शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोचा शेती विकासाला हातभार

By admin | Updated: May 29, 2014 02:22 IST

ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या सोडविण्याबरोबरच या भागाचा विकास करण्याच्या उद्देशाने केंद्र ..

गडचिरोली : ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या सोडविण्याबरोबरच या भागाचा विकास करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात शेती विकासाशी संबंधित १ कोटी ७ लाख ८४ हजार रूपयाची कामे वर्षभरात केली आहेत. यामध्ये विशेष करून सिंचनावर भर देण्यात आला आहे.

देशाची सुमारे ७0 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. त्यामुळे या लोकसंख्येच्या विकासाशिवाय देशाचा विकास होणे शक्य नाही. ग्रामीण भागातील बहुतांश लोकसंख्या शेतीवर जीवन जगत आहे. मात्र शेतीमध्ये जलसिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने केवळ चार महिन्याचा रोजगार प्राप्त होतो. उर्वरित ८ महिने शेतकर्‍याला बसून खावे लागत होते. परिणामी आर्थिक परिस्थिती सुधारण्यात फार मोठा अडथळा निर्माण होत होता. या सर्व बाबींचा विचार करून केंद्र शासनाने २५ ऑगस्ट २00५ रोजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम काढून रोजगार हमी योजना सुरू केली. या योजनेंतर्गत देशभरातील लाखो नागरिकांना रोजगार प्राप्त झाला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातही रोजगार हमी योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणी केली जात आहे. या योजनेंतर्गत हजारो ग्रामीण नागरिकांना रोजगार प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर या योजनेतून शेती विकासाशी संबंधित कामे केली जात असल्याने शेती विकासाला सुध्दा मदत झाली आहे. २0११-१२ या आर्थिक वर्षामध्ये रोजगार हमी योजनेतून सुमारे २ कोटी ४९ लाख ९६ हजार रूपयाची कामे करण्यात आली. या निधीतून जिल्हाभरात २ शेततळे बांधण्यात आले. ७९ बोडींची दुरूस्ती करण्यात आली. १५ नाल्यांवरील बंधार्‍यांचे बांधकाम, ८५ धानाच्या बांधींची निर्मिती व ४८ बांधींची दुरूस्ती करण्यात आली.

आर्थिक वर्ष २0१२-१३ मध्ये रोजगार हमी योजनेतून शेती विकासावर १ कोटी ६ लाख ७५ हजार रूपये खर्च करण्यात आले. या निधीतून १८ शेततळे, ३१ बोडींची दुरूस्ती, ९ बंधार्‍यांचे बांधकाम करण्यात आले. १५ बांधींची निर्मिती करून ४ बांधींची दुरूस्ती करण्यात आली. २0१३-१४ मध्ये १ कोटी ७ लाख ८४ हजार रूपये खर्च करण्यात आले. यातून ३६ शेततळे, २५ बोडींची दुरूस्ती, ७ बंधारे, २३ धानाच्या बांधींची निर्मिती व २१ बांधींची दुरूस्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर कृषी विभागाने यावर्षी २0 लाख ४८ हजार रूपये शतकोटी वृक्ष लागवड योजनेवर खर्च केले आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील कन्नमवार जलाशय वगळता एकही मोठा जलसिंचन प्रकल्प नाही. जिल्ह्यात धान पिकाचे सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते. या पिकाला अगदी सुरूवातीपासून तर धानपिक निघेपर्यंत सिंचनाची गरज भासते. धानपिकाला सिंचन तलाव व बोडींच्या सहाय्याने केले जाते. मात्र शतकापूर्वी बांधण्यात आलेल्या बोडींची अत्यंत दूरवस्था झाली आहे. बर्‍याचशा बोडींची पाळ फुटण्याच्या मार्गावर आहेत. तर काही बोडी बुजल्याने पाणी साठविण्याची क्षमताही कमी झाली आहे. बोडी दुरूस्तीसाठी लाखो रूपयाचा खर्च येत असल्याने शेतकरी वर्ग एवढा खर्च करून बोडींची दुरूस्ती करण्यास तयार होत नव्हता. त्यामुळे बोड्या नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला असतानाच कृषी विभागाने या बोडींची दुरूस्ती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे बोडींना नवसंजीवनी मिळून शेती उत्पादनात वाढ झाली आहे. (नगर प्रतिनिधी)