शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

Coronavirus: निवडणुकीला स्थगिती; पण आचारसंहितेचे सावट कायम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 18:10 IST

प्रशासन संभ्रमात; आयोगाकडे मागितले मार्गदर्शन 

गडचिरोली: कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीला अखेर राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली. पण नव्याने ही प्रक्रिया सुरू होईपर्यंत निवडणुकीची आचारसंहिता उठवण्यासंदर्भात कोणतेही स्पष्ट निर्देश नसल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा संभ्रमात पडली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने आयोगाकडे मार्गदर्शन मागितले आहे.राज्यातील १९ जिल्ह्यांमधील १५७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्या ३१ मार्च रोजी मतदान होणार होते. पण प्रचाराची रणधुमाळी, मतदान आणि मतमोजणीसाठी होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी सदर निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्याचा आदेश दि.१७ ला निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हा प्रशासनाला दिला.निवडणुकीच्या नियोजित कार्यक्रमानुसार दि.१६ ही नामांकन दाखल करण्याची शेवटची मुदत होती.  तोपर्यंतची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. पण नामांकनांची छाननी होऊन वैध-अवैध नामांकन ठरवणे, त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणे आणि प्रत्यक्ष मतदान व मतमोजणी हे महत्वाचे टप्पे बाकी आहेत.

पुन्हा नामांकन भरण्याची गरज नाहीकोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर ज्यावेळी निवडणुकीची पुढील प्रक्रिया सुरू होईल त्यावेळी उमेदवारांना नव्याने नामांकन दाखल करण्याची गरज पडणार नाही, असे गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी स्पष्ट केले. याचा अर्थ संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नव्याने होणार नसून ज्या टप्प्यावर प्रक्रिया थांबविली तेथून ती पुढे सुरू होणार आहे.

निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेला स्थगिती देताना आयोगाने आचारसंहिता उठवायची की ठेवायची, याबाबत स्पष्ट निर्देश दिलेले नाही. निवडणूक आयोगाला यासंदर्भात पत्र देऊन मार्गदर्शन मागविले आहे. अद्याप आयोगाकडून त्याबाबतचे मार्गदर्शन मिळालेले नाही.- दीपक सिंगला, जिल्हाधिकारी, गडचिरोली 

टॅग्स :Electionनिवडणूक