शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

अपंगांत जगण्याची उमेद निर्माण करा

By admin | Updated: November 24, 2015 01:48 IST

समाजात इतरांसारखे जगता येत नाही, अशी भावना अंध, अपंगांमध्ये असते. त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो. परिणामी ते

वैरागड : समाजात इतरांसारखे जगता येत नाही, अशी भावना अंध, अपंगांमध्ये असते. त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो. परिणामी ते समाजात आत्मसन्मानाने जगू शकत नाही. त्यांच्यात आत्मसन्मान जागृत करण्यासाठी जगण्याची उमेद निर्माण करावी, असे आवाहन डॉ. सतीश गोगुलवार यांनी केले.सोनेरांगी येथे सोमवारी जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य सरिता वाटगुरे होत्या. यावेळी प्रवचनकार संपूर्णा आळंदीकर पं. स. सदस्य कविता दडमल, प्रा. प्रदीप बोडणे, सरपंच निता घोडाम, मुख्याध्यापक तिभागे, ग्रा. पं. सदस्य अंताराम तुलावी, तंमुस अध्यक्ष टिकाराम मांदाडे, माजी पं. स. सभापती गजानन कुमरे, निराशा जांभुळकर, जिल्हा अपंग संघटनेचे अध्यक्ष दिनकर चंदनखेडे, शारदा लक्षणे, त्र्यंबक बन्सोड, सुलतानखॉ पठाण उपस्थित होते. व्यक्तीला अपंगत्त्व प्राप्त झाल्यास त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण होते. अपंग हे दुदैवी असले तरी त्यावर मात करता येऊ शकते. अपंगांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधावी, असे आवाहनही डॉ. सतीश गोगुलवार यांनी केले. यावेळी प्रवचनकार संपूर्णा आळंदीकर यांनी अपंगांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याने अपंगांना नेहमी सहकार्य करावे, त्यांच्या हितासाठी झटावे, असे मार्गदर्शन करीत संतांचे अनेक दाखले देऊन अंध अपंगांची सेवा ज्यांनी केली त्यांना संत रूप प्राप्त झाले, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रंजना जांभुळे, प्रेमिला, मनोहर सतीबावणे, ताराचंद साखरे, दिगांबर रणदिवे, पत्रुजी कन्नाके, सोमेश्वर चौधरी यांनी सहकार्य केले. संचालन संघटनेचे सचिव बाबुराव कुमरे तर आभार रिता जनबंधू यांनी मानले. (वार्ताहर)