शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
2
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
3
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
4
'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट! तुमचेही पैसे वाढणार?
5
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
6
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था
7
२६ व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या, पोलिसांना सापडली सुसाईड नोट, समोर आलं मोठं कारण
8
रीलपायी जीव गमावला! १६ वर्षांचा मुलगा ट्रेनवर चढला, हाय पॉवर केबलला स्पर्श झाला अन्...
9
'पायलटच्या आत्महत्येचा आरोप निराधार...' विमान अपघाताच्या चौकशी पथकात समावेश करण्याची पायलट युनियनची मागणी
10
तुमच्या कुंडलीत आहे पंचमहापुरुष योग? धन-धान्य-वैभव, पैसा कमी पडत नाही; भरघोस भरभराट, शुभ-लाभ!
11
'विराटला १८ वर्षांनंतर जिंकताना पाहून...", आरसीबीच्या विजयावर जिनिलियाची प्रतिक्रिया
12
फक्त निमिषाच नाही, तर जगभरातील तुरुंगात 'इतक्या' भारतीयांना झाली मृत्युदंडाची शिक्षा
13
चीननं केला विश्वासघात, भारताला दिली 'या' देशाने साथ; ५ वर्षाचं टेन्शन मिटलं, शेतकऱ्यांना मोठा फायदा
14
Sneha Debnath : ६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
15
Good Luck Cafe: बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे; एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित
16
Accident: आंब्याने भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली; ९ जण ठार, अनेकजण जखमी!
17
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
18
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
19
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
20
नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली

कोरची रूग्णालय सलाईनवर

By admin | Updated: July 2, 2014 23:19 IST

येथील रूग्णालयात मंजूर असलेल्या २३ पदांपैकी सुमारे १२ पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर या रूग्णालयात इतर सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने बहुतांश रूग्णांना गडचिरोली येथे रेफर करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिल्या

शालिकराम कराडे - कोरचीयेथील रूग्णालयात मंजूर असलेल्या २३ पदांपैकी सुमारे १२ पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर या रूग्णालयात इतर सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने बहुतांश रूग्णांना गडचिरोली येथे रेफर करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिल्या जात आहे. त्यामुळे कोरची तालुक्यातील जनता बरीच त्रस्त झाली आहे. या ठिकाणची पदे भरण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. कोरची हा गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वात शेवटी अगदी उत्तरेला असलेला तालुका आहे. या तालुक्यातील सर्वच गावे दुर्गम भागात मोडत असून नक्षलग्रस्त आहेत. कोरची तालुक्यात लोकसंख्या विरळ आहे. खासगी दवाखानेही तालुकास्थळ वगळता एकाही गावी नाही. त्यामुळे नागरिकांना शासकीय रूग्णालयातूनच उपचार घ्यावा लागतो. कोरची येथे असलेल्या ग्रामीण रूग्णालयावर संपूर्ण तालुक्याच्या आरोग्याची जबाबदारी आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात आलेले बहुतांश रूग्ण ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी पाठविले जातात. मात्र याही रूग्णालयाची अत्यंत दुर्दशा झाली आहे. रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षकाचे एक पद मंजूर असून ते पद भरले आहे. वैद्यकीय अधिकारी वर्गाची ३ पदे भरली आहेत. परिचारिकेची ७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४ पदे रिक्त आहेत. २ कनिष्ठ लिपिकापैकी १ पद रिक्त आहे. वॉर्ड बॉयचे ४ पद रिक्त आहेत. लॅब टेक्निशिअन व औषधी निर्माण अधिकाऱ्याचे प्रत्येकी १ पद रिक्त आहे. ग्रामीण रूग्णालयावर संपूर्ण तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा भार आहे. या रूग्णालयात स्त्री रूग्णांची व बाल रूग्णांचेही प्रमाण दिवसेंंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे स्त्रिरोगतज्ज्ञ व बालरोगतज्ज्ञाची नितांत गरज आहे. मात्र दोन्ही पदे या रूग्णालयात मंजूर नाहीत. त्यामुळे भरण्याचा प्रश्नच नाही. एकूण २३ कर्मचाऱ्यांचे पदे मंजूर आहेत. त्यापैकी १२ पदे रिक्त आहेत. म्हणजेच जवळपास निम्मे पदे रिक्त आहेत. निम्म्या कर्मचाऱ्यांना रूग्णालयाचा भार सांभाळावा लागत आहे. रूग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळणे कठीण झाले आहे. तर दुसरीकडे आरोग्य सेवा देतांना उपलब्ध कर्मचाऱ्यांचीही चांगलीच दमछाक उडत आहे. रूग्णालयात रिक्त पदांबरोबरच आरोग्य सुविधांचेही वाणवा असल्याचे दिसून येते. पुरेशा साधनसामुग्री अभावी या ठिकाणी भरती झालेल्या रूग्णाला सरळसरळ गडचिरोली येथे रेफर करण्याचा सल्ला दिला जातो. गडचिरोली ते कोरचीचे अंतर १०० किमी पेक्षाही जास्त आहे. ग्रामीण भागातील नागरिकाला गडचिरोली येथे राहण्याचा खर्च झेपत नाही. तरीही नाईलाजास्तव उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे रूग्णालयातील पदे भरण्याची मागणी होत आहे.