शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

७३ कोटी ९७ लाखांचे पीक कर्ज

By admin | Updated: July 27, 2014 23:45 IST

अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे शासनाने निर्देश दिले होते. या अंतर्गत जिल्ह्यातील विविध बँकांना खरीप हंगामासाठी १ कोटी ८० लाख रूपयांच्या पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

गडचिरोली : अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे शासनाने निर्देश दिले होते. या अंतर्गत जिल्ह्यातील विविध बँकांना खरीप हंगामासाठी १ कोटी ८० लाख रूपयांच्या पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्ह्यातील सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांनी १९ जुलैपर्यंत तब्बल ७३ कोटी ९७ लाख रूपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यातील एकूण १९ हजार ८०० शेतकऱ्यांनी पीक कर्जाचा लाभ घेतले असल्याची माहिती मिळाली आहे.गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील विविध बँकांनी १०० कोटी रूपयांपेक्षा जास्त रकमेचे पीक कर्ज वितरीत केले होते. मात्र गतवर्षी अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात उत्पादन झाले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विविध बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड केली नाही. पीक कर्ज वसुलीचे प्रमाण कमी असल्याने बँकाही अडचणीत सापडल्या होत्या. यामुळे शेतकरी गतवर्षीच्या पीक कर्जाच्या रकमेची परतफेड केली नसेल अशा शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात येणार नाही, असे धोरण स्विकारले होते. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना १०९ कोटी ८० लाख रूपये पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये बँक आॅफ इंडिया १,५९० लाख, बँक आॅफ महाराष्ट्र १,५८८ लाख, कॅनरा बँक ८५ लाख, सेंट्रल बँक आॅफ इंडिया ९० लाख, आयडीबीआय बँक १७० लाख, स्टेट बँक आॅफ इंडिया १,५८५ लाख, युनियन बँक आॅफ इंडिया १६५ लाख, विदर्भ कोकण ग्रामीण बँक १,२६५ लाख, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस ४,४४२ लाख रूपये कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. विविध बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बँक आॅफ इंडियाच्यावतीने १ हजार ८७१ शेतकऱ्यांना ८९७ लाख रूपयांचे पीक कर्ज वितरीत केले आहे. बँक आॅफ महाराष्ट्रने २ हजार १६४ शेतकऱ्यांना १ हजार १४ लाख रूपयाचे पीक कर्ज वितरीत केले आहे. बँक आॅफ महाराष्ट्रच्या पीक कर्ज वितरणाची टक्केवारी ५९ टक्के आहे. कॅनरा बँकेने १५ शेतकऱ्यांना १६ लाख रूपयाचे कर्ज वितरीत केले आहे. या बँकेची कर्ज वितरणाची टक्केवारी १६ टक्के आहे. सेंट्रल बँक आॅफ इंडिया शाखेकडून २० शेतकऱ्यांनी १४ लाख रूपयांचे कर्ज घेतले आहे. या बँकेची कर्ज वितरणाची टक्केवारी १३ टक्के आहे. आयडीबीआय बँकेने १५२ शेतकऱ्यांना ५३ लाख रूपयांच्या पीक कर्जाचे वितरण केले आहे. या बँकेच्या पीक कर्जाच्या वितरणाची टक्केवारी २७ टक्के आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाने ४५० शेतकऱ्यांना ३३८ लाख रूपयांच्या पीक कर्जाचे वितरण केले आहे. या बँकेच्या पीक कर्ज वितरणाची टक्केवारी २० टक्के आहे. युनियन बँक आॅफ इंडियाने ६३ शेतकऱ्यांना २४ लाख रूपयांचे पीक कर्ज वितरित केले आहे. या बँकेच्या पीक कर्ज वितरणाची टक्केवारी १२ टक्के आहे.वैनगंगा कोकण ग्रामीण बँकेने १ हजार ८५६ शेतकऱ्यांना १ हजार ८ लाख रूपयाचे पीक कर्ज वितरीत केले आहे. पीक कर्जाची टक्केवारी ७१ टक्के आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १३ हजार २०९ शेतकऱ्यांना ४ हजार ३२ लाख रूपयांचे पीक कर्ज वितरीत केले आहे. या बँकेच्या पीक कर्ज वितरणाची टक्केवारी ७८ टक्के आहे. सर्वच बँका मिळून पीक कर्ज वितरणाची टक्केवारी ६० टक्के आहे. यावर्षी मृग नक्षत्रास प्रारंभ होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही पाऊस पडला नव्हता. यामुळे शेतकऱ्यांना दुबार पिकाची पेरणी करावी लागली होती. जुलै महिन्याच्या चौथ्या आठवड्यात आलेल्या संततधार पावसामुळे शेतकरीवर्ग सुखावला. रोवणीची कामे जोमाने सुरू झाली आहे. निसर्ग कसा साथ देतो, यावरच शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट अवलंबून आहे. (स्थानिक प्रतिनिधी)