शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पूर पीडितांसाठी काँग्रेसजन सरसावले

By admin | Updated: September 14, 2016 01:50 IST

११ व १२ सप्टेंबर रोजी कुरखेडा तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे सती नदीला पूर आला.

तहसील कार्यालयावर धडक : पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणीकुरखेडा : ११ व १२ सप्टेंबर रोजी कुरखेडा तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे सती नदीला पूर आला. तसेच छोटे नाले व तलाव तुडुंब भरून ओव्हरफ्लो झाले. परिणामी शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीमुळे कुरखेडा तालुक्यातील शेतकरी हवालदील झाले आहेत. नुकसानग्रस्त व पूर पीडित शेतकरी व नागरिकांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुरखेडाच्या तहसील कार्यालयावर सोमवारी धडक दिली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जीवन नाट व काँग्रेसचे कुरखेडा तालुकाध्यक्ष जयंत हरडे यांच्या नेतृत्त्वात शेतकरी, शेतमजुरांसह शेकडो नुकसानग्रस्त नागरिक सोमवारी तहसील कार्यालयात पोहोचले. यावेळी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट यांच्या नेतृत्त्वात तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.दरम्यान जीवन नाट, जयंत हरडे यांनी नुकसानग्रस्त शेत, पडझड झालेल्या घरांचे तत्काळ पंचनामे करण्याची कार्यवाहीबाबत चर्चा केली. निवेदनात म्हटले आहे की, सती नदीकाठावरील तसेच खोलगट भागात असलेल्या शेत जमिनीतील धान पीक, मिरची रोपे खरडून पुराच्या पाण्याने वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे अनेक घरांची अंशत: पडझड झाली. त्यामुळे संबंधित कुटुंबियांसमोर निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच दुष्काळाच्या व्युहचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांवर दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने आघात केला आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने महसूल कर्मचाऱ्यांनी तत्काळ मोका पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव जिल्हास्तरावर पाठवावे तसेच शासनाकडून मदत मिळण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देताना धनिराम परसो, पंचायत समिती सदस्य प्रभाकर तुलावी, सिराजखॉ पठाण, कुरखेडा नगर पंचायतीचे नगरसेवक मनोज सिडाम, इसमान खॉ पठाण, रोहित ढवळे, माधव दहीकर, तुकाराम मारगाये तसेच शेतकरी बुधराम मडावी, हरिश्चंद्र तुलावी, दिगांबर तुलावी, यशवंत उईके, भाष्कर तुलावी, हेमराज तुलावी, सुखदेव हलामी, गणेश हलामी आदींसह बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)