शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आगीमुळे कंटेनर भंगार

By admin | Updated: November 3, 2014 23:25 IST

कचरा जमा करण्यासाठी शहराच्या विविध भागात नगर परिषदेने ३५ कचरा कंटेनर ठेवल्या आहेत. कंटेनरमध्ये कचरा जमा झाल्यानंतर काही बेजबाबदार नागरिक कंटेनरला आग लावत

गडचिरोली : कचरा जमा करण्यासाठी शहराच्या विविध भागात नगर परिषदेने ३५ कचरा कंटेनर ठेवल्या आहेत. कंटेनरमध्ये कचरा जमा झाल्यानंतर काही बेजबाबदार नागरिक कंटेनरला आग लावत असल्याने कंटेनर भंगार झाले आहेत. त्याचबरोबर आगीच्या धुरामुळे शहरातील नागरिकांना श्वसनाचेही आजार वाढले आहेत. शहरात स्वच्छता राखण्यासाठी नगर परिषदेचे जवळपास २० स्वच्छता कर्मचारी घंटागाड्या घेऊन प्रत्येक वार्डात सकाळच्या सुमारास फिरतात. मात्र एखादेवेळी घंटागाडी वॉर्डात न फिरल्यास किंवा एखाद्याला घंटागाडीमध्ये कचरा टाकण्यास न मिळाल्यास कचरा इतरत्र फेकला जाऊ नये, यासाठी शहरातील विविध भागात नगर परिषदेने ३५ कचरा कंटेनर ठेवल्या आहेत. काही नागरिक या कचरा कंटेनरमध्ये जमा करतात. जमा झालेल्या कचऱ्याला काही नागरिक आग लावून देतात. आगीमुळे कंटेनरचा रंग निघतो. त्याचबरोबर जास्त गरम झाल्यामुळे कंटेनर कडक बनून लवकरच भंगारात फेकण्याच्या स्थितीत तिची अवस्था बनते. त्यामुळे नगर परिषदेचे आर्थिक नुकसान होते. शहरी कचऱ्यामध्ये सर्वाधिक प्रमाण प्लास्टिकचे राहते. प्लास्टिकचा कचऱ्याचे लवकर विघटन होत नाही. त्याचबरोबर प्लास्टिक जळाल्यामुळे वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे पर्यावरण तज्ज्ञांचा प्लास्टिक जाळण्यालाही विरोध आहे. कंटेनरच्या चारही बाजुला घरे राहतात. अशा स्थितीत आगीचा धूर सभोवतालच्या परिसरामध्ये पसरते. अनेक वेळा प्रचंड धुरामुळे श्वास घेणे कठीण होऊन बसते. प्लास्टिकसारख्या इतर घातक पदार्थ्यांच्या जळण्यामुळे निर्माण झालेल्या धुरातून श्वसनाचे आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे सदर आग नगर परिषदेचे कर्मचारी लावत नसून सभोवतालचे काही बेजाबाबदार नागरिक आग लावत असल्याचा नगर परिषद प्रशासनाचा दावा आहे. तर नागरिक नगर परिषदेचे कर्मचारी आग लावत असल्याचे सांगतात. त्यामुळे आग लावणारा नेमका कोण, हे कळायला मार्ग नाही. मात्र सभोवतालच्या घरातील नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत असल्याने आग लावणाऱ्यावर नगर परिषद प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.नगर परिषद प्रशासनाने मागील वर्षीच सुमारे २३ कंटेनर खरेदी केल्या. प्रत्येक कंटनेर जवळपास १० हजार रूपयांचा असून त्याचे किमान आयुष्य आठ वर्ष आहे. मात्र आग लावण्याच्या प्रकारामुळे एक़ वर्षातच सदर कंटेनर भंगार झाले आहेत. भंगार कंटेनर व्यवस्थित उचलला जात नसल्याने नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनाही बराच त्रास सहन करावा लागत आहे. कंटेनर ही आपली संपत्ती आहे. त्याचबरोबर आग लावल्यामुळे होणारे आजार लक्षात घेता कंटेनरला आग लावू नये, अशी मागणी होत आहे.