शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बोडी फुटल्याने पीक वाहून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 23:53 IST

भामरागड तालुक्यात गुरूवारपासून सतत दमदार पाऊस होत असल्याने तलाव, बोड्यातील पाणीसाठा वाढला आहे. दरम्यान शुक्रवारी तालुक्यातील दुडेपल्ली येथील एका शेतकऱ्याची खासगी बोडी फुटल्याने परिसरातील धानपीक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यामुळे २५ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देपावसाने तलावात पाणीसाठा वाढला : दुडेपल्ली येथील २५ शेतकऱ्यांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड तालुक्यात गुरूवारपासून सतत दमदार पाऊस होत असल्याने तलाव, बोड्यातील पाणीसाठा वाढला आहे. दरम्यान शुक्रवारी तालुक्यातील दुडेपल्ली येथील एका शेतकऱ्याची खासगी बोडी फुटल्याने परिसरातील धानपीक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यामुळे २५ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस होत असल्याने अनेक शेतातील बांध्यांचे पाळे फुटून धान पिकाचे नुकसान झाले. लहान-मोठ्या बोड्यांमध्ये पाणीसाठा वाढल्याने काही ठिकाणच्या बोड्या फुटल्या. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तालुक्याच्या दुडेपल्ली येथील शेतकरी काटा जोरना मट्टामी यांच्या शेतात मोठा तलाव आहे. तीन-चार दिवस झालेल्या दमदार पावसाने या तलावाची पाळ शुक्रवारी फुटली. त्यामुळे तलावाखालील शेतजमिनीतील धानपीक वाहून गेले. यामुळे २५ शेतकºयांचे नुकसान झाले. आता शेतात रेती जमा झाली आहे. सदर तलावात मट्टामी यांनी १० हजार रूपये किमतीचे ८ ते ९ किलो मत्स्य बीज टाकले होते. मात्र तलावाची पाळ फुटल्याने सर्व मत्स्य बीज वाहून गेले. मत्स्य पालन व्यवसायातून दरवर्षी मट्टामी यांना ३० ते ४० हजार रूपये उत्पन्न मिळत होते, अशी माहिती गावातील प्रतिष्ठीत नागरिक देजू पुंगाटी यांनी लोकमत प्रतिनिधींना सांगितले. तलाव फुटल्याने शेतकरी मट्टामी यांचे सर्वाधिक नुकसान झाले. प्रशासनाच्या वतीने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त सर्वच २५ शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा करणारदुडेपल्ली येथील बोळीची पाळ फुटून धान पिकाची नुकसान झाल्याबाबतची माहिती कोणत्याही शेतकऱ्यांनी स्वत: कार्यालयातून येऊन दिली नाही. संततधार पाऊस असल्यामुळे कुठेही जाता येत नाही. तालुक्यातील सर्व नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने काही ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज बांधून सर्व तलाठी व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुडेपल्ली गावासह तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार, अशी माहिती तहसीलदार कैलास अंडील यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती