शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

कापूस निघण्यास सुरुवात, खरेदी केंद्राचा पत्ता नाही

By admin | Updated: October 19, 2016 02:20 IST

गडचिरोली जिल्ह्यात खासगी कापूस व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी येत नाहीत.

जिल्ह्यातील कापूस उत्पादकांची व्यथा : सिरोंचा, मुलचेरा, अहेरी, चामोर्शी तालुक्यात उत्पादनगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात खासगी कापूस व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना परप्रांतात आपला कापूस विकावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र अहेरी, सिरोंचा भागात सुरू करावे, अशी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. गडचिरोली जिल्ह्यात प्रमुख पीक धान असले तरी जिल्ह्याच्या अहेरी उपविभागासह चामोर्शी तालुक्यात अनेक शेतकरी गेल्या काही वर्षांपासून कापसाचे पीक घेत आहे. यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर येण्याची आशा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आहे. गडचिरोली जिल्ह्यात ५०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांचा कापूस आता दसरा ते दिवाळीच्या दरम्यान निघण्यास सुरुवात होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या पाच-सात वर्षांपासून कापसाचा पेरा सातत्याने वाढत आहे. सिरोंचा भागात उच्च प्रतीचा कापूस उत्पादीत केला जातो. जिल्ह्यात उत्पादन होणारा कापूस गडचिरोली जिल्ह्यात खरेदीदार नसल्यामुळे शेतकऱ्यांना बाहेर ठिकाणी नेऊन विकावा लागतो. अनेक शेतकरी हिंगणघाट, आदिलाबाद वा तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यात नेऊन विकतात. गडचिरोली जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने जिल्ह्यात सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र केंद्र सरकारने सुरू करावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. धर्मरावबाबा आत्राम पालकमंत्री असताना २००८ मध्ये सिरोंचा येथे कापूस पणन महासंघाचे अस्थायी कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. तर मध्यंतरीच्या काळात पांढुर्णा येथून व्यापाऱ्यांना बोलावून अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीने कापूस खरेदी केंद्र सुरू केले होते. या केंद्रांवर शेतकऱ्यांच्या मालाची मोठी आवकही त्यावेळी झाली होती. परंतु सरकारच्या उदासीनतेमुळे कापूस खरेदी केंद्र बंद करण्यात आले. यावर्षी कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार आहे. पाकिस्तानसह इतर देशात कापूस उत्पादनात घट आली आहे व सुताचे भाव मोठ्या प्रमाणावर पडल्याने खासगी सुतगिरण्यांची कापूस खरेदी राज्यात सर्वत्र बंद राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील कापूस उत्पादकांची मोठी अडचण निर्माण होणार आहे. खासगी व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने कापसाची खरेदी शेतकऱ्यांकडून करू शकतात, अशी शक्यता असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुरूंगवासाची भीती व्यापाऱ्यांना दाखविली आहे. गडचिरोली जिल्ह्यात कापूस खरेदीसाठी कुठुनच व्यापारी येत नाही. त्यामुळे या भागात केंद्र सरकारने कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया (सीसीआय) चे कापूस खरेदी केंद्र अहेरी, सिरोंचा भागात सुरू करावे, अशी मागणी या भागातील कापूस उत्पादकांनी केली आहे. खा. अशोक नेते यांनी या प्रश्नावर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी विनंतीही कापूस उत्पादकांनी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र स्थायी स्वरूपात सुरू झाल्यास पुढील वर्षांपासून कापूस पेरा वाढण्याची शक्यता निर्माण होईल.