावरून अनेक बसेस चालत असल्या तरी सायंकाळच्या सुमारास बहुतांश बसेस प्रवाशांनी भरून येत असल्याने कित्येक तास विद्यार्थिनींना वाट बघत राहावे लागते. (वार्ताहर)