शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

३४ हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:01 IST

लाखो रुपये खर्च करून शेतकरी विविध पिकांची लागवड करतात. मात्र कधीकधी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. कधीकधी लागवडीचा खर्च सुद्धा भरून निघत नाही. अशावेळी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडते. ही वेळ शेतकऱ्यावर येऊ नये, यासाठी चार वर्षांपूर्वी केंद्र शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत खरीप हंगामादरम्यान पिकांचा विमा काढला जाते.

ठळक मुद्दे१३ कोटी रुपयांची रक्कम खात्यात जमा : धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत मात्र कापूस व सोयाबीन वगळले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नैसर्गिक आपत्तीने पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदत देता यावी, यासाठी शासनामार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविली जाते. मागील वर्षी धान उत्पादक ३४ हजार ६४७ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. सुमारे १३ कोटी ७१ लाख रुपयांची मदत शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.लाखो रुपये खर्च करून शेतकरी विविध पिकांची लागवड करतात. मात्र कधीकधी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. कधीकधी लागवडीचा खर्च सुद्धा भरून निघत नाही. अशावेळी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडते. ही वेळ शेतकऱ्यावर येऊ नये, यासाठी चार वर्षांपूर्वी केंद्र शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत खरीप हंगामादरम्यान पिकांचा विमा काढला जाते. विम्यासाठी नाममात्र रक्कम शेतकºयांना भरावी लागते. पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पीक विमा काढणे सक्तीचे केले आहे. त्याचबरोबर पीक कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही स्वतंत्र अर्ज करून विमा काढता येते.बँकांना पीक विम्याबाबत जागृती केल्याने दरवर्षी पीक विमा काढण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. २०१९ मध्ये १ हजार ६२ हेक्टर कापूस पिकाचा विमा काढला होता. २८ हजार ३२४ हेक्टर धानपिकाचा तर १०९ हेक्टर सोयाबीन पिकाचा विमा काढला होता. यासाठी शेतकऱ्यांनी शासनाकडे पीक विमा कंपन्यांकडे ५ कोटी ५५ लाख रुपयांची रक्कम पीक विमा कंपन्यांकडे जमा केली होती.मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. खालभागातील जमीन तसेच नदी, नाल्यांजवळ असलेल्या जमिनीत पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कृषी विभाग, महसूल कर्मचारी यांनी पंचनामा करून अहवाल सादर केला होता. त्यानंतर विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. ३४ हजार ६४७ शेतकऱ्यांना १३ कोटी ७१ लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे.मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने कापूस व सोयाबिन पिकाचे सुद्धा मोठे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचा तर उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. २५ टक्केही उत्पादन झाले नाही. मात्र एकाही कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकºयांना विमा कंपनीने लाभ दिला नाही. त्यामुळे शेतकºयांमध्ये नाराजी पसरली आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुद्धा लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा विमा कंपन्यांवरील विश्वास उडत चालला आहे. त्यामुळेच शेतकरी स्वत:हून विमा काढण्यासाठी तयार होत नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांला मदत मिळेल, यासाठी शासनाने हस्तक्षेप करण्याची गरज आहे.लाभ मिळत नसल्याचा अनुभवएकरी जवळपास ४०० ते ५०० रुपये भरून विमा काढावा लागते. यासाठी कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. तरीही काही शेतकरी स्वत:हून विमा काढतात. मात्र प्रत्यक्ष नुकसान झाल्यास विमा कंपन्या विविध अटी, शर्ती घालून लाभ देत नसल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. फार कमी शेतकºयांना अत्यंत तुटपुुंजा लाभ दिल्या जाते. त्यामुळे शेतकरी स्वत:हून विमा काढत नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी