शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

आष्टी तालुक्याची निर्मिती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:48 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क आष्टी : चामाेर्शी तालुका विस्ताराने अतिशय माेठा आहे. आष्टी परिसरातील शेवटच्या गावातील व्यक्तिला तालुकास्थळी जाण्यासाठी ८० ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

आष्टी : चामाेर्शी तालुका विस्ताराने अतिशय माेठा आहे. आष्टी परिसरातील शेवटच्या गावातील व्यक्तिला तालुकास्थळी जाण्यासाठी ८० ते ९० किमीचे अंतर पार करावे लागते. त्यामुळे आष्टी तालुक्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राकेश बेलसरे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

आष्टी हे गाव चंद्रपूर जिल्ह्याची सीमा संपल्यानंतर पहिलेच गाव आहे. येथील लोकसंख्या दहा हजारांच्या जवळपास आहे. आष्टी येथे स्वतंत्र पोलीस स्थानक आहे. या पोलीस स्थानकअंतर्गत ६० गावांचा समावेश आहे. येथे महसूल मंडलांतर्गत पाच सजे आहेत. ग्रामीण रुग्णालय, राष्ट्रीयीकृत स्टेट बँकेची शाखा, ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच परिसरातील मोठी बाजारपेठ आहे. चामोर्शी हे तालुक्याचे ठिकाण आष्टीपासून ३५ किमी अंतरावर आहे. प्रत्येकवेळी लहान - सहान कामासाठी चामोर्शी येथे जाणे नागरिकांना परवडणारे नाही. काम न झाल्यास मानसिक त्रास सहन करावा लागते. आष्टी तालुका झाल्यास परिसरातील ५० ते ६० गावातील लोकांना आपली प्रशासकीय कामे करणे सोयीस्कर होईल. परिसरातील नागरिकांच्या अडचणी व जनभावना लक्षात घेऊन आष्टीला तालुका म्हणून घोषित करावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, राजू एडलावार, कपिल पाल, मंगेश पोरटे, रवी आलचेट्टीवार, छोटू दुर्गे, सत्यशील डोर्लीकर, संतोष बारापात्रे आदी उपस्थित होते.