शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

तलाव बांधून द्या : मलमपल्लीवासीयांची तहसीलवर धडक

By admin | Updated: January 26, 2017 01:53 IST

तालुका मुख्यालयापासून ४० किमी अंतरावरील अतिसंवेदनशील व दुर्गम भागातील मलमपल्ली

अहेरी : तालुका मुख्यालयापासून ४० किमी अंतरावरील अतिसंवेदनशील व दुर्गम भागातील मलमपल्ली या गावात सिंचनाची सुविधा नसल्याने दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेती व इतर उपयोगाकरिता तलावाची अत्यंत गरज लक्षात घेऊन तलावाच्या बांधकामास मंजुरी देण्यात यावी, या मागणीसाठी मलमपल्ली येथील शेतकरी मंगळवारी अहेरीच्या तहसील कार्यालयावर धडकले. जि. प. चे कृषी सभापती अजय कंकडालवार व मलमपल्लीच्या सरपंच सीताबाई वेलादी यांच्या नेतृत्वात तहसीलदार प्रशांत घोरुडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गावात तलाव बांधकाम करण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा विनंती केली. तलावाकरिता लागनारी जमीनसुध्दा गावकऱ्यांनी प्रशासनाला देण्याची तयारी दर्शविली व सर्व गावकरी श्रमदानातून तलाव बांधकाम करण्याची तयारी दाखविली. पण आजपर्यंत तलाव बांधकामाला मंजुरी मिळाली नाही. या गावात तलाव बांधल्यास शेतकऱ्यांची अंदाजे दोनशे एकर जमीन ओलीताखाली येवू शकते. शेती पूर्णपणे वरच्या पावसावर अवलंबून असल्याने येथील शेतकऱ्यांना नेहमीच दुष्काळाचा सामना करावा लागतो. तहसीलदार प्रशांत घोरुडे यांनी निवेदन स्वीकारुन वरिष्ठ कार्यालयाला तलाव बांधकाम मंजुरी करीता प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. निवेदन देताना कार्तिक तोगम, आनंदराव कोंडागुर्ले, राजम सोदारी, लिंगा डोंगरे, शंकर दुर्गे, लचय्या गेडाम, बंडू गेडाम, कमला बेडकी, जयश्री दुर्गे, सुशिला डोंगरे यांचेसह बहुसंख्य शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)