शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

केवळ १४५ गावांमध्ये कोरोना रोगाची एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 05:00 IST

देशात कोरोनाचा पहिला रूग्ण ३० जानेवारी रोजी आढळून आला. जवळपास साडेतीन महिने गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण आढळून आला नाही. १८ मे रोजी पहिल्यांदा कुरखेडा व चामोर्शी येथे कोरोनाचे रूग्ण आढळून आले. त्यानंतर कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत गेली. आता तर कोरोना रूग्णांची संख्या साडेचार हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. रूग्णसंख्या वाढत असली तरी रूग्ण बाधीत गावांची संख्या मात्र मर्यादित असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देगावकऱ्यांनी टाळला प्रवास : १,५११ गावे अजुनही कोरोनामुक्त

दिगांबर जवादे ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली असली तरी काही निवड गावांपुरताच कोरोनाचा प्रसार होत असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६५६ गावे आहेत. त्यापैकी केवळ १४५ गावांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहे. १५११ गावांमध्ये अजुनही कोरोनाचा एकही रूग्ण आढळून आला नाही.देशात कोरोनाचा पहिला रूग्ण ३० जानेवारी रोजी आढळून आला. जवळपास साडेतीन महिने गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण आढळून आला नाही. १८ मे रोजी पहिल्यांदा कुरखेडा व चामोर्शी येथे कोरोनाचे रूग्ण आढळून आले. त्यानंतर कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत गेली. आता तर कोरोना रूग्णांची संख्या साडेचार हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. रूग्णसंख्या वाढत असली तरी रूग्ण बाधीत गावांची संख्या मात्र मर्यादित असल्याचे दिसून येते. अहेरी ९, आरमोरी ९, भामरागड ५, चामोर्शी २६, धानोरा १५, एटापल्ली ७, गडचिरोली २६, कुरखेडा १६, कोरची ९, मुलचेरा ७, सिरोंचा ७ व देसाईगंज तालुक्यातील ९ गावांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत.आपल्या गावात कोरोना येऊ नये यासाठी गावक-यांनी घेतली ही काळजीलॉकडाऊनच्या कालावधीत गावकऱ्यांनी गावाच्या वेशीवर तपासणी पथक नेमले. दुसऱ्या गावातील व्यक्तीला परवानगीशिवाय प्रवेश दिला नाही.कोरोनाचे रूग्ण प्रामुख्याने शहरात असल्याने प्रशासकीय कामांसाठी शहरात जाणे ग्रामीण भागातील नागरिकांनी टाळले आहे. त्यामुळे ते सुरक्षित आहेत.दुर्गम भागातील आदिवासी बहुल गावांमधील नागरिकांच्या गरजा अत्यंत मर्यादीत आहेत. त्यामुळे त्यांना फारशी प्रवासाची गरज पडत नाही.ग्रामपंचायतींनी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून तसेच सामान्य फंडातून नागरिकांना मास्क व सॅनिटायझर वितरण करून जागृती केली.स्वच्छतेचे फायदे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी स्वत:हून स्वच्छता बाळगण्यास सुरूवात केली. ग्रामपंचायतींनी फवारणी केली.

लाॅकडाऊनमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा शहराशी संपर्क आला नाही. त्यामुळे अनेक गावे अजुनही काेराेनामुक्त आहेत. मात्र भविष्यात ते काेराेनामुक्त राहतीलच, याची शाश्वती नाही.-डाॅ. शशिकांत शंभरकर, डीएचओ गडचिराेली

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या