शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

नोटबंदीविरोधात काँग्रेसचा एल्गार

By admin | Updated: January 7, 2017 01:24 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी ५०० व एक हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला.

 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे : शेकडो कार्यकर्ते उपस्थित गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी ५०० व एक हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर देशोधडीला लागले आहे. हा निर्णय पूर्णत: फसला असून या निर्णयाचा निषेध करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, निरिक्षक कैसर अहेमद, जि.प.चे उपाध्यक्ष जीवन पा. नाट, माजी जि.प. अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, काँगसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, पंकज गुड्डेवार, युवक काँग्रेसचे लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. राम मेश्राम, गडचिरोली तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, जिल्हा परिषद सदस्य मनोहर पा. पोरेटी, शांताबाई परसे, सुखमाबाई जांगधुर्वे, धानोरा पं.स.च्या सभापती कल्पना वड्डे, पं.स. सदस्य जस्वदाबाई करंगामी, शेवंताबाई हलामी, चामोशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश भांडेकर, वैभव भिवापूरे, काँग्रेसच्या अनुसूचित जाती जमाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, नंदू वाईलकर, पांडुरंग घोटेकर, प्रभाकर वासेकर, सुभाष धाईत, कुणाल पेंदोरकर, एनएसआयुचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, श्रीनिवास दुल्लमवार, छबिलाल बेसरा, एजाज शेख, आरीफ कनोजे, बाशिद शेख, निशांत नैताम, मिलींद किरंगे, गौरव अलाम, राकेश रत्नावार, कमलेश खोब्रागडे, निलीमा राऊत, अपर्णा खेवले, लता ढोक, विनोंद धंदरे, रवींद्र शहा, उमेश पेडुकर, जयंत हरडे, परसराम टिकले, आरीफ खानानी, मनोहर पोरेटी, राजू जीवानी, राजेश ठाकूर, विनोद भोयर, निळकंठ निखाडे, श्रीकांत सुरजागड, वैशाली सातपुते, आशिष कन्नमवार, रोहिणी मसराम, मिलिंद बागेसर, हेमंत भांडेकर आदीसह जिल्हाभरातील हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतमालाचे भाव झपाट्याने घसरले असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहे. उद्योग, व्यापारात मंदी आली असून अनेक तरूणांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहे. केंद्र सरकारने विदेशातून काळा पैसा आणण्याचे आश्वासन जनतेला दिले होते. मात्र त्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना नोटबंदीच्या निर्णयामुळे बँकेच्या रांगेत उभे राहण्याची पाळी आली आहे, असा आरोप काँग्रेसने यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने यावेळी केली. काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे नेते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. काँग्रेसच्या आंदोलनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. सरकार विरोधात फलक काँग्रेसने झळकावले. (जिल्हा प्रतिनिधी) काँग्रेसची सरकारकडे मागणी नोटबंदीमुळे बँकेच्या रांगेत उभे राहून मृत्यू पावलेल्या नागरिकांना प्रत्येकी २५ लाख नुकसान भरपाई देण्यात यावी, नोटबंदीमुळे लोकांनी जे रूपये जमा केले आहे. त्यावर १८ टक्के व्याज देण्यात यावे, ज्या प्रमाणे उद्योगपतीचे कर्ज माफ केले, त्याच प्रमाणे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्यात यावा, उद्योजक व दुकानदार यांना आयकर टॅक्स व सेल टॅक्समध्ये ५० टक्के सूट देण्यात यावी.