शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

मृत गाईंच्या आकड्यात गोलमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST

गाई मरण पावल्या असल्या तरी किती गायी मरण पावल्या आणि किती विकण्यात आल्या याचा नेमका आकडा पशुसंवर्धन विभागाकडे नाही. विशेष म्हणजे मरण पावलेल्या गाईंपैकी २३ डिसेंबरपर्यंत केवळ ७ गाईंचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे उर्वरित २३९ गायींपैकी नेमक्या किती गाई मरण पावल्या याचा आकडा अजूनही गुलदस्त्यात आहे. यात बºयाच गायी मरण पावल्याचा देखावा करून प्रत्यक्षात त्या तेथून लांबवल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देकेवळ सात गाईंचे शवविच्छेदन : मरण पावल्याच्या नावावर परस्पर विकल्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीने आरमोरीजवळील शिवणी येथे ठेवलेल्या फ्रिजवाल गाईंपैकी दोन महिन्यात तब्बल २४६ गाई गायब झाल्या आहेत. त्यापैकी काही गाई मरण पावल्या असल्या तरी किती गायी मरण पावल्या आणि किती विकण्यात आल्या याचा नेमका आकडा पशुसंवर्धन विभागाकडे नाही. विशेष म्हणजे मरण पावलेल्या गाईंपैकी २३ डिसेंबरपर्यंत केवळ ७ गाईंचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे उर्वरित २३९ गायींपैकी नेमक्या किती गाई मरण पावल्या याचा आकडा अजूनही गुलदस्त्यात आहे. यात बºयाच गायी मरण पावल्याचा देखावा करून प्रत्यक्षात त्या तेथून लांबवल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीला पुण्यावरून ३८३ गायी-वासरे मिळाली होती. वाहतुकीदरम्यान त्यातील १५ गायी आणि १६ वासरे मरण पावली. दि.१२ ते १४ ऑक्टोबर यादरम्यान त्या गायी आरमोरीत दाखल झाल्या, त्यावैळी ३५२ गाई-वासरे जिवंत होती. १४ डिसेंबरला जनावरांची मोजणी केली त्यावेळी २७६ गाई आणि १० वासरे अशी २८६ जनावरे जिवंत होती. त्यानंतर दि.२४ डिसेंबरला शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष गाई ताब्यात घेतल्या त्यावेळी केवळ १०६ गाई उपलब्ध होत्या.आरमोरीत जिवंत आणण्यात आलेल्या ३५२ गाईंपैकी केवळ १०६ गायी उपलब्ध झाल्यामुळे उर्वरित २४६ गायींचे नेमके काय झाले? हे जाणून घेणे शेतकऱ्यांसोबतच प्रशासनासाठीही महत्त्वाचे झाले आहे. मात्र याबाबत आरमोरीचे तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.किशोर पराते यांना विचारले असता दोन दिवसांपूर्वीपर्यंत आपण ७ गाईंचे शवविच्छेदन केले असल्याचे ते म्हणाले. उर्वरित मृत गाईंचे शवविच्छेदन का झाले नाही? असे विचारले असता गाई मरण पावल्याची माहिती आपल्याला कंपनीकडून दिलीच जात नव्हती, तिथे काम करणारे लोक दोन दिवसांनंतर गाई मरण पावल्याचे सांगत होते. त्यामुळे त्या गायींची आधीच परस्पर विल्हेवाट लावली जात असल्याने शवविच्छेदन होऊ शकले नसल्याचे डॉ.पराते म्हणाले.वास्तविक हा सर्व प्रकार संशयास्पद असून गायी खरोखर किती मेल्या आणि किती गायब केल्या गेल्या (विकल्या) याची सखोल चौकशी करावी आणि ही गडबड करणाºयांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी केली जात आहे.दरम्यान जिल्हाधिकाºयांच्या आदेशानंतर कंपनीने विकलेल्या काही गाई परत आणण्यात आल्या आहेत.लाखोंच्या गाईंची किंमत कोणाकडून वसूल करणार?लष्कराच्या दुधाळू फ्रिजवाल गायींची किंमत शासनाच्या नोंदी प्रतिगाय ४० हजार रुपये असली तरी प्रत्यक्षात ती गाय ५० ते ६० हजार रुपये किमतीची आहे. परंतू जवळजवळ फुकटात मिळालेल्या कोटीच्या घरातील गायींची प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीने योग्य देखभाल केलीच नाही. त्यांना ठेवण्यासाठी शेडही बनविले नाही. खाण्यास योग्य प्रकारे चाराही दिला नाही. परिणामी अनेक गायी मरण पावल्या. लाखो रुपये किमतीच्या या शासनाच्या गायी मरण्यासाठी आणि त्यांच्या गायब होण्यासाठी जबाबदार धरून त्या गायींची किंमत प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीकडून वसूल करणार का? किंवा त्या कंपनीवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कायदेशिर कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कुपोषणामुळेच गाईंचे मरणज्या गाई मरण पावल्या त्या कुपोषणामुळेच मरण पावल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. याचा अर्थ कंपनीने त्यांची योग्य देखभाल केली नाही हे स्पष्ट आहे. गाई शेतकºयांच्या ताब्यात देण्याच्या आधीच मरण पावणे किंवा गायब होणे यासाठी सर्वस्वी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीच जबाबदार असल्याने त्या कंपनीवर कायदेशिर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :cowगाय