शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

नव्या बसस्थानकांची निर्मिती अडचणीत

By admin | Updated: August 28, 2014 23:45 IST

गेल्या ३५ वर्षाच्या जुन्या नियोजनावर गडचिरोली जिल्ह्यातील एसटीचा कारभार चालत आहे. राज्य शासनाने येथे विभागीय कार्यालय सुरू करण्याची घोषणा २००९ मध्ये केली होती.

सरकारी उदासीनता : एसटी विभागीय कार्यालय गुंडाळलेगडचिरोली : गेल्या ३५ वर्षाच्या जुन्या नियोजनावर गडचिरोली जिल्ह्यातील एसटीचा कारभार चालत आहे. राज्य शासनाने येथे विभागीय कार्यालय सुरू करण्याची घोषणा २००९ मध्ये केली होती. त्यानंतर हे कार्यालय सुरू करून अवघ्या आठवड्यातच गुंडाळण्यात आले. त्यामुळे अनेक तालुका मुख्यालयात प्रस्तावित असलेले मोठे बसस्थानकाची निर्मितीही आता वाद्यांत येण्याची शक्यता आहे. राज्य परिवहन महामंडळ या कामासाठी निधी देण्यास समर्थ नसल्याने या जिल्ह्यात बसस्थानकाची निर्मिती रखडणार आहे.गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती औद्योगिक शहर म्हणून देसाईगंज शहराला ओळखले जाते़ जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थानक याच शहरात आहे़ मात्र, या शहरात २५ वर्षापूर्वी बांधलेले आवार नसलेले छोटेसे बसस्थानक आहे़ शहरातून कुरखेडा, ब्रह्मपुरी, नागपूर, चंद्रपूर, साकोली, गडचिरोली, लाखांदूर, राजूरा, हैदराबाद यासह संपूर्ण राज्यात धावणाऱ्या बसेस आहेत़ पूर्वीपेक्षा शहरातील लोकसंख्याही झपाट्याने वाढली आहे़ प्रवाशांची वाढती संख्या बघता येथे बसस्थानक आवश्यक आहे. बसस्थानकाला लागूनच नझूलची कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा असून येथे बसस्थानक होऊ शकले असते मात्र ती जागा सुध्दा बाजार समितीच्या मालकीची झाली आहे़ दहा-पंधरा वर्षांपूर्वी आरमोरी मार्गावरील जागा बसस्थानकासाठी आरक्षीत करण्यात आली होती़ मात्र नंतर पाणी कुठे मूरले हे समजलेच नाही़ आणि ती जागा रद्द करण्यात आली़ सध्या नगरपालिकेने कुरखेडा मार्गावर बसस्थानकासाठी २० आर जागा आरक्षीत केल्याचे सांगण्यात येत आहे.चामोर्शी तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आष्टी येथे एसटी आगार निर्मितीसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. भूसंपादन केलेल्या जमिनीवर तत्कालीन परिवहन मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते बसस्थानक बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले. परंतु एसटीमहामंडळ व जमीन मालक यांच्यात वाद निर्माण झाल्याने भूसंपादनानंतर हस्तांतरणाचा मुहूर्त रखडलेला आहे. चंद्रपूर मार्गावरील मधूकर चिंतावार यांची ८ एकर जागा कलम ४ व ९ अंतर्गत भूसंपादित करण्यात आली. त्यानुसार महामंडळाने जमीन मालकाला काही रक्कम अदा केल्याचीही माहिती आहे. मात्र राज्य परिवहन महामंडळाने नंतर आष्टी येथील एसटी आगार रद्द करून बसस्थानक उभारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ८ एकर जागेची आवश्यकता नव्हती. एसटीमहामंडळाने रस्त्यालगतची काही जमिन देण्याची मागणी शेतकऱ्यांकडे केली. मात्र जमीन मालकाने जागा घ्यायची असेल तर पूर्ण घ्या, अन्यथा रस्त्यालगतची जागा देणार नाही. हवे तर रस्त्यालगतची जागा सोडून देऊ अशी संमत्ती दर्शविली. महामंडळाला बसस्थानकासाठी रस्त्यालगतचीच जागा हवी असल्याने शेतकरी व महामंडळ यांच्यात वाद पेटला. त्यामुळे अजुनपर्यंत जमीन हस्तांतरणाचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे आष्टी येथील बसस्थानकाचा प्रश्न प्रलंबितच आहे. १९९८ ला परिवहन मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते बसस्थानक बांधकामाचे भूमीपूजन झाले. मात्र १४ वर्ष लोटूनही बसस्थानकाचे बांधकाम झालेले नाही. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने चामोर्शी येथे बसस्थानक बांधकामाच्या दृष्टीने शहरालगतच्या गडचिरोली मुख्य रस्त्याच्या बाजुच्या जागेची पाहणी केली़ चामोर्शीतील ४ ते ५ शेतकऱ्यांची जवळपास ४ हेक्टर जमीन निवडण्यात आली़ त्या जमीनीच्या सातबारावर भू संपादनाची कार्यवाही सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे़ ही भू संपादनाची कार्यवाही २००५- ०६ मध्ये करण्यात आली़ त्यावेळी शेतकरी व शासन यांचा जमीनीचा दर कमी होता़ आता या जमीनीचे दर लाखोंच्या घरात गेले आहेत़ त्यामुळे शेतकरी व राज्य परिवहन महामंडळात जमीनीच्या मालकीवर वादावादी सुरू असल्याने जमीन भू संपादनानंतर हस्तांतरणाचा मुहूर्त अद्याप सापडला नाही़ विभागीय कार्यालय गडचिरोली येथे सुरू राहिले असते, तर बसस्थानकाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास निश्चितच मदत झाली असती, मात्र राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे विभागीय कार्यालय बंद झाले. त्यामुळे आता निर्माणाधिन व प्रस्तावित असलेले बसस्थानक होण्याची आशा मावळली आहे.