शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बोडी फुटल्याने पीक वाहून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 23:53 IST

भामरागड तालुक्यात गुरूवारपासून सतत दमदार पाऊस होत असल्याने तलाव, बोड्यातील पाणीसाठा वाढला आहे. दरम्यान शुक्रवारी तालुक्यातील दुडेपल्ली येथील एका शेतकऱ्याची खासगी बोडी फुटल्याने परिसरातील धानपीक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यामुळे २५ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देपावसाने तलावात पाणीसाठा वाढला : दुडेपल्ली येथील २५ शेतकऱ्यांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड तालुक्यात गुरूवारपासून सतत दमदार पाऊस होत असल्याने तलाव, बोड्यातील पाणीसाठा वाढला आहे. दरम्यान शुक्रवारी तालुक्यातील दुडेपल्ली येथील एका शेतकऱ्याची खासगी बोडी फुटल्याने परिसरातील धानपीक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यामुळे २५ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस होत असल्याने अनेक शेतातील बांध्यांचे पाळे फुटून धान पिकाचे नुकसान झाले. लहान-मोठ्या बोड्यांमध्ये पाणीसाठा वाढल्याने काही ठिकाणच्या बोड्या फुटल्या. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तालुक्याच्या दुडेपल्ली येथील शेतकरी काटा जोरना मट्टामी यांच्या शेतात मोठा तलाव आहे. तीन-चार दिवस झालेल्या दमदार पावसाने या तलावाची पाळ शुक्रवारी फुटली. त्यामुळे तलावाखालील शेतजमिनीतील धानपीक वाहून गेले. यामुळे २५ शेतकºयांचे नुकसान झाले. आता शेतात रेती जमा झाली आहे. सदर तलावात मट्टामी यांनी १० हजार रूपये किमतीचे ८ ते ९ किलो मत्स्य बीज टाकले होते. मात्र तलावाची पाळ फुटल्याने सर्व मत्स्य बीज वाहून गेले. मत्स्य पालन व्यवसायातून दरवर्षी मट्टामी यांना ३० ते ४० हजार रूपये उत्पन्न मिळत होते, अशी माहिती गावातील प्रतिष्ठीत नागरिक देजू पुंगाटी यांनी लोकमत प्रतिनिधींना सांगितले. तलाव फुटल्याने शेतकरी मट्टामी यांचे सर्वाधिक नुकसान झाले. प्रशासनाच्या वतीने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त सर्वच २५ शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा करणारदुडेपल्ली येथील बोळीची पाळ फुटून धान पिकाची नुकसान झाल्याबाबतची माहिती कोणत्याही शेतकऱ्यांनी स्वत: कार्यालयातून येऊन दिली नाही. संततधार पाऊस असल्यामुळे कुठेही जाता येत नाही. तालुक्यातील सर्व नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने काही ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज बांधून सर्व तलाठी व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुडेपल्ली गावासह तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार, अशी माहिती तहसीलदार कैलास अंडील यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती