शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

केवळ १४५ गावांमध्ये कोरोना रोगाची एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 05:00 IST

देशात कोरोनाचा पहिला रूग्ण ३० जानेवारी रोजी आढळून आला. जवळपास साडेतीन महिने गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण आढळून आला नाही. १८ मे रोजी पहिल्यांदा कुरखेडा व चामोर्शी येथे कोरोनाचे रूग्ण आढळून आले. त्यानंतर कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत गेली. आता तर कोरोना रूग्णांची संख्या साडेचार हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. रूग्णसंख्या वाढत असली तरी रूग्ण बाधीत गावांची संख्या मात्र मर्यादित असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देगावकऱ्यांनी टाळला प्रवास : १,५११ गावे अजुनही कोरोनामुक्त

दिगांबर जवादे ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली असली तरी काही निवड गावांपुरताच कोरोनाचा प्रसार होत असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६५६ गावे आहेत. त्यापैकी केवळ १४५ गावांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहे. १५११ गावांमध्ये अजुनही कोरोनाचा एकही रूग्ण आढळून आला नाही.देशात कोरोनाचा पहिला रूग्ण ३० जानेवारी रोजी आढळून आला. जवळपास साडेतीन महिने गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण आढळून आला नाही. १८ मे रोजी पहिल्यांदा कुरखेडा व चामोर्शी येथे कोरोनाचे रूग्ण आढळून आले. त्यानंतर कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत गेली. आता तर कोरोना रूग्णांची संख्या साडेचार हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. रूग्णसंख्या वाढत असली तरी रूग्ण बाधीत गावांची संख्या मात्र मर्यादित असल्याचे दिसून येते. अहेरी ९, आरमोरी ९, भामरागड ५, चामोर्शी २६, धानोरा १५, एटापल्ली ७, गडचिरोली २६, कुरखेडा १६, कोरची ९, मुलचेरा ७, सिरोंचा ७ व देसाईगंज तालुक्यातील ९ गावांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत.आपल्या गावात कोरोना येऊ नये यासाठी गावक-यांनी घेतली ही काळजीलॉकडाऊनच्या कालावधीत गावकऱ्यांनी गावाच्या वेशीवर तपासणी पथक नेमले. दुसऱ्या गावातील व्यक्तीला परवानगीशिवाय प्रवेश दिला नाही.कोरोनाचे रूग्ण प्रामुख्याने शहरात असल्याने प्रशासकीय कामांसाठी शहरात जाणे ग्रामीण भागातील नागरिकांनी टाळले आहे. त्यामुळे ते सुरक्षित आहेत.दुर्गम भागातील आदिवासी बहुल गावांमधील नागरिकांच्या गरजा अत्यंत मर्यादीत आहेत. त्यामुळे त्यांना फारशी प्रवासाची गरज पडत नाही.ग्रामपंचायतींनी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून तसेच सामान्य फंडातून नागरिकांना मास्क व सॅनिटायझर वितरण करून जागृती केली.स्वच्छतेचे फायदे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी स्वत:हून स्वच्छता बाळगण्यास सुरूवात केली. ग्रामपंचायतींनी फवारणी केली.

लाॅकडाऊनमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा शहराशी संपर्क आला नाही. त्यामुळे अनेक गावे अजुनही काेराेनामुक्त आहेत. मात्र भविष्यात ते काेराेनामुक्त राहतीलच, याची शाश्वती नाही.-डाॅ. शशिकांत शंभरकर, डीएचओ गडचिराेली

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या