शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

बोडी फुटल्याने पीक वाहून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 23:53 IST

भामरागड तालुक्यात गुरूवारपासून सतत दमदार पाऊस होत असल्याने तलाव, बोड्यातील पाणीसाठा वाढला आहे. दरम्यान शुक्रवारी तालुक्यातील दुडेपल्ली येथील एका शेतकऱ्याची खासगी बोडी फुटल्याने परिसरातील धानपीक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यामुळे २५ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देपावसाने तलावात पाणीसाठा वाढला : दुडेपल्ली येथील २५ शेतकऱ्यांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड तालुक्यात गुरूवारपासून सतत दमदार पाऊस होत असल्याने तलाव, बोड्यातील पाणीसाठा वाढला आहे. दरम्यान शुक्रवारी तालुक्यातील दुडेपल्ली येथील एका शेतकऱ्याची खासगी बोडी फुटल्याने परिसरातील धानपीक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यामुळे २५ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस होत असल्याने अनेक शेतातील बांध्यांचे पाळे फुटून धान पिकाचे नुकसान झाले. लहान-मोठ्या बोड्यांमध्ये पाणीसाठा वाढल्याने काही ठिकाणच्या बोड्या फुटल्या. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तालुक्याच्या दुडेपल्ली येथील शेतकरी काटा जोरना मट्टामी यांच्या शेतात मोठा तलाव आहे. तीन-चार दिवस झालेल्या दमदार पावसाने या तलावाची पाळ शुक्रवारी फुटली. त्यामुळे तलावाखालील शेतजमिनीतील धानपीक वाहून गेले. यामुळे २५ शेतकºयांचे नुकसान झाले. आता शेतात रेती जमा झाली आहे. सदर तलावात मट्टामी यांनी १० हजार रूपये किमतीचे ८ ते ९ किलो मत्स्य बीज टाकले होते. मात्र तलावाची पाळ फुटल्याने सर्व मत्स्य बीज वाहून गेले. मत्स्य पालन व्यवसायातून दरवर्षी मट्टामी यांना ३० ते ४० हजार रूपये उत्पन्न मिळत होते, अशी माहिती गावातील प्रतिष्ठीत नागरिक देजू पुंगाटी यांनी लोकमत प्रतिनिधींना सांगितले. तलाव फुटल्याने शेतकरी मट्टामी यांचे सर्वाधिक नुकसान झाले. प्रशासनाच्या वतीने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त सर्वच २५ शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा करणारदुडेपल्ली येथील बोळीची पाळ फुटून धान पिकाची नुकसान झाल्याबाबतची माहिती कोणत्याही शेतकऱ्यांनी स्वत: कार्यालयातून येऊन दिली नाही. संततधार पाऊस असल्यामुळे कुठेही जाता येत नाही. तालुक्यातील सर्व नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने काही ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज बांधून सर्व तलाठी व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुडेपल्ली गावासह तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार, अशी माहिती तहसीलदार कैलास अंडील यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती