शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

वनातून रोजगार निर्मिती व्हावी

By admin | Updated: July 31, 2016 02:03 IST

गडचिरोली हा वनसंपदेने संपन्न जिल्हा आहे. रोजगारामध्ये वनांचा वापर कसा करता येईल, याचा विचार होणे गरजेचे आहे.

पालकमंत्र्यांचे प्रतिपादन : उपवनसंरक्षक उपजीविका पद निर्मितीचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश गडचिरोली : गडचिरोली हा वनसंपदेने संपन्न जिल्हा आहे. रोजगारामध्ये वनांचा वापर कसा करता येईल, याचा विचार होणे गरजेचे आहे. मोठ्या प्रमाणात असलेल्या वनातून रोजगार निर्मिती झाली पाहिजे, त्यासाठी उपवनंसरक्षक उपजीविका पद निर्माण करण्याचा तसेच मत्स्य विज्ञान संशोधन संस्थेच्या रूपात विद्यापीठाचे उपकेंद्र निर्मितीचा प्रस्ताव तयार करा, असे निर्देश आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी येथील नियोजन विभागाच्या सभागृहात पार पडली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, खासदार अशोक नेते, आमदार मितेश भांगडिया, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनु गोयल, जिल्हा नियोजन अधिकारी अनिल गोतमारे आदी मंचावर उपस्थित होते. जिल्ह्यात रोजगार निर्मितीच्या दृष्टीकोणातून वनावर आधारीत उत्पादन आणि त्याबाबत संशोधन होण्यासाठी यंत्रणा निर्माण केल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. केवळ बैठकांच्या नियोजनावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, असे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यावेळी म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यात रिक्त पदाची अडचण असतानाही जे अधिकारी काम करीत आहेत, त्यांचे कौतुकही त्यांनी यावेळी केले. समिती सदस्यांचा सत्कार डी. बी. खडतकर, सुनिल धोंगडे यांनी केला. जिल्ह्यात नव्याने रूजू झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीचे संचालन व आभार जिल्हा नियोजन अधिकारी अनिल गोतमारे यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी) मत्स्य व्यवसायासाठी उपकेंद्राचा ठराव मंजूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असून ४ हजार ८५० जलसाठे व मामा तलाव उपलब्ध आहेत. जलयुक्त शिवार व मागेल त्याला शेततळे योजनेतून तलावाची संख्या वाढल्याने मत्स्य व्यवसायातून रोजगाराची संधी आहे. याबाबत अभ्यास व संशोधन होऊन मासेमारांना मार्गदर्शनासाठी गोंडवाना विद्यापीठामार्फत जिल्ह्यात एक उपकेंद्र निर्माण करावे, असा प्रस्ताव खा. अशोक नेते यांनी मांडला व तो मंजूर करण्यात आला. सर्वांना गणवेश द्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत ओबीसी व खुल्या गटातील विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नाही. त्यासाठी न.प. व जि.प.ने आपल्या निधीतून सर्व विद्यार्थ्यांना गणवेश द्यावा, अशी सूचना किसन नागदेवे यांनी केली. यास सभागृहाने मान्यता दिली. डीपीसीतून एक कोटी भरा देसाईगंज येथे साडेचार एकर जागेवर कला केंद्र उभारण्याची मागणी आहे. झाडीपट्टी रंगभूमीचे केंद्र असलेल्या वडसात एकही नाट्यगृह नाही. प्रस्तावित जागेसाठी वनखात्याकडे भरावयाचा एक कोटीचा निधी डीपीसीतून द्यावा, अशी मागणी किसन नागदेवे यांनी केली. नियोजन आराखडा तयार करा जिल्हा विकासासाठी सुक्ष्म नियोजन आवश्यक आहे. यातून रोजगार निर्मिती होण्यासाठी सर्व विभागांनी एक महिन्याच्या आता नियोजनात्मक आराखडा तयार करून सादर करावा, अशी सूचना आमदार डॉ. देवराव होळी यांनी केली. कॅनल दुरूस्तीचे प्रस्तावही सादर करावे, असे ते म्हणाले. युरीया खत प्राप्त नाही आ. क्रिष्णा गजबे यांनी चंद्रपूरवरून गडचिरोली जिल्ह्यास युरीया खत प्राप्त झालेला नाही, असा विषय मांडला. तर आ. मितेश भांगडिया यांनी सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावांची नोंद इतिवृत्तात यायलाच हवी, असा मुद्दा मांडला.