शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
3
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
4
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
5
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
6
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
7
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
8
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
9
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
10
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
11
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
12
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
13
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
14
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
15
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
16
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
17
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
18
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
19
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
20
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

तलाव बांधून द्या : मलमपल्लीवासीयांची तहसीलवर धडक

By admin | Updated: January 26, 2017 01:53 IST

तालुका मुख्यालयापासून ४० किमी अंतरावरील अतिसंवेदनशील व दुर्गम भागातील मलमपल्ली

अहेरी : तालुका मुख्यालयापासून ४० किमी अंतरावरील अतिसंवेदनशील व दुर्गम भागातील मलमपल्ली या गावात सिंचनाची सुविधा नसल्याने दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेती व इतर उपयोगाकरिता तलावाची अत्यंत गरज लक्षात घेऊन तलावाच्या बांधकामास मंजुरी देण्यात यावी, या मागणीसाठी मलमपल्ली येथील शेतकरी मंगळवारी अहेरीच्या तहसील कार्यालयावर धडकले. जि. प. चे कृषी सभापती अजय कंकडालवार व मलमपल्लीच्या सरपंच सीताबाई वेलादी यांच्या नेतृत्वात तहसीलदार प्रशांत घोरुडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गावात तलाव बांधकाम करण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा विनंती केली. तलावाकरिता लागनारी जमीनसुध्दा गावकऱ्यांनी प्रशासनाला देण्याची तयारी दर्शविली व सर्व गावकरी श्रमदानातून तलाव बांधकाम करण्याची तयारी दाखविली. पण आजपर्यंत तलाव बांधकामाला मंजुरी मिळाली नाही. या गावात तलाव बांधल्यास शेतकऱ्यांची अंदाजे दोनशे एकर जमीन ओलीताखाली येवू शकते. शेती पूर्णपणे वरच्या पावसावर अवलंबून असल्याने येथील शेतकऱ्यांना नेहमीच दुष्काळाचा सामना करावा लागतो. तहसीलदार प्रशांत घोरुडे यांनी निवेदन स्वीकारुन वरिष्ठ कार्यालयाला तलाव बांधकाम मंजुरी करीता प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. निवेदन देताना कार्तिक तोगम, आनंदराव कोंडागुर्ले, राजम सोदारी, लिंगा डोंगरे, शंकर दुर्गे, लचय्या गेडाम, बंडू गेडाम, कमला बेडकी, जयश्री दुर्गे, सुशिला डोंगरे यांचेसह बहुसंख्य शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)