शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ब्रह्मपुरीच्या कोरोनाबाधिताचा गडचिरोलीत मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 18:01 IST

गडचिरोलीत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर येथे उपचारासाठी दाखल केलेल्या पहिल्याच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण ब्रह्मपुरीचा असल्यामुळे त्याची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात झाली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

ठळक मुद्दे मध्यरात्रीनंतर भरती केले अन् सकाळी प्राणज्योत मालावली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोलीत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर येथे उपचारासाठी दाखल केलेल्या पहिल्याच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण ब्रह्मपुरीचा असल्यामुळे त्याची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात झाली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान मंगळवारी भर पडलेल्या नवीन रुग्णांमुळे एकूण बाधित संख्या १३२९ वर पोहोचली आहे.दि.६ सप्टेंबर रोजी पहाटे २.३० वाजता ब्रह्मपुरी येथील रहिवासी असलेल्या एका ४७ वर्षीय व्यक्तीला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांना ताप, झटके येणे व श्वसनास त्रास होता. रुग्णालयात आणल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार प्रक्रि या सुरू करण्यात आली. लक्षणे पाहून सदर रूग्णाची ट्रूनॅट तपासणी करण्यात आली. त्यात त्यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला. यादरम्यान उपचार सुरू असताना सकाळी ७.४५ वाजता त्यांची प्रकृती आणखी बिघडून त्यांचा मृत्यू झाला, असे आरोग्य विभागाने कळविले.

अधिक पडताळणीकरीता त्यांचे नमुने आरटीपीसीआर तपासणी करण्याकरीता घेण्यात आले होते. त्याचा अहवाल रात्री प्रशासनाकडे प्राप्त झाला. त्यात सदर रुग्णाचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. मात्र तो रूग्ण चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याने तसेच बाधितही जिल्हयाबाहेर झाले असल्याने त्यांची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात घेण्यात आली.मृत रूग्णाची पत्नी यावेळी सोबत होती. तिचाही अहवाल आरटीपीसीआर तपासणीत सकारात्मक मिळाला आहे. मृत कोरोना बाधिताचा अंतिम विधी जिल्हा सामान्य रूग्णालयाकडून गडचिरोली येथे आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात आला.

२९ कोरोनामुक्त, तर २८ नवीन रुग्णांची भरजिल्ह्यात मंगळवारी २९ जण कोरोनामुक्त झाले. त्यामध्ये चामोर्शी येथील सर्वाधिक २१ जण आहेत. तसेच गडचिरोली येथील ६, सिरोंचा व आरमोरी येथील प्रत्येकी १ असे एकूण २९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. २८ नवीन कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली येथील १४ जण आहेत. त्यात एका गरोदर महिलेसह, सावली तालुक्यातील २, गडचिरोली शहरातील ११ रूग्णांचा समावेश आहे. आरमोरी येथील दोघा पॉजिटिव्हमध्ये १ आरोग्य कर्मचारी व १ कोरोनाबाधिताच्या संपर्कातील रुग्ण आहे.

देसाईगंज येथील ५ नवीन रुग्णांमध्ये बाधितांच्या संपर्कातील २ जण, मागील १० दिवसात लक्षणे आढळल्यानंतर सर्वेक्षणात आढळून आलेले ३ जण, कोरची येथील ३ प्रवासी, तसेच मुलचेरा येथील १ आरोग्य कर्मचारी व १ प्रवासी बधित आढळून आले आहेत. अहेरी येथेही १ प्रवासी बाधित आढळून आला. तर चामोर्शी येथे रूग्णाच्या संपर्कातील एक जण बाधित आढळला. असे २८ नवीन कोरोनाबाधित मंगळवारी आढळले. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १०८३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस