शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आगीमुळे कंटेनर भंगार

By admin | Updated: November 3, 2014 23:25 IST

कचरा जमा करण्यासाठी शहराच्या विविध भागात नगर परिषदेने ३५ कचरा कंटेनर ठेवल्या आहेत. कंटेनरमध्ये कचरा जमा झाल्यानंतर काही बेजबाबदार नागरिक कंटेनरला आग लावत

गडचिरोली : कचरा जमा करण्यासाठी शहराच्या विविध भागात नगर परिषदेने ३५ कचरा कंटेनर ठेवल्या आहेत. कंटेनरमध्ये कचरा जमा झाल्यानंतर काही बेजबाबदार नागरिक कंटेनरला आग लावत असल्याने कंटेनर भंगार झाले आहेत. त्याचबरोबर आगीच्या धुरामुळे शहरातील नागरिकांना श्वसनाचेही आजार वाढले आहेत. शहरात स्वच्छता राखण्यासाठी नगर परिषदेचे जवळपास २० स्वच्छता कर्मचारी घंटागाड्या घेऊन प्रत्येक वार्डात सकाळच्या सुमारास फिरतात. मात्र एखादेवेळी घंटागाडी वॉर्डात न फिरल्यास किंवा एखाद्याला घंटागाडीमध्ये कचरा टाकण्यास न मिळाल्यास कचरा इतरत्र फेकला जाऊ नये, यासाठी शहरातील विविध भागात नगर परिषदेने ३५ कचरा कंटेनर ठेवल्या आहेत. काही नागरिक या कचरा कंटेनरमध्ये जमा करतात. जमा झालेल्या कचऱ्याला काही नागरिक आग लावून देतात. आगीमुळे कंटेनरचा रंग निघतो. त्याचबरोबर जास्त गरम झाल्यामुळे कंटेनर कडक बनून लवकरच भंगारात फेकण्याच्या स्थितीत तिची अवस्था बनते. त्यामुळे नगर परिषदेचे आर्थिक नुकसान होते. शहरी कचऱ्यामध्ये सर्वाधिक प्रमाण प्लास्टिकचे राहते. प्लास्टिकचा कचऱ्याचे लवकर विघटन होत नाही. त्याचबरोबर प्लास्टिक जळाल्यामुळे वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे पर्यावरण तज्ज्ञांचा प्लास्टिक जाळण्यालाही विरोध आहे. कंटेनरच्या चारही बाजुला घरे राहतात. अशा स्थितीत आगीचा धूर सभोवतालच्या परिसरामध्ये पसरते. अनेक वेळा प्रचंड धुरामुळे श्वास घेणे कठीण होऊन बसते. प्लास्टिकसारख्या इतर घातक पदार्थ्यांच्या जळण्यामुळे निर्माण झालेल्या धुरातून श्वसनाचे आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे सदर आग नगर परिषदेचे कर्मचारी लावत नसून सभोवतालचे काही बेजाबाबदार नागरिक आग लावत असल्याचा नगर परिषद प्रशासनाचा दावा आहे. तर नागरिक नगर परिषदेचे कर्मचारी आग लावत असल्याचे सांगतात. त्यामुळे आग लावणारा नेमका कोण, हे कळायला मार्ग नाही. मात्र सभोवतालच्या घरातील नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत असल्याने आग लावणाऱ्यावर नगर परिषद प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.नगर परिषद प्रशासनाने मागील वर्षीच सुमारे २३ कंटेनर खरेदी केल्या. प्रत्येक कंटनेर जवळपास १० हजार रूपयांचा असून त्याचे किमान आयुष्य आठ वर्ष आहे. मात्र आग लावण्याच्या प्रकारामुळे एक़ वर्षातच सदर कंटेनर भंगार झाले आहेत. भंगार कंटेनर व्यवस्थित उचलला जात नसल्याने नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनाही बराच त्रास सहन करावा लागत आहे. कंटेनर ही आपली संपत्ती आहे. त्याचबरोबर आग लावल्यामुळे होणारे आजार लक्षात घेता कंटेनरला आग लावू नये, अशी मागणी होत आहे.