शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

करपतेय धानपीक !

By admin | Updated: October 6, 2014 23:11 IST

गतवर्षीच्या खरीप हंगामात सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस व आॅक्टोबर महिनाच्या सुरूवातीला जोरदार पाऊस झाल्याने ऐन कापणीला आलेल्या शेतकऱ्यांच्या धानपीकाचा बहर अतिपावसामुळे नष्ट झाला होता.

पावसाची दांडी : पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडवैरागड : गतवर्षीच्या खरीप हंगामात सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस व आॅक्टोबर महिनाच्या सुरूवातीला जोरदार पाऊस झाल्याने ऐन कापणीला आलेल्या शेतकऱ्यांच्या धानपीकाचा बहर अतिपावसामुळे नष्ट झाला होता. यामुळे धानपीकाच्या उत्पादनात कमालीची घट झाली होती. यंदाच्या खरीप हंगामात सप्टेंबर महिन्याच्या ११ तारखेपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. गेल्या महिनाभरापासून वरूणराजाची वक्रदृष्टी असल्याने धानपीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे दिसून येते. तसेच जिल्हाभरातील हलके धानपीक सध्या अखेरच्या घटका मोजत असल्याचे दिसून येते. पावसाळ्याच्या प्रारंभी आणि मध्यंतरीच्या काळात पावसाने उसंत घेतली होती. मात्र त्यानंतर बऱ्यापैकी पाऊस झाल्याने जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी लगबगीने धानपीकाची रोवणी आटोपून घेतली. ऐन धानपीक बहराला येत असताना पावसाने आॅगस्ट महिन्यापासून कायमचा निरोप घेतला आहे. मध्यंतरीचे १५ दिवस पूर्णत: कोरडे गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. त्यानंतर मात्र गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत या १० दिवसाच्या कालावधीत जिल्हाभरात दमदार पावसाने हजेरी लावली. या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव, बोड्या पाण्याने भरले. यामुळे यंदा भरघोष पीक येण्याची आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. मात्र आॅगस्ट महिन्याच्या ११ तारेखपासून पावसाने कायमची दडी मारली आहे. कमी मुदतीचे हलके धानपीक सध्या लोंबाला आले आहेत. परंतु पाण्याअभावी जिल्ह्यातील शेकडो हेक्टर वरील धानपीक सध्या करपायला लागले आहेत. तोंडात आलेला घास वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ सुरू केली आहे. (वार्ताहर)