शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

गडचिरोलीत ग्रामसभांच्या दोन-दोन बँंक खात्यांमुळे निर्माण झाला संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 19:01 IST

वनहक्क कायद्यांतर्गत मालकी हक्क प्राप्त झालेल्या कोरची व कुरखेडा तालुक्यातील १९ ग्रामसभांच्या जंगलातून विद्युत टॉवरलाईन गेल्यामुळे झालेली नुकसानभरपाई ग्रामसभांना देण्यात आली. संबंधित ग्रामसभांनी ती रक्कम ग्रामकोष समितीच्या नियमित बँक खात्यात न टाकता ग्रामसभा सनियंत्रण समितीच्या बँक खात्यात टाकली.

ठळक मुद्देप्रशासन म्हणते हे नियमबाह्य १९ ग्रामसभांची खाती सील करण्याचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वनहक्क कायद्यांतर्गत मालकी हक्क प्राप्त झालेल्या कोरची व कुरखेडा तालुक्यातील १९ ग्रामसभांच्या जंगलातून विद्युत टॉवरलाईन गेल्यामुळे झालेली नुकसानभरपाई ग्रामसभांना देण्यात आली. संबंधित ग्रामसभांनी ती रक्कम ग्रामकोष समितीच्या नियमित बँक खात्यात न टाकता ग्रामसभा सनियंत्रण समितीच्या बँक खात्यात टाकली. मात्र ही बाब नियमबाह्य असल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी १९ ग्रामसभांची बँक खाती सील केली. दुसरीकडे प्रशासनाची ही कृती अन्यायकारक असल्याचे सांगत ग्रामसभांनी आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे धाव घेतली आहे.कोरची तालुक्यातील मुरकुटी, मलायघाट, लेकुरबोडी, पडियालजोब, बोदालदंड, बिजेपार, बेलारगोंदी, आंबेखारी, डाबरी, कुकडेल, गहाणेगाटा, झनकारगोंदी, टेमली, दवंडी, गडेली, चिलमटोला तसेच कुरखेडा तालुक्यातील सोनपूर, आंधळी, येडापूर या १९ ग्रामसभांना सामूहिक वनहक्क प्राप्त झालेल्या जंगलातून २०१८-१९ मध्ये विद्युत टॉवर लाईन उभारण्यात आली. त्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कटाई करण्यात आली. त्यापोटी कंत्राटदाराकडून मिळणारी नुकसानभरपाईची रक्कम ग्रामसभांना द्यावी अशी मागणी ग्रामसभांनी एसडीओमार्फत तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली होती. ती मागणी सिंह यांनी मान्य केली. पण त्यासाठी खाते क्रमांक देताना तो ग्रामकोष समितीचा नियमित खाते क्रमांक न देता ग्रामसेवक किंवा कोणी सरकारी प्रतिनिधीचा समावेश नसलेला ग्रामसभा सनियंत्रण समितीचा खाते क्रमांक देण्यात आला. त्या खात्यात पैसेही जमा झाले. मात्र ग्रामकोष समितीऐवजी दुसºया खात्यात पैसे जमा करणे नियमबाह्य असल्याची तक्रार प्रशासनाकडे आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पडताळणी करून ती खाती सील करण्यास सांगितले.सध्या तेंदूपत्ता हंगाम सुरू असून तेंदूपत्त्याचे आर्थिक व्यवहार ग्रामसभेच्या खात्यातूनच होत असल्याने सदर खाते सुरू होणे आवश्यक आहे, असे ग्रामसभांचे म्हणणे आहे. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ग्रामसभांनी ग्रामकोष समितीच्या नियमित खात्यातून व्यवहार करावा, असा सल्ला दिला आहे.

प्रत्येक ग्रामसभेला मिळाले ७० ते ७५ लाखविद्युत टॉवर लाईनसाठी झाडे कापल्याचा मोबदला म्हणून १९ ग्रामसभांना प्रत्येकी ७० ते ७५ लाख रुपये मिळाले आहेत. ग्रामसभा आपला निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र असली तरी ग्रामसेवकाला डावलून कोणताही निर्णय घेता येत नाही. याशिवाय ग्रामसभेसमोर प्रत्येक व्यवहाराचा हिशेब ठेवावा लागतो. पण सदर नुकसानभरपाईच्या रकमेबद्दल संबंधित ग्रामसेवकांनी अनभिज्ञता दर्शविली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी समिती गठीतदरम्यान या व्यवहाराची शहानिशा करून १९ ग्रामसभांनी काढलेले नवीन बँक खाते योग्य की अयोग्य हे तपासण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात चौकशी समिती गठीत केली. त्या समितीचा अहवाल जर ग्रामसभांच्या बाजुने आला तर सील केलेली खाती लगेच मोकळी केली जाईल, असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.नुकसानभरपाई रक्कम ज्या बँक खात्यांमध्ये टाकली ती खाती ग्रामसभेच्या ठरावानुसारच ग्रामसभा सनियंत्रण समितीच्या नावाने बनविलेली आहेत. समितीमधील दोन सदस्यांना त्यात व्यवहाराचे अधिकार ग्रामसभांनी दिले आहे. ग्रामसभेची सर्व मिळकत त्याच खात्यात जमा होते. असे असताना ते खाते अनधिकृत कसे काय? याबाबत प्रशासनाने संभ्रम दूर करावा.- डॉ.सतीश गोगुलवार, मार्गदर्शक, ग्रामसभा,कोरची-कुरखेडा

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना