शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नवरगावातील वादावर 'संविधाना'चा तोडगा; चौकाला संविधान नाव देण्याचा निर्णय, ५६ कुटुंबे परतणार स्वगावी

By संजय तिपाले | Updated: December 23, 2023 18:47 IST

चामोर्शी तालुक्यातील नवरगाव येथे महापुरुषांच्या नावाच्या फलकावरुन वर्षभरापासून वाद आहे.

गडचिरोली: महापुरुषांच्या नावाचा फलक लावण्यावरुन दोन गटात वाद झाल्यानंतर ५६ दलित कुटुंबांनी बिऱ्हाड बैलगाडीत टाकून गाव सोडल्याची धक्कादायक घटना चामोर्शी तालुक्यातील नवरगावात घडली होती. या कुटुंबांनी आंदोलन करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला होता. मात्र, तोडगा निघू शकला नव्हता. अखेर २३ डिसेंबर रोजी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या दालनात झालेल्या बैठकीत दोन्ही गटाच्या लोकांना समोरासमोर बसवून समेट घडवून आणण्यात यश आले. या चौकाला संविधान नाव देण्याचा निर्णय झाला.

चामोर्शी तालुक्यातील नवरगाव येथे महापुरुषांच्या नावाच्या फलकावरुन वर्षभरापासून वाद आहे. हा वाद न्यायालयापर्यंत गेलेला आहे. ग्रामसभेने अधिकाराचा वापर करुन अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान २१ डिसेंबरला पोलिस बंदोबस्तात फलक हटविला. त्यानंतर दलित समाजाच्या ५६ कुटुंबातील सव्वादोनशे सदस्यांनी तीव्र रोष व्यक्त करत लहान मुले, धान्य, कपडे घेऊन बैलगाड्यांतून गाव सोडले.  शिवणी गावालगतच नदीकिनारी या सर्वांनी अंधारात थंडीत कुडकुडत रात्र काढली.  २२ डिसेंबरला घोषणा देत हे सर्व जण शहरात पोहोचले. इंदिरा गांधी चौकात निषेध सभा घेतल्यानंतर बैलगाड्यांसह मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडविले.

तोडगा न निघाल्याने या कुटुंबांनी नवेगाव बुध्द विहारात मुक्काम केला. २३ डिसेंबरला सरपंच खुशाल कुकडे यांच्यासह गाव सोडलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या शिष्टमंडळाला पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी पुढाकार घेत समोरासमोर आणले. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा उपस्थित होते. दोन्ही गटाचे म्हणणे ऐकून घेतल्यावर सामोपचाराची भूमिका घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा व पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले. त्यानंतर संविधान नावावर एकमत झाले व सामंजस्याने वादावर पडदा पडला. त्यामुळे तणाव निवळला आहे.

पोलिस बंदोबस्तात गावी सोडणारनवरगाव येथील वाद मिटविण्यासाठी झालेल्या बैठकीत संविधान या नावावर दोन्ही बाजूंनी एकमत झाले.  नामफलक उभारताना कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यास सांगितले आहे. या गावाला वादाची पार्श्वभूमी नाही. त्यामुळे यापुढेही एकोपा कायम ठेवावा, असे आवाहन केले आहे. गाव सोडलेल्या ५६ कुटुंबाना पोलिस बंदोबस्तात पुन्हा स्वगावी पोहोचविले जाणार आहे. दोन्ही बाजूंनी समजदारीची भूमिका घेतली गेली त्यामुळे नवरगाव येथील वाद सामोपचाराने मिटला आहे. कुठल्याही परिस्थितीत शांतता व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता घ्यावी. - संजय मीणा, जिल्हाधिकारी 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली