शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तलाव बांधून द्या : मलमपल्लीवासीयांची तहसीलवर धडक

By admin | Updated: January 26, 2017 01:53 IST

तालुका मुख्यालयापासून ४० किमी अंतरावरील अतिसंवेदनशील व दुर्गम भागातील मलमपल्ली

अहेरी : तालुका मुख्यालयापासून ४० किमी अंतरावरील अतिसंवेदनशील व दुर्गम भागातील मलमपल्ली या गावात सिंचनाची सुविधा नसल्याने दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेती व इतर उपयोगाकरिता तलावाची अत्यंत गरज लक्षात घेऊन तलावाच्या बांधकामास मंजुरी देण्यात यावी, या मागणीसाठी मलमपल्ली येथील शेतकरी मंगळवारी अहेरीच्या तहसील कार्यालयावर धडकले. जि. प. चे कृषी सभापती अजय कंकडालवार व मलमपल्लीच्या सरपंच सीताबाई वेलादी यांच्या नेतृत्वात तहसीलदार प्रशांत घोरुडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गावात तलाव बांधकाम करण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा विनंती केली. तलावाकरिता लागनारी जमीनसुध्दा गावकऱ्यांनी प्रशासनाला देण्याची तयारी दर्शविली व सर्व गावकरी श्रमदानातून तलाव बांधकाम करण्याची तयारी दाखविली. पण आजपर्यंत तलाव बांधकामाला मंजुरी मिळाली नाही. या गावात तलाव बांधल्यास शेतकऱ्यांची अंदाजे दोनशे एकर जमीन ओलीताखाली येवू शकते. शेती पूर्णपणे वरच्या पावसावर अवलंबून असल्याने येथील शेतकऱ्यांना नेहमीच दुष्काळाचा सामना करावा लागतो. तहसीलदार प्रशांत घोरुडे यांनी निवेदन स्वीकारुन वरिष्ठ कार्यालयाला तलाव बांधकाम मंजुरी करीता प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. निवेदन देताना कार्तिक तोगम, आनंदराव कोंडागुर्ले, राजम सोदारी, लिंगा डोंगरे, शंकर दुर्गे, लचय्या गेडाम, बंडू गेडाम, कमला बेडकी, जयश्री दुर्गे, सुशिला डोंगरे यांचेसह बहुसंख्य शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)