शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

पर्यवेक्षक उशिरा पोहोचल्याने शिष्यवृत्ती परीक्षेदरम्यान गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 06:00 IST

शिष्यवृत्तीचा पहिला पेपर सकाळी ११ ते १२.३० या वेळेत ठेवण्यात आला होता. पाचव्या वर्गाचे विद्यार्थी पहिल्यांदाच वस्तुनिष्ठ प्रकारची परीक्षा देत असल्याने त्यांना रोल नंबर, नाव व इतर बाबी लिहिताना अडचण होऊ शकते. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना १०.३० वाजताच ओएमआर शीट देऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांच्याकडून योग्य ती माहिती भरून घेणे आवश्यक होते.

ठळक मुद्देविद्याभारती हायस्कूलमधील प्रकार : काही शिक्षकांनी मारली दांडी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक विद्याभारती हायस्कूलमध्ये पर्यवेक्षक म्हणून नियुक्त केलेले शिक्षक उशीरा पोहोचल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा पेपर उशिरा देण्यात आला. परीक्षेदरम्यान निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.शिष्यवृत्तीचा पहिला पेपर सकाळी ११ ते १२.३० या वेळेत ठेवण्यात आला होता. पाचव्या वर्गाचे विद्यार्थी पहिल्यांदाच वस्तुनिष्ठ प्रकारची परीक्षा देत असल्याने त्यांना रोल नंबर, नाव व इतर बाबी लिहिताना अडचण होऊ शकते. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना १०.३० वाजताच ओएमआर शीट देऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांच्याकडून योग्य ती माहिती भरून घेणे आवश्यक होते. विद्यार्थ्यांना पेपर देण्यापूर्वी संबंधित पर्यवेक्षकाला केंद्र संचालकांकडून पेपर घेणे, पेपर व्यवस्थित आहे की नाही याबाबी तपासणे आवश्यक असते. त्यामुळे संबंधित पर्यवेक्षकांनी किमान १० वाजता परीक्षा केंद्रावर हजर होणे आवश्यक होते. मात्र यातील बहुतांश पर्यवेक्षक १०.३० वाजताच्या नंतर पोहोचले. त्यामुळे विद्यार्थ्यांना १०.५० वाजता उत्तरपत्रीका देण्यात आली. या १० मिनिटाच्या कालावधीत त्यांच्याकडून उत्तरपत्रीकेवर आवश्यक ती माहिती भरून घेण्यात आली. घाईमध्ये काही विद्यार्थ्यांनी चुकीची माहिती भरली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, परीक्षा हा अतिशय संवेदनशील मुद्दा असतानाही नियुक्त केलेले पर्यवेक्षक उशीरा पोहोचणे हा अतिशय गंभीर प्रकार आहे. विशेष म्हणजे, ज्या पर्यवेक्षक शिक्षकांना नेमणूक देण्यात आली होती. त्यातील जवळपास पाच शिक्षक आलेच नाही. त्यामुळे वेळेवर स्थानिक विद्याभारती हायस्कूलमधील शिक्षकांना पर्यवेक्षक म्हणून नेमावे लागले. अशा दांडीबहाद्दर तसेच उशीरा आलेल्या शिक्षकांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.सकाळच्या सत्रात दिला दुपारचा पेपरउशीरा परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या शिक्षकांना आपण कोणती प्रश्नपत्रीका देत आहोत, हे सुध्दा माहित नव्हते. घाईमध्ये काही पर्यवेक्षकांनी पहिल्या सत्राच्या प्रश्नपत्रीकेऐवजी दुसऱ्या सत्राची प्रश्नपत्रीका दिली. काही विद्यार्थ्यांनी याबाबत आक्षेप घेतल्यानंतर शिक्षकांच्या सदर बाब लक्षात आली. त्यानंतर पुन्हा पेपर परत मागून त्यांना पहिल्या सत्राचा पेपर देण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांचा जवळपास १५ ते २० मिनिटांचा कालावधी गेला. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळ मिळाला नाही. ही बाब विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी केंद्र संचाकलांना चांगलेच धारेवर धरले. वर्षभर अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षक व केंद्र संचालकांच्या चुकीमुळे नुकसान झाले आहे.केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून १६ शिक्षक नियुक्त केले होते. मात्र यातील काही शिक्षक परीक्षा केंद्रावर उशीरा पोहोचले. तर काही शिक्षक आलेच नाही. त्यामुळे वेळेवर विद्याभारती हायस्कूलमधल्या शिक्षकांना पर्यवेक्षक म्हणून नेमावे लागले. एका परीक्षा खोलीतील विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्राऐवजी दुपारच्या सत्राचा पेपर देण्यात आला. ही बाब लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांकडून पेपर परत मागविण्यात आले. विद्यार्थ्यांना जास्तीचा वेळ देण्यात आला. बेंचेस कमी असल्याने एका बेंचवर दोन विद्यार्थ्यांना बसवावे लागले.- अमोल जोशी, परीक्षा केंद्र संचालक, विद्याभारती हायस्कूल गडचिरोली

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीexamपरीक्षा