शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

Coronavirus: निवडणुकीला स्थगिती; पण आचारसंहितेचे सावट कायम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 18:10 IST

प्रशासन संभ्रमात; आयोगाकडे मागितले मार्गदर्शन 

गडचिरोली: कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीला अखेर राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली. पण नव्याने ही प्रक्रिया सुरू होईपर्यंत निवडणुकीची आचारसंहिता उठवण्यासंदर्भात कोणतेही स्पष्ट निर्देश नसल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा संभ्रमात पडली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने आयोगाकडे मार्गदर्शन मागितले आहे.राज्यातील १९ जिल्ह्यांमधील १५७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्या ३१ मार्च रोजी मतदान होणार होते. पण प्रचाराची रणधुमाळी, मतदान आणि मतमोजणीसाठी होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी सदर निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्याचा आदेश दि.१७ ला निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हा प्रशासनाला दिला.निवडणुकीच्या नियोजित कार्यक्रमानुसार दि.१६ ही नामांकन दाखल करण्याची शेवटची मुदत होती.  तोपर्यंतची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. पण नामांकनांची छाननी होऊन वैध-अवैध नामांकन ठरवणे, त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणे आणि प्रत्यक्ष मतदान व मतमोजणी हे महत्वाचे टप्पे बाकी आहेत.

पुन्हा नामांकन भरण्याची गरज नाहीकोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर ज्यावेळी निवडणुकीची पुढील प्रक्रिया सुरू होईल त्यावेळी उमेदवारांना नव्याने नामांकन दाखल करण्याची गरज पडणार नाही, असे गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी स्पष्ट केले. याचा अर्थ संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नव्याने होणार नसून ज्या टप्प्यावर प्रक्रिया थांबविली तेथून ती पुढे सुरू होणार आहे.

निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेला स्थगिती देताना आयोगाने आचारसंहिता उठवायची की ठेवायची, याबाबत स्पष्ट निर्देश दिलेले नाही. निवडणूक आयोगाला यासंदर्भात पत्र देऊन मार्गदर्शन मागविले आहे. अद्याप आयोगाकडून त्याबाबतचे मार्गदर्शन मिळालेले नाही.- दीपक सिंगला, जिल्हाधिकारी, गडचिरोली 

टॅग्स :Electionनिवडणूक