शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

सिरोंचा तहसीलवर धडकला राष्टÑवादी काँग्रेसचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 22:55 IST

गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर आणि छत्तीसगड व तेलंगाणा राज्याचा सीमेवर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील बेरोजगार, शेतकरी, शेतमजुर व गोरगरीब जनतेवर अन्याय होत असून येथे विविध समस्या आवासून आहेत. वारंवार शासनाकडे पाठपुरावा करूनही येथील समस्या निकाली काढण्यात येत नसल्याने सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फेयेथील जनतेच्या रास्त मागण्यांकरिता माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात जि.प.च्या बांधकाम व वित्त सभापती भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्त्यांसह हजारो नागरिक सिरोंचा तहसीलवर धडकले.

ठळक मुद्देशेकडो नागरिक सहभागी : तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर, नोकरीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर आणि छत्तीसगड व तेलंगाणा राज्याचा सीमेवर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील बेरोजगार, शेतकरी, शेतमजुर व गोरगरीब जनतेवर अन्याय होत असून येथे विविध समस्या आवासून आहेत. वारंवार शासनाकडे पाठपुरावा करूनही येथील समस्या निकाली काढण्यात येत नसल्याने सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फेयेथील जनतेच्या रास्त मागण्यांकरिता माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात जि.प.च्या बांधकाम व वित्त सभापती भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्त्यांसह हजारो नागरिक सिरोंचा तहसीलवर धडकले.मोर्चाची सुरुवात कोत्तागुडम येथून करण्यात आली. विविध मागण्यांच्या व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो, अशा घोषणात सिरोंचा मुख्यालय हादरून गेला. यावेळी बांधकाम व वित्त सभापती भाग्यश्री आत्राम, राकाँचे युवा नेते ऋतुराज हलगेकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, जिल्हा उपाध्यक्ष फईमभाई काजी, सेवादल जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापत्रे, सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी, उपाध्यक्ष कलाम भाई, सत्यम पिडगू, रायुकाँचे तालुका अध्यक्ष श्रीनिवास कडार्लावार, पं.स. उपसभापती कृष्णमूर्ती रिकुला, उज्वल तिवारी, राकाँचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.या आहेत प्रमुख मागण्यातालुक्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली असून जिल्हा निवड समिती अंतर्गत स्थानिकांना प्राधान्य देऊन भरती प्रक्रियेवर आणलेली बंदी हटवून त्वरित भरती प्रक्रिया राबविण्यात यावी. अंतर जास्त असल्यामुळे गडचिरोली जिल्हा मुख्यालयाला जाण्यासाठी सिरोंचावासीयांना अडचण निर्माण होत असून शासकीय व इतर खासगी कामाकरिता जाणाऱ्यांना मुक्काम केल्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे अहेरी हा नवीन जिल्हा घोषित करावा, सिरोंचाला उपजिल्हा घोषित करावे, उपजिल्हा सिरोंचा अंतर्गत नवीन दोन तालुक्याची निर्मिती करावी, मेडिगड्डा प्रकल्पपीडित नुकसान ग्रस्तांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, सिरोंचा ते आसरअली मार्गाची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, स्थानिकांना बांधकाम कामाकरिता आवश्यक असलेल्या रेतीची व्यवस्था करण्यात यावी, खेड्यापाड्यातील लोकांना श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, वनहक्क पट्टे वाटप करण्यात यावे, तसेच सिरोंचा तालुका मुख्यालयात १०० खाटांचे रुग्णालय तयार करून आवश्यक तज्ज्ञ डॉक्टरांची भरती करण्यात यावी, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.