शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
3
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
4
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
5
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
6
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
7
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
9
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
10
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
11
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
12
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
13
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
14
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
15
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
16
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
17
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
18
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
19
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
20
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:50 IST

समान काम, समान वेतन धोरणाचा अवलंब करण्यात यावा, एनआरएचएममधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागात असलेल्या रिक्त जागांवर कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे, यासह विविध मागण्यांकरिता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ ....

ठळक मुद्देशासनाच्या धोरणाविरोधात एल्गार : एनआरएचएमच्या कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : समान काम, समान वेतन धोरणाचा अवलंब करण्यात यावा, एनआरएचएममधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागात असलेल्या रिक्त जागांवर कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे, यासह विविध मागण्यांकरिता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने ११ एप्रिलपासून कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. २१ एप्रिल रोजी शनिवारला जिल्हा परिषद समोर एनआरएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. निदर्शनातून शासनाच्या धोरणाविरोधात शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात जवळपास ८५० कंत्राटी अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यीका, स्टाफ नर्स, लेखापाल, कार्यक्रम व्यवस्थापक आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात २००७ पासून हे ८५० कंत्राटी अधिकारी व कर्मचारी आरोग्य सेवेत कार्यरत आहेत. मात्र दहा वर्ष उलटूनही या कर्मचाऱ्यांना कामानुसार वेतन देण्यात आले नाही. तसेच त्यांना सेवेत कायम करण्यात आले नाही. संघटनेच्या वतीने सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला. मात्र याची दखल शासनाने घेतली नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचारी आता शासनाच्या विरोधात एकवटले आहेत. ११ एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तालुकास्तरावरही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. मात्र शासनाने निर्णय घेतला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शनिवारी गडचिरोलीच्या जि.प. समोर शासनाच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी डॉ. अनुपम महेशगौरी, डॉ. नंदू मेश्राम, रवीकिरण भडांगे, किरण रघुवंशी, रचना फुलझेले, संगीता महालदार, शरद गिरीपुंजे, मोहिता गोरेकर हजर होते.आरोग्यसेवा प्रभावितएनआरएचएमच अंतर्गत कार्यरत ८५० कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ११ एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय व जिल्हा रूग्णालयातील आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे. नियमित कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने सदर आंदोलन काळात रूग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे.