शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

१२ गावांना वगळल्याने चेन्ना प्रकल्पाला सहमतीस अडचण

By admin | Updated: September 21, 2016 02:23 IST

मुलचेरा तालुक्यातील चेन्ना या प्रकल्पात १२ गावांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे.

स्थानिकांशी संवाद साधा : १०० एकरावरील आदिवासींची उपजीविका नष्ट होण्याची भीतीगडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील चेन्ना या प्रकल्पात १२ गावांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. वगळलेल्या गावांना समाविष्ट करून पाण्याची सोय होत असल्यास या परिसरातील तिन्ही ग्रामपंचायती प्रकल्पाला मान्यता देऊ शकतील, अशी परिस्थिती असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.१९७७ मध्ये मुखडी गावालगत किमान ३५० ते ४०० हेक्टर जंगल परिसराचे सर्वेक्षण करण्यात आले होते. तेव्हापासून वनजमिनीचा प्रस्ताव प्रलंबित राहिला. २०१६ मध्ये या प्रकल्पाला पुन्हा मंजुरी मिळाली व सर्वेक्षणाची रूपरेषा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. मुलचेरा तालुक्यात १८ गावांना या प्रकल्पाद्वारे पाण्याची सोय होणार आहे. प्रकल्पाच्या कालव्याच्या बाजुला असलेल्या तीन ग्रामपंचायतमधून दोन ग्रामपंचायती या पेसा प्र क्षेत्रात मोडणाऱ्या आहे. एकूण १२ गावांना प्रकल्पातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे त्या गावातील शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ होणार नाही. त्यामुळे या प्रकल्पाला अनुमती मिळण्यास ग्रामस्थांचा विरोध असल्याची भूमिका दिसून येत आहे. प्रकल्पाच्या उभारणीला विरोध नाही. मात्र प्रकल्पात वगळण्यात आलेले गाव समाविष्ट करावे, त्यांच्या पर्यंतही पाणी पोहोचले पाहिजे, याचे नियोजन करावे, अशी मागणी जोर धरून आहे. प्रकल्प ज्या ठिकाणी होणार आहे, तेथे किमान १०० एकर जमिनीवर आदिवासींची उपजीविका अवलंबून आहे. शेतीशिवाय दुसरे कोणतेही उपजिविकेचे साधन या भागात नाही. त्यामुळे आदिवासी समाजाला या प्रकल्पामुळे बाधा निर्माण होईल, अशी भिती वाटत आहे. त्यामुळे विद्यमान सरकार, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांना जनतेशी सुसंवाद साधून मार्ग काढावा लागणार आहे. त्याशिवाय या प्रकल्पाला स्थानिक ग्रामसभांची मंजुरी मिळणे कठीण आहे. यासाठी आता नव्याने प्रयत्न करून सर्वच स्तरावर नागरिकांशी व ग्रामसभांशी चर्चा होणे आवश्यक ठरणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)