शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

चामोर्शी तालुक्यात दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 05:00 IST

धान रोवणीचा खर्च वाचविण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी आवत्या पद्धतीने धानाची पेरणी केली. मात्र जमिनीत ओलावा कमी असल्याने धान उगवणीवर परिणाम झाला. ओलाव्यातील धान अंकुरले परंतु वरील धान खराब झाले. ज्या शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करून आवत्या टाकला त्या शेतकऱ्यांचे पीक सध्या जोमात आहे. परंतु पावसानंतर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे धान आवश्यक प्रमाणात उगवले नाही.

ठळक मुद्देअंकुरलेले पीक करपले : पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त; आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : खरीप हंगामातील धान पऱ्हे व कपाशी टिंबण्याचे काम शेतकऱ्यांनी १५ ते २० दिवसांपूर्वी केले. थोड्याफार ओलाव्याने बीज अंकुरले. या कालावधीत पाऊस येणे आवश्यक होते. परंतु पावसाने दडी मारल्याने अंकूर करपले. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट आहे. नवीन बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार आहे.धान रोवणीचा खर्च वाचविण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी आवत्या पद्धतीने धानाची पेरणी केली. मात्र जमिनीत ओलावा कमी असल्याने धान उगवणीवर परिणाम झाला. ओलाव्यातील धान अंकुरले परंतु वरील धान खराब झाले. ज्या शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करून आवत्या टाकला त्या शेतकऱ्यांचे पीक सध्या जोमात आहे. परंतु पावसानंतर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे धान आवश्यक प्रमाणात उगवले नाही. यावर्षी मृगाच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस पडला. मात्र धान पऱ्हे टाकणीचे काम आर्द्रा नक्षत्रात करण्यात आले. आवत्याअभावी धान पºहे उगवण क्षमतेवरसुद्धा परिणाम झाला. त्यामुळे रोवणीकरिता धान पऱ्ह्याची टंचाई भासण्याची शक्यता वर्तवित काही शेतकऱ्यांनी अनेक शेतकरी दुबार पेरणी करीत आहेत. बहुतांश शेतकरी घरगुती परंपरागत बियाण्यांचा वापर न करता संकरित धानाच्या वाणाची पेरणी करीत आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे असे शेतकरी पऱ्ह्यांना पाणी देत आहेत.यावर्षी उद्भवलेल्या परिस्थितीबाबत चाकलपेठ येथील शेतकरी उमाकांत चुधरी यांना विचारणा केली असता, शेतीची नांगरणी, वखरणी, मजुरी, खते, बियाणे, कपाशीसाठी सारे पाडणे आदींचा विचार केल्यास एकरी १० ते १२ हजार रूपयांचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागला. सिंचन सुविधेअभावी कपाशी दुबार टिंबण्याचे सावट असल्याने तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे सिंचन सुविधा असणे आवश्यक आहे.पेरणी केलेले शेत कोरडेचतालुक्यात आष्टी, येनापूर, जैरामपूर, भेंडाळा, मुरखळा आदी गाव परिसरात मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादित केला जातो. सुरूवातीला शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी करून सारे पाडले. मात्र बियाणे टिंबल्यानंतर अपेक्षित पाऊस न झाल्याने पेरलेले शेत वखरणी केल्यागत दिसून येत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती