शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

चामोर्शी तालुक्यात दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 05:00 IST

धान रोवणीचा खर्च वाचविण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी आवत्या पद्धतीने धानाची पेरणी केली. मात्र जमिनीत ओलावा कमी असल्याने धान उगवणीवर परिणाम झाला. ओलाव्यातील धान अंकुरले परंतु वरील धान खराब झाले. ज्या शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करून आवत्या टाकला त्या शेतकऱ्यांचे पीक सध्या जोमात आहे. परंतु पावसानंतर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे धान आवश्यक प्रमाणात उगवले नाही.

ठळक मुद्देअंकुरलेले पीक करपले : पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त; आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : खरीप हंगामातील धान पऱ्हे व कपाशी टिंबण्याचे काम शेतकऱ्यांनी १५ ते २० दिवसांपूर्वी केले. थोड्याफार ओलाव्याने बीज अंकुरले. या कालावधीत पाऊस येणे आवश्यक होते. परंतु पावसाने दडी मारल्याने अंकूर करपले. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट आहे. नवीन बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार आहे.धान रोवणीचा खर्च वाचविण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी आवत्या पद्धतीने धानाची पेरणी केली. मात्र जमिनीत ओलावा कमी असल्याने धान उगवणीवर परिणाम झाला. ओलाव्यातील धान अंकुरले परंतु वरील धान खराब झाले. ज्या शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करून आवत्या टाकला त्या शेतकऱ्यांचे पीक सध्या जोमात आहे. परंतु पावसानंतर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे धान आवश्यक प्रमाणात उगवले नाही. यावर्षी मृगाच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस पडला. मात्र धान पऱ्हे टाकणीचे काम आर्द्रा नक्षत्रात करण्यात आले. आवत्याअभावी धान पºहे उगवण क्षमतेवरसुद्धा परिणाम झाला. त्यामुळे रोवणीकरिता धान पऱ्ह्याची टंचाई भासण्याची शक्यता वर्तवित काही शेतकऱ्यांनी अनेक शेतकरी दुबार पेरणी करीत आहेत. बहुतांश शेतकरी घरगुती परंपरागत बियाण्यांचा वापर न करता संकरित धानाच्या वाणाची पेरणी करीत आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे असे शेतकरी पऱ्ह्यांना पाणी देत आहेत.यावर्षी उद्भवलेल्या परिस्थितीबाबत चाकलपेठ येथील शेतकरी उमाकांत चुधरी यांना विचारणा केली असता, शेतीची नांगरणी, वखरणी, मजुरी, खते, बियाणे, कपाशीसाठी सारे पाडणे आदींचा विचार केल्यास एकरी १० ते १२ हजार रूपयांचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागला. सिंचन सुविधेअभावी कपाशी दुबार टिंबण्याचे सावट असल्याने तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे सिंचन सुविधा असणे आवश्यक आहे.पेरणी केलेले शेत कोरडेचतालुक्यात आष्टी, येनापूर, जैरामपूर, भेंडाळा, मुरखळा आदी गाव परिसरात मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादित केला जातो. सुरूवातीला शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी करून सारे पाडले. मात्र बियाणे टिंबल्यानंतर अपेक्षित पाऊस न झाल्याने पेरलेले शेत वखरणी केल्यागत दिसून येत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती