शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

चारित्र्यसंपन्न समाजाची निर्मिती करा

By admin | Updated: October 6, 2014 23:13 IST

सक्षम भारताची निर्मिती करण्यासाठी चारित्र्यसंपन्न समाज निर्माण करण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रा. विवेक सरपटवार यांनी केले.

गडचिरोली : सक्षम भारताची निर्मिती करण्यासाठी चारित्र्यसंपन्न समाज निर्माण करण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रा. विवेक सरपटवार यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गडचिरोली नगराच्यावतीने रविवारी सायंकाळी विद्याभारती कन्या विद्यालयात विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. सरपटवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्रजापिता ब्रम्हकुमारी गडचिरोलीचे सेवक भास्कर राऊत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक घिसूलाल काबरा, नगर संघ चालक उकंडराव राऊत उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा. सरपटवार म्हणाले की, २१ व्या शतकात सामर्थ्यशाली व वैभवशाली भारताकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागले आहे. या देशाची संस्कृती व संस्कार साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेत आहे. देशात राहणाऱ्या सर्वांनी राष्ट्रध्वज व राष्ट्रचिंतन करणे महत्वाचे आहे. राष्ट्रगीताचा प्रत्येक नागरिकाने सन्मान केला पाहीजे. हक्काची जाणीव ठेवून कर्तव्य पार पाडण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहीजे. सर्व धर्मांचा सन्मान करणारा हिंदूस्तान आहे. भारतीय नारी, चारित्र्यसंपन्न आहे. मात्र सध्या सर्वत्र स्त्रिची विटंबना होतांना उघड्या डोळ्यांनी दिसत आहे. हे थांबविण्यासाठी चारित्र्यसंपन्न समाज निर्मिती गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. संचालन नगर कार्यवाह दिलीप म्हस्के, प्रास्ताविक व आभार उकंडराव राऊत यांनी मानले. शहरातील प्रमुख मार्गाने स्वयंसेवकांनी पथसंचलन केले. (नगर प्रतिनिधी)