शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

हे अधिवेशन की चहापाणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 06:00 IST

विदर्भात गडचिरोली जिल्हा सर्वाधिक मागास आणि अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. या जिल्ह्यात केंद्र सरकारकडून विकास कामांसाठी विशेष निधी येत असला तरी त्याच्या अंमलबजावणीतही अनेक अडचणी असतात. त्यावर तोडगा काढून योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारमार्फत तातडीने निर्णय घेणे गरजेचे असते.

ठळक मुद्देप्रश्न मांडण्यासाठी संधीच नाही । लोकप्रतिनिधींसह नागरिकांनीही व्यक्त केली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नागपूर येथे येत्या १६ डिसेंबरपासून होणारे हिवाळी अधिवेशन अवघे ६ दिवसांचे राहणार आहे. महाराष्ट्रासह प्रामुख्याने विदर्भातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी होणारे हे अधिवेशन इतक्या कमी कालावधीसाठी होत असल्याबद्दल विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींसोबत सत्ताधारी पक्षातील नेत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. हे अधिवेशन आहे की चहापाण्याचा कार्यक्रम? असा प्रश्न उपस्थित करत काही लोकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.मध्यप्रांतातून विदर्भाचा भाग वेगळा करून संयुक्त महाराष्ट्र तयार झाला, त्यावेळी नागपूर करारानुसार हे हिवाळी अधिवेशन किमान ४ आठवडे चालणे अपेक्षित आहे. या अधिवेशनात प्रामुख्याने विदर्भातील प्रश्नांवर भर देऊन येथील प्रश्न मार्गी लागण्याची गरज आहे. परंतू आतापर्यंत कोणत्याही सरकारने त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याचे दिसत नाही. नव्याने सत्तारूढ झालेल्या महाआघाडीच्या सरकारकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जी कामे आधीच्या सरकारमध्ये अपूर्ण राहिली ती या नवीन सरकारच्या काळात तरी मार्गी लागतील अशी आशा सर्वजण बाळगून आहेत. परंतू सरकारने पहिल्याच अधिवेशनात विदर्भाला झटका दिल्यामुळे विदर्भाला योग्य न्याय मिळेल का, याबाबत साशंकता निर्माण होत आहे.विदर्भात गडचिरोली जिल्हा सर्वाधिक मागास आणि अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. या जिल्ह्यात केंद्र सरकारकडून विकास कामांसाठी विशेष निधी येत असला तरी त्याच्या अंमलबजावणीतही अनेक अडचणी असतात. त्यावर तोडगा काढून योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारमार्फत तातडीने निर्णय घेणे गरजेचे असते. परंतू अल्पावधीच्या अधिवेशनात गडचिरोली जिल्ह्यातील समस्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी वेळ मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सर्वच प्रमुख पक्षांच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांनी हिवाळी अधिवेशनाचा कालावधी किमान ३ ते ४ आठवड्यांचा असावा अशी भावना व्यक्त केली. अधिवेशनासाठी मुंबईतील सचिवालय नागपुरात हलविताना मोठा खर्चही येतो. केवळ हिवाळी सहल म्हणून नागपुरात यायचे असेल आणि या भागातील प्रश्नांना जर न्याय मिळत नसेल तर हे हिवाळी अधिवेशनाची नाटकबाजी करताच कशाला? अशीही भावना एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केली.अवघ्या सहा दिवसांच्या अधिवेशनात विदर्भातील किती आणि कोणत्या प्रश्नांवर चर्चा होणार हे अनाकलनिय आहे. तारांकित प्रश्नांसाठी १५ दिवस आधी कार्यक्रम येतो. पण तो यावेळी आलाच नाही. फक्त चहापाणी घेण्यासाठीच हे अधिवेशन आहे की काय, असे वाटत आहे. विदर्भवासियांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार आहे.- कृष्णा गजबे,आमदार, आरमोरीनागपूर करारानुसार नागपूरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन एक महिना चालणे गरजेचे आहे. परंतू प्रत्येक सरकार आपापल्या सोयीने काम करते. अधिवेशन किती दिवस चालवायचे हे ठरविण्याचा अधिकार सरकारचा आहे. तरीही गडचिरोली जिल्ह्यातील प्रश्न मांडण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन.- डॉ.देवराव होळी,आमदार, गडचिरोली

टॅग्स :Devrao Holiदेवराव होळी