शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कापूस निघण्यास सुरुवात, खरेदी केंद्राचा पत्ता नाही

By admin | Updated: October 19, 2016 02:20 IST

गडचिरोली जिल्ह्यात खासगी कापूस व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी येत नाहीत.

जिल्ह्यातील कापूस उत्पादकांची व्यथा : सिरोंचा, मुलचेरा, अहेरी, चामोर्शी तालुक्यात उत्पादनगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात खासगी कापूस व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना परप्रांतात आपला कापूस विकावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र अहेरी, सिरोंचा भागात सुरू करावे, अशी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. गडचिरोली जिल्ह्यात प्रमुख पीक धान असले तरी जिल्ह्याच्या अहेरी उपविभागासह चामोर्शी तालुक्यात अनेक शेतकरी गेल्या काही वर्षांपासून कापसाचे पीक घेत आहे. यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर येण्याची आशा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आहे. गडचिरोली जिल्ह्यात ५०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांचा कापूस आता दसरा ते दिवाळीच्या दरम्यान निघण्यास सुरुवात होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या पाच-सात वर्षांपासून कापसाचा पेरा सातत्याने वाढत आहे. सिरोंचा भागात उच्च प्रतीचा कापूस उत्पादीत केला जातो. जिल्ह्यात उत्पादन होणारा कापूस गडचिरोली जिल्ह्यात खरेदीदार नसल्यामुळे शेतकऱ्यांना बाहेर ठिकाणी नेऊन विकावा लागतो. अनेक शेतकरी हिंगणघाट, आदिलाबाद वा तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यात नेऊन विकतात. गडचिरोली जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने जिल्ह्यात सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र केंद्र सरकारने सुरू करावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. धर्मरावबाबा आत्राम पालकमंत्री असताना २००८ मध्ये सिरोंचा येथे कापूस पणन महासंघाचे अस्थायी कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. तर मध्यंतरीच्या काळात पांढुर्णा येथून व्यापाऱ्यांना बोलावून अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीने कापूस खरेदी केंद्र सुरू केले होते. या केंद्रांवर शेतकऱ्यांच्या मालाची मोठी आवकही त्यावेळी झाली होती. परंतु सरकारच्या उदासीनतेमुळे कापूस खरेदी केंद्र बंद करण्यात आले. यावर्षी कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार आहे. पाकिस्तानसह इतर देशात कापूस उत्पादनात घट आली आहे व सुताचे भाव मोठ्या प्रमाणावर पडल्याने खासगी सुतगिरण्यांची कापूस खरेदी राज्यात सर्वत्र बंद राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील कापूस उत्पादकांची मोठी अडचण निर्माण होणार आहे. खासगी व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने कापसाची खरेदी शेतकऱ्यांकडून करू शकतात, अशी शक्यता असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुरूंगवासाची भीती व्यापाऱ्यांना दाखविली आहे. गडचिरोली जिल्ह्यात कापूस खरेदीसाठी कुठुनच व्यापारी येत नाही. त्यामुळे या भागात केंद्र सरकारने कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया (सीसीआय) चे कापूस खरेदी केंद्र अहेरी, सिरोंचा भागात सुरू करावे, अशी मागणी या भागातील कापूस उत्पादकांनी केली आहे. खा. अशोक नेते यांनी या प्रश्नावर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी विनंतीही कापूस उत्पादकांनी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र स्थायी स्वरूपात सुरू झाल्यास पुढील वर्षांपासून कापूस पेरा वाढण्याची शक्यता निर्माण होईल.