शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्राललयाने दिली महत्त्वाची सूचना
5
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
6
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
7
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
8
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
9
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
10
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
11
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
12
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
13
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
14
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
15
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
16
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
17
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
18
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
19
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
20
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:50 AM

समान काम, समान वेतन धोरणाचा अवलंब करण्यात यावा, एनआरएचएममधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागात असलेल्या रिक्त जागांवर कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे, यासह विविध मागण्यांकरिता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ ....

ठळक मुद्देशासनाच्या धोरणाविरोधात एल्गार : एनआरएचएमच्या कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : समान काम, समान वेतन धोरणाचा अवलंब करण्यात यावा, एनआरएचएममधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागात असलेल्या रिक्त जागांवर कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे, यासह विविध मागण्यांकरिता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने ११ एप्रिलपासून कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. २१ एप्रिल रोजी शनिवारला जिल्हा परिषद समोर एनआरएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. निदर्शनातून शासनाच्या धोरणाविरोधात शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात जवळपास ८५० कंत्राटी अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यीका, स्टाफ नर्स, लेखापाल, कार्यक्रम व्यवस्थापक आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात २००७ पासून हे ८५० कंत्राटी अधिकारी व कर्मचारी आरोग्य सेवेत कार्यरत आहेत. मात्र दहा वर्ष उलटूनही या कर्मचाऱ्यांना कामानुसार वेतन देण्यात आले नाही. तसेच त्यांना सेवेत कायम करण्यात आले नाही. संघटनेच्या वतीने सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला. मात्र याची दखल शासनाने घेतली नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचारी आता शासनाच्या विरोधात एकवटले आहेत. ११ एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तालुकास्तरावरही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. मात्र शासनाने निर्णय घेतला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शनिवारी गडचिरोलीच्या जि.प. समोर शासनाच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी डॉ. अनुपम महेशगौरी, डॉ. नंदू मेश्राम, रवीकिरण भडांगे, किरण रघुवंशी, रचना फुलझेले, संगीता महालदार, शरद गिरीपुंजे, मोहिता गोरेकर हजर होते.आरोग्यसेवा प्रभावितएनआरएचएमच अंतर्गत कार्यरत ८५० कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ११ एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय व जिल्हा रूग्णालयातील आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे. नियमित कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने सदर आंदोलन काळात रूग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे.