शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

चामोर्शी तालुक्यात दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 05:00 IST

धान रोवणीचा खर्च वाचविण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी आवत्या पद्धतीने धानाची पेरणी केली. मात्र जमिनीत ओलावा कमी असल्याने धान उगवणीवर परिणाम झाला. ओलाव्यातील धान अंकुरले परंतु वरील धान खराब झाले. ज्या शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करून आवत्या टाकला त्या शेतकऱ्यांचे पीक सध्या जोमात आहे. परंतु पावसानंतर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे धान आवश्यक प्रमाणात उगवले नाही.

ठळक मुद्देअंकुरलेले पीक करपले : पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त; आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : खरीप हंगामातील धान पऱ्हे व कपाशी टिंबण्याचे काम शेतकऱ्यांनी १५ ते २० दिवसांपूर्वी केले. थोड्याफार ओलाव्याने बीज अंकुरले. या कालावधीत पाऊस येणे आवश्यक होते. परंतु पावसाने दडी मारल्याने अंकूर करपले. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट आहे. नवीन बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार आहे.धान रोवणीचा खर्च वाचविण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी आवत्या पद्धतीने धानाची पेरणी केली. मात्र जमिनीत ओलावा कमी असल्याने धान उगवणीवर परिणाम झाला. ओलाव्यातील धान अंकुरले परंतु वरील धान खराब झाले. ज्या शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करून आवत्या टाकला त्या शेतकऱ्यांचे पीक सध्या जोमात आहे. परंतु पावसानंतर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे धान आवश्यक प्रमाणात उगवले नाही. यावर्षी मृगाच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस पडला. मात्र धान पऱ्हे टाकणीचे काम आर्द्रा नक्षत्रात करण्यात आले. आवत्याअभावी धान पºहे उगवण क्षमतेवरसुद्धा परिणाम झाला. त्यामुळे रोवणीकरिता धान पऱ्ह्याची टंचाई भासण्याची शक्यता वर्तवित काही शेतकऱ्यांनी अनेक शेतकरी दुबार पेरणी करीत आहेत. बहुतांश शेतकरी घरगुती परंपरागत बियाण्यांचा वापर न करता संकरित धानाच्या वाणाची पेरणी करीत आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे असे शेतकरी पऱ्ह्यांना पाणी देत आहेत.यावर्षी उद्भवलेल्या परिस्थितीबाबत चाकलपेठ येथील शेतकरी उमाकांत चुधरी यांना विचारणा केली असता, शेतीची नांगरणी, वखरणी, मजुरी, खते, बियाणे, कपाशीसाठी सारे पाडणे आदींचा विचार केल्यास एकरी १० ते १२ हजार रूपयांचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागला. सिंचन सुविधेअभावी कपाशी दुबार टिंबण्याचे सावट असल्याने तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे सिंचन सुविधा असणे आवश्यक आहे.पेरणी केलेले शेत कोरडेचतालुक्यात आष्टी, येनापूर, जैरामपूर, भेंडाळा, मुरखळा आदी गाव परिसरात मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादित केला जातो. सुरूवातीला शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी करून सारे पाडले. मात्र बियाणे टिंबल्यानंतर अपेक्षित पाऊस न झाल्याने पेरलेले शेत वखरणी केल्यागत दिसून येत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती